शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

वैशाख वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:17 IST

वैशाख मासामध्ये सूर्य अधिकच तेजानं तळपतो. त्याची किरणं प्रखर होतात. किरणांची प्रखरता सहन होत नाही. पशु झाडांच्या छायेत बसतात. पक्षी घरट्याचा आश्रय घेतात. सर्वत्र उन्हाचा तडाखा, मारा यामुळे जीव हैराण होतात. माथ्यावर छाया शोधतात. तेजस तत्त्वाचं आधिक्य समस्त जीवांना होरपळून काढतं. सूर्याकडे मान वर करून बघता येत नाही. सकल सृष्टीवर वैशाख वणवा पेटतो.

- कौमुदी गोडबोलेवैशाख मासामध्ये सूर्य अधिकच तेजानं तळपतो. त्याची किरणं प्रखर होतात. किरणांची प्रखरता सहन होत नाही. पशु झाडांच्या छायेत बसतात. पक्षी घरट्याचा आश्रय घेतात. सर्वत्र उन्हाचा तडाखा, मारा यामुळे जीव हैराण होतात. माथ्यावर छाया शोधतात. तेजस तत्त्वाचं आधिक्य समस्त जीवांना होरपळून काढतं. सूर्याकडे मान वर करून बघता येत नाही. सकल सृष्टीवर वैशाख वणवा पेटतो. अंगाची आग होऊन थंडावा हवाहवासा वाटतो. थंडगार जलाच्या सान्निध्यात राहावंसं वाटतं. तृष्णेनं जीव त्रस्त होतो. अशा वेळेला सरिता, विहिरी यांचं महत्त्वं अधिकच जाणवू लागतं.तेजस तत्त्वाचा तडाखा सृष्टीला सोसेनासा होतो. जल तत्त्वाचं प्रमाण अत्यंत कमी झालं की जीव घाबरा होतो. पशु पक्षी, माणसं अस्वस्थ होतात. सरिता रोडावतात तर विहिरी कोरड्या पडतात. पाण्याचं दुर्भिक्ष्य, दुष्काळ पडतो. पृथ्वी भेगाळते. वृक्ष, वेली निष्पर्ण होतात. ओसाड, उजाड माळरानावर पाणी नाही आणि वृक्षदेखील नाहीत. तेजस तत्त्व वाढलं की जल तत्त्व क्षीण होतं. याचा परिणाम पृथ्वी तत्त्वावर होतो आणि ओघानं पंचमहाभूतांनी तयार झालेल्या जीवांवर होतो.योग्य प्रमाण समतोल साधते तर विषम प्रमाण असमतोल निर्माण करते. सकल सृष्टीचा समतोल साधण्यासाठी मानवानं हव्यास सोडायला हवा. जंगलाचा, वृक्ष लावण्याचा ध्यास लागायला हवा. निसर्गाला सखा, सोबती मानणाऱ्या संतांच्या दृष्टीचं कौतुक वाटतं. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असं तुकाराम महाराजांना वाटतं. यामधून वृक्षांविषयी जिव्हाळा, प्रेम दिसून येतं. त्याचप्रमाणे समत्व वृत्ती लक्षात येते. पृथ्वी तत्त्व व्यवस्थित राहिलं तर माणसाचं जीवन सुरळीत चालेल. सूर्योपासना करून सूर्याला विनंती करायची, प्रार्थना करायची. त्याची दाहकता सीमा पार करून जाऊ नये. जलपूजन करून जलाला, सरितांना जीव जगवण्याची कळवळून प्रार्थना करायची. पृथ्वीचं पूजन, भूमी पूजन करायचं!देवाच्या पूजेमधून अनेक गोष्टी साधलेल्या आहेत. ऋषी, मुनींनी प्रयोग करून पूजनाची प्रथा, परंपरा निर्माण केली. त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. सृष्टीचा समतोल साधणाºया संस्कृतीचं वैशिष्ट्य लक्षात येतं. संस्कृतीच्या संवर्धनामध्ये मानवाचं हित सामावलेलं आहे. नाहीतर वैशाख वणव्याची प्रखरता वाढत जाऊन विनाश अटळ आहे. आपण कशाचा अंगीकार करायचा ते आपल्याच हातात आहे.

टॅग्स :Temperatureतापमानnewsबातम्या