शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडची दुर्घटना नेमकं काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 08:05 IST

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडमध्ये घडणाऱ्या दुर्घटनांची कारणे नैसर्गिक असतात; पण मानवनिर्मित हस्तक्षेपांमुळे नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात वाढते.

- अभिजित घोरपडे, संपादक, भवताल पर्यावरण अभ्यासकभारताची भौगोलिक विविधता प्रचंड आहे. त्यामुळे कोसी नदीच्या महापुराची कल्पना आपल्या नद्या पाहून करता येत नाही आणि उत्तराखंडच्या दुर्घटनेचा अंदाज आपल्याकडील माळीण येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेवरून लावता येत नाही. म्हणूनच उत्तराखंड येथे रविवारी घडलेली आपत्ती समजून घेण्यासाठी तेथील भूगोल, हवामान, परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. 

उत्तराखंडची ओळख देवभूमी. गंगा, यमुना यांचा उगम, केदारनाथ-बद्रीनाथ यासारखी तीर्थक्षेत्रं, ७८१६ मीटर उंचीचे नंदादेवी शिखर ही तिथली ओळख. हे हिमालयाच्या दक्षिण उतारावरील राज्य. ८६ टक्के पर्वतीय क्षेत्र. अतितीव्र चढ-उतारामुळे जागोजागचे हवामान व परिस्थितीतही प्रचंड तफावत. नद्यांच्या प्रवाहांचा प्रचंड वेग आणि ऊर्जासुद्धा.. असा हा उत्तराखंड. तिथे काही आपत्ती नियमितपणे घडतात. ढगफुटी अर्थात कमी वेळात प्रचंड पाऊस, भल्यामोठ्या दरडी कोसळणे, दरडींमुळे नद्यांची पात्रं अडणे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडून नैसर्गिक धरण तयार होणे - ते फुटणे, हिमस्खलन (अव्हालॉन्च) अशा घटना अधूनमधून घडत असतात. शिवाय हिमालय हे भूशास्त्रीयदृष्ट्या कमकुवत क्षेत्र असल्याने भूकंपाच्या दुर्घटनेचीही भर पडते. तिथल्या नद्या, त्यांचे पाणी ही मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती. त्यांच्यावर धरणे बांधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यातील अनेक उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत, येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारच्या घटनेकडे पाहावे लागेल.
चमोली जिल्ह्यातील धौलीगंगा नदीला पूर आला. त्यात ऋषीगंगा विद्युत प्रकल्प वाहून गेला. त्याच्या नेमक्या कारणाचा शोध अभ्यासक आणि प्रशासनाकडून घेतला जाईलच. विविध शक्यतांनुसार, या घटनेमागे हिमस्खलन, ढगफुटी किंवा हिमनदीमुळे निर्माण झालेला तलाव फुटून (ग्लेशियल लेक आऊटबस्ट) घडला असावा. येथे हिमनदीमुळे निर्मित तलाव फुटण्याची संकल्पना समजून घ्यावी लागेल. उंच प्रदेशावर हिमवृष्टी झाल्यावर हिम साचते. उतार असेल तर ते हळूहळू खाली सरकू लागते. 
हीच हिमनदी. ती विशिष्ट उंचीपर्यंत खाली उतरली की वितळू लागते. त्याच वेळी तिच्यासोबतचे दगड, शिळा तिथे जमा होतात, त्याचा बांध बनतो. त्यामागे वितळलेले पाणी साचून तलाव बनतो. काहींचा आकार इतका असतो की कोटी घनमीटर इतके पाणी साठू शकते. हा तलाव अस्थिर असतो, कधीही फुटू शकतो... या शक्यतांपैकी नेमके काय घडले हे पुढील काही दिवसांमध्ये समजेलच. धरणाच्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजून तरी त्याचा थेट संबंध दिसलेला नाही.या घटनेतून निश्चितच धडे घेता येतील. उत्तराखंडमधील दुर्घटनांची कारणे नैसर्गिक आहेत. मात्र, मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड वाढते. ऋषीगंगा विद्युत प्रकल्प नसता तर तो प्रकल्प कोसळल्यामुळे झालेला मृत्यूचा आकडा फार पुढे गेला नसता, मग धौलीगंगा नदीला आलेला पूर ही आताइतकी मोठी आपत्ती ठरली नसती. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीलाही हे लागू होते. पर्यटनासोबत अनिर्बंध विकास, पात्रातील अतिक्रमणे, जंगलतोड यामुळे मृतांचा आकडा ५५०० च्या पुढे गेला. यामध्ये हवामान बदलाचाही मुद्दा येतो. तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या आक्रसत आहेत. त्यामुळे ढगफुटीच्या घटना वाढू शकतात. हिमाऐवजी थेट पाऊस पडण्याने पुराची तीव्रता वाढू शकते. हे सर्व पाहता हिमालयासारख्या संवेदनशील प्रदेशात विकास करताना किती काळजी घ्यावी लागणार आहे, याचाच धडा या आपत्तीने दिला आहे.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा