शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडची दुर्घटना नेमकं काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 08:05 IST

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडमध्ये घडणाऱ्या दुर्घटनांची कारणे नैसर्गिक असतात; पण मानवनिर्मित हस्तक्षेपांमुळे नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात वाढते.

- अभिजित घोरपडे, संपादक, भवताल पर्यावरण अभ्यासकभारताची भौगोलिक विविधता प्रचंड आहे. त्यामुळे कोसी नदीच्या महापुराची कल्पना आपल्या नद्या पाहून करता येत नाही आणि उत्तराखंडच्या दुर्घटनेचा अंदाज आपल्याकडील माळीण येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेवरून लावता येत नाही. म्हणूनच उत्तराखंड येथे रविवारी घडलेली आपत्ती समजून घेण्यासाठी तेथील भूगोल, हवामान, परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. 

उत्तराखंडची ओळख देवभूमी. गंगा, यमुना यांचा उगम, केदारनाथ-बद्रीनाथ यासारखी तीर्थक्षेत्रं, ७८१६ मीटर उंचीचे नंदादेवी शिखर ही तिथली ओळख. हे हिमालयाच्या दक्षिण उतारावरील राज्य. ८६ टक्के पर्वतीय क्षेत्र. अतितीव्र चढ-उतारामुळे जागोजागचे हवामान व परिस्थितीतही प्रचंड तफावत. नद्यांच्या प्रवाहांचा प्रचंड वेग आणि ऊर्जासुद्धा.. असा हा उत्तराखंड. तिथे काही आपत्ती नियमितपणे घडतात. ढगफुटी अर्थात कमी वेळात प्रचंड पाऊस, भल्यामोठ्या दरडी कोसळणे, दरडींमुळे नद्यांची पात्रं अडणे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडून नैसर्गिक धरण तयार होणे - ते फुटणे, हिमस्खलन (अव्हालॉन्च) अशा घटना अधूनमधून घडत असतात. शिवाय हिमालय हे भूशास्त्रीयदृष्ट्या कमकुवत क्षेत्र असल्याने भूकंपाच्या दुर्घटनेचीही भर पडते. तिथल्या नद्या, त्यांचे पाणी ही मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती. त्यांच्यावर धरणे बांधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यातील अनेक उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत, येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारच्या घटनेकडे पाहावे लागेल.
चमोली जिल्ह्यातील धौलीगंगा नदीला पूर आला. त्यात ऋषीगंगा विद्युत प्रकल्प वाहून गेला. त्याच्या नेमक्या कारणाचा शोध अभ्यासक आणि प्रशासनाकडून घेतला जाईलच. विविध शक्यतांनुसार, या घटनेमागे हिमस्खलन, ढगफुटी किंवा हिमनदीमुळे निर्माण झालेला तलाव फुटून (ग्लेशियल लेक आऊटबस्ट) घडला असावा. येथे हिमनदीमुळे निर्मित तलाव फुटण्याची संकल्पना समजून घ्यावी लागेल. उंच प्रदेशावर हिमवृष्टी झाल्यावर हिम साचते. उतार असेल तर ते हळूहळू खाली सरकू लागते. 
हीच हिमनदी. ती विशिष्ट उंचीपर्यंत खाली उतरली की वितळू लागते. त्याच वेळी तिच्यासोबतचे दगड, शिळा तिथे जमा होतात, त्याचा बांध बनतो. त्यामागे वितळलेले पाणी साचून तलाव बनतो. काहींचा आकार इतका असतो की कोटी घनमीटर इतके पाणी साठू शकते. हा तलाव अस्थिर असतो, कधीही फुटू शकतो... या शक्यतांपैकी नेमके काय घडले हे पुढील काही दिवसांमध्ये समजेलच. धरणाच्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजून तरी त्याचा थेट संबंध दिसलेला नाही.या घटनेतून निश्चितच धडे घेता येतील. उत्तराखंडमधील दुर्घटनांची कारणे नैसर्गिक आहेत. मात्र, मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड वाढते. ऋषीगंगा विद्युत प्रकल्प नसता तर तो प्रकल्प कोसळल्यामुळे झालेला मृत्यूचा आकडा फार पुढे गेला नसता, मग धौलीगंगा नदीला आलेला पूर ही आताइतकी मोठी आपत्ती ठरली नसती. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीलाही हे लागू होते. पर्यटनासोबत अनिर्बंध विकास, पात्रातील अतिक्रमणे, जंगलतोड यामुळे मृतांचा आकडा ५५०० च्या पुढे गेला. यामध्ये हवामान बदलाचाही मुद्दा येतो. तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या आक्रसत आहेत. त्यामुळे ढगफुटीच्या घटना वाढू शकतात. हिमाऐवजी थेट पाऊस पडण्याने पुराची तीव्रता वाढू शकते. हे सर्व पाहता हिमालयासारख्या संवेदनशील प्रदेशात विकास करताना किती काळजी घ्यावी लागणार आहे, याचाच धडा या आपत्तीने दिला आहे.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा