शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य का मागतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 04:08 IST

एखाद्या प्रदेशावर सातत्याने अन्याय होऊ लागला, आपल्या बाबतीत पक्षपात होतोय अशी नागरिकांची भावना होऊ लागली की, तेथे असंतोष उफाळून येतो. स्वातंत्र्य मिळविण्याची इच्छा जोर धरू लागते. त्यासाठी आंदोलने, संघर्ष सुरू होतात. कर्नाटकात अशीच एक लढाई उभी राहू पाहत आहे.

- चंद्रकांत कित्तुरे

एखाद्या प्रदेशावर सातत्याने अन्याय होऊ लागला, आपल्या बाबतीत पक्षपात होतोय अशी नागरिकांची भावना होऊ लागली की, तेथे असंतोष उफाळून येतो. स्वातंत्र्य मिळविण्याची इच्छा जोर धरू लागते. त्यासाठी आंदोलने, संघर्ष सुरू होतात. कर्नाटकात अशीच एक लढाई उभी राहू पाहत आहे. उत्तर कर्नाटकला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी येत्या २ आॅगस्ट रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. १३ जिल्ह्यांत हा बंद पाळला जाणार आहे. यावरून कर्नाटकातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे.उत्तर कर्नाटक पूर्वीच्या हैदराबाद कर्नाटक आणि मुंबई कर्नाटक अशा दोन विभागांचा मिळून बनलेला आहे. यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, हुबळी, धारवाड, गदग, विजापूर, हावेरी, बिदर, बेल्लारी, गुलबर्गा, रायचूर, यादगीर आणि कोप्पल हे १३ जिल्हे येतात. देशातील थरच्या वाळवंटानंतर सर्वांत कमी पावसाचा प्रदेश म्हणून उत्तर कर्नाटक ओळखला जातो. बेळगाव, हुबळी, धारवाड वगळता अन्य जिल्हे हे दुष्काळप्रवण आहेत. मागासलेले आहेत. या तुलनेने कर्नाटकातील बंगलोर, म्हैसूर, आदी भागांचा मोठा विकास झाला आहे. वारंवार मागणी करूनही उत्तर कर्नाटकात विकासकामे म्हणावी तशी झालेली नाहीत, याचा असंतोष तेथील जनतेत आहे.महाराष्टÑात जाण्यासाठी लढा देणाऱ्या बेळगावात कर्नाटक सरकारने विधानसौध बांधले. वर्षातून एकदा तेथे अधिवेशनही घेण्यात येते. मात्र, तरीही राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत उत्तर कर्नाटक मागासलेला राहिला आहे. राज्यात मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच उत्तर कर्नाटकाने भाजपला सर्वाधिक आमदार दिले. निवडणुकीनंतर एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाचे सरकार सत्तेवर आले. नव्या सरकारमध्ये उत्तर कर्नाटकाला प्रतिनिधित्व अत्यल्प मिळाले आहे. गेल्या महिन्यात सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही.यामुळे या भागातील आमदार संतप्त झाले आहेत. त्यांनी कुमारस्वामी सरकारवर उत्तर कर्नाटकच्या बाबतीत पक्षपात करत असल्याचा आरोप करीत उत्तर कर्नाटक स्वतंत्र्य राज्य संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली २ आॅगस्टला १३ जिल्ह्यांत बंद पाळण्याची घोषणा केली आहे.कोणत्याही राज्याचे विभाजन करणे सोपे नाही. आधीच महाराष्ट्रात विदर्भ, आसाममध्ये बोडोलॅण्ड, गुजरातमध्ये सौराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये गुरखालॅण्ड, उत्तर प्रदेशात हरित प्रदेश, बुंदेलखंड, पूर्वांचल आणि अवध प्रदेश, तामिळनाडूत कोंगूनाडू येथेही स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आंदोलने होत आहेत. त्यात उत्तर कर्नाटकची नव्याने भर पडली आहे. ही मागणी मान्य होण्यासारखी नाही; पण आपल्यावर होणाºया अन्यायाला वाचा फोडणारी आहे. कर्नाटकातील राज्यकर्त्यांना उत्तर कर्नाटकच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. 

टॅग्स :Karnatakकर्नाटक