शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशातील रणांगणात भाजपाचं ८०:२० चं सूत्र आणि नरेंद्र मोदींचा ‘प्लॅन’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 05:49 IST

योगींनी हिंदुत्वावर बोलत राहायचे आणि मोदींनी विकासावर भर द्यायचा, हे सूत्र उत्तर प्रदेशात कायम असले, तरी भाजपने दिशा बदललेली दिसते!

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली

उत्तर प्रदेशात मतदानाच्या दुसऱ्या फेरीनंतर निवडणूक पंडित आपली सुरावट बदलू लागले आहेत. भाजपच्या दोन इंजिनांच्या सरकारने राज्यासाठी काय केले, यावर भर देण्यापेक्षा समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांनी पाच वर्षांपूर्वी राज्यात काय नुकसान केले, यावर भाजपचे वरिष्ठ नेते आगपाखड करताना दिसतात. पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा त्यांच्या प्रचार सभांमध्ये भीती आणि भयाची पेरणी करत आहेत. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल सत्तेवर आले तर राज्याचे वाटोळे करतील, असे ते म्हणतात. 

अमित शहा तर इथंवर सांगतात की, समाजवादी पार्टी - राष्ट्रीय लोकदल सत्तेवर आले तर सपावाले रालोदच्या जयंत चौधरी यांना बाजूला सारून आझम खान यांना आणतील. मुस्लीम आणि जाट यांच्यात जमत चाललेले सख्य मोडण्याचा हेतू यामागे दिसतो. २०१३च्या कैराना दंगलीची आठवणही भाजप नेते सातत्याने करून देतात. त्यावेळी मुस्लीम आणि जाट एकमेकांना भिडले होते. त्यातूनच २०१४ची लोकसभा निवडणूक आणि २०१७च्या विधानसभा निवडणुकीत सपाला मार खावा लागला होता. ‘एनडीए’ने सुरू केलेल्या सर्व कल्याणकारी योजना बंद होतील, असे सांगून मोदी हल्ला तीव्र करत आहेत. 

एका सपा नेत्याने आपल्या कुटुंबातील दोन डझनावर सदस्यांना बढती दिली, असे सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एकूण काय, भाजपच्या धोका लक्षात आला असून, आपल्या २० टक्क्यांहून अधिक विद्यमान आमदारांना पक्षाने तिकीट नाकारले आहे. आता परिस्थिती काबूत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा सत्तेवर आल्यावर काय काय मिळेल, याची यादी पक्षाने मतदारांना दिली आहे. मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर भाजपने निवडणुकीतले मुद्देही बदलले. कुठेही हिजाबचा मुद्दा उसळलेला नाही, हे विशेष! हिंदू-मुस्लीम यांच्यामधल्या दरीभोवती आता निवडणूक फिरत आहे. पुढच्या फेऱ्यांमध्ये त्याची फळे पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न भाजप करेल. मुख्यमंत्री योगी यांना अर्थातच त्याचा आनंद होईल. ते आणि त्यांचे समर्थक प्रारंभापासूनच ८० : २० हे सूत्र चालवत आहेत. योगींनी हिंदुत्वावर बोलत राहायचे आणि मोदींनी विकासावर भर द्यायचा!!

मोदी यांची काटेकोर आखणीजे. पी. नड्डा आणि अमित शहा यांना मोदी यांनी आधी निवडणुकीच्या खेळपट्टीवर उतरवले पण नंतर त्यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली. मोदी मैदानात उतरतात तेव्हा नीट आखणी झालेली असते. लोकसभेत ७ फेब्रुवारीला याची झलक पहिल्यांदा दिसली. ते ९० मिनिटे बोलले आणि त्यांनी राहुल गांधींना धुवून काढले. पाच राज्यांतील मतदारांना मोदींनी समोर ठेवलेले होते. गोव्यातल्या अपयशाबद्दल त्यांनी नेहरूंवर ठपका ठेवला तर १९८४च्या शीख हत्याकांडाबद्दल गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. मोदी शहेनशहासारखे वागतात, या राहुल यांच्या आरोपाने विचलित न होता मोदींनी पाच राज्यातले मतदार समोर ठेवून भाषण दिले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी राज्यसभेत आपले वाक्पटुत्व दाखवले. तिथेही त्यांचा भर पाच राज्यांतल्या निवडणुकांवर होता. 

९ फेब्रुवारीला तर आक्रीतच घडले. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली. बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी ती देशभर दाखवली. १० तारखेला उत्तर प्रदेशात पहिल्या फेरीतले मतदान होते. पुढचे तीन दिवस तेच चर्चेत राहिले. मोदी यांनी भक्तांवर तर मोहिनी टाकलीच पण कुंपणावरच्यांनाही प्रभावित केले. मोदी यांच्या नियोजनाला तोड नसते. प्रस्तुत लेखकाने १० पंतप्रधान पाहिले आहेत. इंदिरा गांधी वगळता इतके काटेकोर नियोजन कोणी केलेले कधी दिसलेले नाही.

पंजाबात भाजपला ‘आप’मुळे काळजीपंजाबात ‘आप’ने चांगला जोर दाखवल्याने भाजपची काळजी वाढली आहे. पंजाबात ‘आप’ची सरशी झाली तर अरविंद केजरीवाल यांना अखिल भारतीय वलय प्राप्त होईल. उत्तर प्रदेशात काॅंग्रेसला पर्याय म्हणून तो पक्ष उभा राहील. एकेकाळी संयुक्त जनता दलाच्या नितीश कुमार यांच्याकडे असा खमका पर्याय म्हणून पाहिले जात होते. परंतु, भाजपशी हातमिळवणी केल्यावर त्यांचा आलेख घसरला. ममताही काही राज्यांत असा प्रयत्न करत आहेत. पण पश्चिम बंगाल हे त्यांचे घरच त्या फारसे ठीक ठेवू शकलेल्या नाहीत. पंजाबात त्रिशंकू विधानसभा झाली तर भाजप पुन्हा अकालींना बरोबर घेईल का, हे आता बघायचे.

किल्ला प्रियांकांच्या कनवटीला!निवडणुकीच्या दोन फेऱ्या आटोपल्या तरी उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रचारक राहुल गांधी कुठेही न दिसणे हे एक आश्चर्यच होय. राहुल गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूरमध्ये दौरा करत आहेत. उत्तर प्रदेशात प्रचारापासून ते हातभर लांबच राहिले. भगिनी प्रियांकाकडे सूत्रे सोपविल्यावर उत्तर प्रदेशातल्या कोणत्याही नेत्याला त्यांनी चुचकारलेले नाही. प्रियांका टीव्ही वाहिन्यांना मुलाखती देत आहेत, पत्रकारांच्या प्रश्नांना सामोऱ्या जात आहेत हे त्यांचे बंधुराज राहुल यांच्या अगदी उलट आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी फजितवाडा झाल्यानंतर त्यांनी अशा मुलाखती देणे बंद करून टाकले. प्रियांका यांचे मात्र उलटे आहे. त्या नेहमी छान हसतात. सांगण्यासारखे फार नसल्याने लोकांवर त्या प्रभाव टाकू शकल्या नसतील पण राहुलपेक्षा माध्यमांशी त्यांनी छान जुळवून घेतलेले दिसते, हे मात्र नक्की! आश्चर्य म्हणजे त्या पंजाबातही दौरा करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ