शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

वैशाख वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:17 IST

वैशाख मासामध्ये सूर्य अधिकच तेजानं तळपतो. त्याची किरणं प्रखर होतात. किरणांची प्रखरता सहन होत नाही. पशु झाडांच्या छायेत बसतात. पक्षी घरट्याचा आश्रय घेतात. सर्वत्र उन्हाचा तडाखा, मारा यामुळे जीव हैराण होतात. माथ्यावर छाया शोधतात. तेजस तत्त्वाचं आधिक्य समस्त जीवांना होरपळून काढतं. सूर्याकडे मान वर करून बघता येत नाही. सकल सृष्टीवर वैशाख वणवा पेटतो.

- कौमुदी गोडबोलेवैशाख मासामध्ये सूर्य अधिकच तेजानं तळपतो. त्याची किरणं प्रखर होतात. किरणांची प्रखरता सहन होत नाही. पशु झाडांच्या छायेत बसतात. पक्षी घरट्याचा आश्रय घेतात. सर्वत्र उन्हाचा तडाखा, मारा यामुळे जीव हैराण होतात. माथ्यावर छाया शोधतात. तेजस तत्त्वाचं आधिक्य समस्त जीवांना होरपळून काढतं. सूर्याकडे मान वर करून बघता येत नाही. सकल सृष्टीवर वैशाख वणवा पेटतो. अंगाची आग होऊन थंडावा हवाहवासा वाटतो. थंडगार जलाच्या सान्निध्यात राहावंसं वाटतं. तृष्णेनं जीव त्रस्त होतो. अशा वेळेला सरिता, विहिरी यांचं महत्त्वं अधिकच जाणवू लागतं.तेजस तत्त्वाचा तडाखा सृष्टीला सोसेनासा होतो. जल तत्त्वाचं प्रमाण अत्यंत कमी झालं की जीव घाबरा होतो. पशु पक्षी, माणसं अस्वस्थ होतात. सरिता रोडावतात तर विहिरी कोरड्या पडतात. पाण्याचं दुर्भिक्ष्य, दुष्काळ पडतो. पृथ्वी भेगाळते. वृक्ष, वेली निष्पर्ण होतात. ओसाड, उजाड माळरानावर पाणी नाही आणि वृक्षदेखील नाहीत. तेजस तत्त्व वाढलं की जल तत्त्व क्षीण होतं. याचा परिणाम पृथ्वी तत्त्वावर होतो आणि ओघानं पंचमहाभूतांनी तयार झालेल्या जीवांवर होतो.योग्य प्रमाण समतोल साधते तर विषम प्रमाण असमतोल निर्माण करते. सकल सृष्टीचा समतोल साधण्यासाठी मानवानं हव्यास सोडायला हवा. जंगलाचा, वृक्ष लावण्याचा ध्यास लागायला हवा. निसर्गाला सखा, सोबती मानणाऱ्या संतांच्या दृष्टीचं कौतुक वाटतं. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असं तुकाराम महाराजांना वाटतं. यामधून वृक्षांविषयी जिव्हाळा, प्रेम दिसून येतं. त्याचप्रमाणे समत्व वृत्ती लक्षात येते. पृथ्वी तत्त्व व्यवस्थित राहिलं तर माणसाचं जीवन सुरळीत चालेल. सूर्योपासना करून सूर्याला विनंती करायची, प्रार्थना करायची. त्याची दाहकता सीमा पार करून जाऊ नये. जलपूजन करून जलाला, सरितांना जीव जगवण्याची कळवळून प्रार्थना करायची. पृथ्वीचं पूजन, भूमी पूजन करायचं!देवाच्या पूजेमधून अनेक गोष्टी साधलेल्या आहेत. ऋषी, मुनींनी प्रयोग करून पूजनाची प्रथा, परंपरा निर्माण केली. त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. सृष्टीचा समतोल साधणाºया संस्कृतीचं वैशिष्ट्य लक्षात येतं. संस्कृतीच्या संवर्धनामध्ये मानवाचं हित सामावलेलं आहे. नाहीतर वैशाख वणव्याची प्रखरता वाढत जाऊन विनाश अटळ आहे. आपण कशाचा अंगीकार करायचा ते आपल्याच हातात आहे.

टॅग्स :Temperatureतापमानnewsबातम्या