शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडची दुर्घटना नेमकं काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 08:05 IST

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडमध्ये घडणाऱ्या दुर्घटनांची कारणे नैसर्गिक असतात; पण मानवनिर्मित हस्तक्षेपांमुळे नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात वाढते.

- अभिजित घोरपडे, संपादक, भवताल पर्यावरण अभ्यासकभारताची भौगोलिक विविधता प्रचंड आहे. त्यामुळे कोसी नदीच्या महापुराची कल्पना आपल्या नद्या पाहून करता येत नाही आणि उत्तराखंडच्या दुर्घटनेचा अंदाज आपल्याकडील माळीण येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेवरून लावता येत नाही. म्हणूनच उत्तराखंड येथे रविवारी घडलेली आपत्ती समजून घेण्यासाठी तेथील भूगोल, हवामान, परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. 

उत्तराखंडची ओळख देवभूमी. गंगा, यमुना यांचा उगम, केदारनाथ-बद्रीनाथ यासारखी तीर्थक्षेत्रं, ७८१६ मीटर उंचीचे नंदादेवी शिखर ही तिथली ओळख. हे हिमालयाच्या दक्षिण उतारावरील राज्य. ८६ टक्के पर्वतीय क्षेत्र. अतितीव्र चढ-उतारामुळे जागोजागचे हवामान व परिस्थितीतही प्रचंड तफावत. नद्यांच्या प्रवाहांचा प्रचंड वेग आणि ऊर्जासुद्धा.. असा हा उत्तराखंड. तिथे काही आपत्ती नियमितपणे घडतात. ढगफुटी अर्थात कमी वेळात प्रचंड पाऊस, भल्यामोठ्या दरडी कोसळणे, दरडींमुळे नद्यांची पात्रं अडणे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडून नैसर्गिक धरण तयार होणे - ते फुटणे, हिमस्खलन (अव्हालॉन्च) अशा घटना अधूनमधून घडत असतात. शिवाय हिमालय हे भूशास्त्रीयदृष्ट्या कमकुवत क्षेत्र असल्याने भूकंपाच्या दुर्घटनेचीही भर पडते. तिथल्या नद्या, त्यांचे पाणी ही मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती. त्यांच्यावर धरणे बांधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यातील अनेक उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत, येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारच्या घटनेकडे पाहावे लागेल.
चमोली जिल्ह्यातील धौलीगंगा नदीला पूर आला. त्यात ऋषीगंगा विद्युत प्रकल्प वाहून गेला. त्याच्या नेमक्या कारणाचा शोध अभ्यासक आणि प्रशासनाकडून घेतला जाईलच. विविध शक्यतांनुसार, या घटनेमागे हिमस्खलन, ढगफुटी किंवा हिमनदीमुळे निर्माण झालेला तलाव फुटून (ग्लेशियल लेक आऊटबस्ट) घडला असावा. येथे हिमनदीमुळे निर्मित तलाव फुटण्याची संकल्पना समजून घ्यावी लागेल. उंच प्रदेशावर हिमवृष्टी झाल्यावर हिम साचते. उतार असेल तर ते हळूहळू खाली सरकू लागते. 
हीच हिमनदी. ती विशिष्ट उंचीपर्यंत खाली उतरली की वितळू लागते. त्याच वेळी तिच्यासोबतचे दगड, शिळा तिथे जमा होतात, त्याचा बांध बनतो. त्यामागे वितळलेले पाणी साचून तलाव बनतो. काहींचा आकार इतका असतो की कोटी घनमीटर इतके पाणी साठू शकते. हा तलाव अस्थिर असतो, कधीही फुटू शकतो... या शक्यतांपैकी नेमके काय घडले हे पुढील काही दिवसांमध्ये समजेलच. धरणाच्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजून तरी त्याचा थेट संबंध दिसलेला नाही.या घटनेतून निश्चितच धडे घेता येतील. उत्तराखंडमधील दुर्घटनांची कारणे नैसर्गिक आहेत. मात्र, मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड वाढते. ऋषीगंगा विद्युत प्रकल्प नसता तर तो प्रकल्प कोसळल्यामुळे झालेला मृत्यूचा आकडा फार पुढे गेला नसता, मग धौलीगंगा नदीला आलेला पूर ही आताइतकी मोठी आपत्ती ठरली नसती. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीलाही हे लागू होते. पर्यटनासोबत अनिर्बंध विकास, पात्रातील अतिक्रमणे, जंगलतोड यामुळे मृतांचा आकडा ५५०० च्या पुढे गेला. यामध्ये हवामान बदलाचाही मुद्दा येतो. तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या आक्रसत आहेत. त्यामुळे ढगफुटीच्या घटना वाढू शकतात. हिमाऐवजी थेट पाऊस पडण्याने पुराची तीव्रता वाढू शकते. हे सर्व पाहता हिमालयासारख्या संवेदनशील प्रदेशात विकास करताना किती काळजी घ्यावी लागणार आहे, याचाच धडा या आपत्तीने दिला आहे.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा