शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडची दुर्घटना नेमकं काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 08:05 IST

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडमध्ये घडणाऱ्या दुर्घटनांची कारणे नैसर्गिक असतात; पण मानवनिर्मित हस्तक्षेपांमुळे नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात वाढते.

- अभिजित घोरपडे, संपादक, भवताल पर्यावरण अभ्यासकभारताची भौगोलिक विविधता प्रचंड आहे. त्यामुळे कोसी नदीच्या महापुराची कल्पना आपल्या नद्या पाहून करता येत नाही आणि उत्तराखंडच्या दुर्घटनेचा अंदाज आपल्याकडील माळीण येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेवरून लावता येत नाही. म्हणूनच उत्तराखंड येथे रविवारी घडलेली आपत्ती समजून घेण्यासाठी तेथील भूगोल, हवामान, परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. 

उत्तराखंडची ओळख देवभूमी. गंगा, यमुना यांचा उगम, केदारनाथ-बद्रीनाथ यासारखी तीर्थक्षेत्रं, ७८१६ मीटर उंचीचे नंदादेवी शिखर ही तिथली ओळख. हे हिमालयाच्या दक्षिण उतारावरील राज्य. ८६ टक्के पर्वतीय क्षेत्र. अतितीव्र चढ-उतारामुळे जागोजागचे हवामान व परिस्थितीतही प्रचंड तफावत. नद्यांच्या प्रवाहांचा प्रचंड वेग आणि ऊर्जासुद्धा.. असा हा उत्तराखंड. तिथे काही आपत्ती नियमितपणे घडतात. ढगफुटी अर्थात कमी वेळात प्रचंड पाऊस, भल्यामोठ्या दरडी कोसळणे, दरडींमुळे नद्यांची पात्रं अडणे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडून नैसर्गिक धरण तयार होणे - ते फुटणे, हिमस्खलन (अव्हालॉन्च) अशा घटना अधूनमधून घडत असतात. शिवाय हिमालय हे भूशास्त्रीयदृष्ट्या कमकुवत क्षेत्र असल्याने भूकंपाच्या दुर्घटनेचीही भर पडते. तिथल्या नद्या, त्यांचे पाणी ही मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती. त्यांच्यावर धरणे बांधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यातील अनेक उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत, येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारच्या घटनेकडे पाहावे लागेल.
चमोली जिल्ह्यातील धौलीगंगा नदीला पूर आला. त्यात ऋषीगंगा विद्युत प्रकल्प वाहून गेला. त्याच्या नेमक्या कारणाचा शोध अभ्यासक आणि प्रशासनाकडून घेतला जाईलच. विविध शक्यतांनुसार, या घटनेमागे हिमस्खलन, ढगफुटी किंवा हिमनदीमुळे निर्माण झालेला तलाव फुटून (ग्लेशियल लेक आऊटबस्ट) घडला असावा. येथे हिमनदीमुळे निर्मित तलाव फुटण्याची संकल्पना समजून घ्यावी लागेल. उंच प्रदेशावर हिमवृष्टी झाल्यावर हिम साचते. उतार असेल तर ते हळूहळू खाली सरकू लागते. 
हीच हिमनदी. ती विशिष्ट उंचीपर्यंत खाली उतरली की वितळू लागते. त्याच वेळी तिच्यासोबतचे दगड, शिळा तिथे जमा होतात, त्याचा बांध बनतो. त्यामागे वितळलेले पाणी साचून तलाव बनतो. काहींचा आकार इतका असतो की कोटी घनमीटर इतके पाणी साठू शकते. हा तलाव अस्थिर असतो, कधीही फुटू शकतो... या शक्यतांपैकी नेमके काय घडले हे पुढील काही दिवसांमध्ये समजेलच. धरणाच्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजून तरी त्याचा थेट संबंध दिसलेला नाही.या घटनेतून निश्चितच धडे घेता येतील. उत्तराखंडमधील दुर्घटनांची कारणे नैसर्गिक आहेत. मात्र, मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड वाढते. ऋषीगंगा विद्युत प्रकल्प नसता तर तो प्रकल्प कोसळल्यामुळे झालेला मृत्यूचा आकडा फार पुढे गेला नसता, मग धौलीगंगा नदीला आलेला पूर ही आताइतकी मोठी आपत्ती ठरली नसती. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीलाही हे लागू होते. पर्यटनासोबत अनिर्बंध विकास, पात्रातील अतिक्रमणे, जंगलतोड यामुळे मृतांचा आकडा ५५०० च्या पुढे गेला. यामध्ये हवामान बदलाचाही मुद्दा येतो. तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या आक्रसत आहेत. त्यामुळे ढगफुटीच्या घटना वाढू शकतात. हिमाऐवजी थेट पाऊस पडण्याने पुराची तीव्रता वाढू शकते. हे सर्व पाहता हिमालयासारख्या संवेदनशील प्रदेशात विकास करताना किती काळजी घ्यावी लागणार आहे, याचाच धडा या आपत्तीने दिला आहे.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा