शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्मिलाचे शिवबंधन: काँग्रेसला ना खेद, ना खंत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:31 IST

तरुण नेते का नाराज आहेत, याचा विचार काँग्रेसने तातडीने करायला हवा. पण सध्या ना चर्चा, ना चिंतन अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे!

संजीव साबडे

वर्षभरापूर्वी काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढविलेली प्रख्यात व लोकप्रिय अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने अखेर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेत प्रवेश केला. ती शिवसेनेत जाणार, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होतीच.  विधान परिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या सदस्यांसाठी उद्धव ठाकरे सरकारने ज्या बारा जणांची शिफारस  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे,  त्यात ऊर्मिलाचे नाव आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांनी मिळून ही यादी तयार केली आणि शिवसेनेने ऊर्मिला मातोंडकरच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे ऊर्मिलाने हातावर शिवबंधन बांधून घेतल्याने आश्चर्य वाटण्याचे कारणच  नव्हते. 

पण ऊर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष का सोडला, तिच्यावर ती वेळ का आली, याचा आजतागायत काँग्रेस नेत्यांनी विचारच केला नाही. लोकसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाला काँग्रेसचे मुंबईतील काही नेतेच कारणीभूत असल्याची तक्रार तिने केली होती. ते नेते म्हणजे संजय निरूपम हे माहीत असूनही काँग्रेसचे केंद्रातील आणि राज्यातील नेते गप्प बसून राहिले. त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला नाही. ती पराभूत झाली असल्याने आता तिचा काय उपयोग, असा विचार त्यांनी केला असावा. जो पराभूत झाला, त्याचे महत्त्व संपले, असेच काँग्रेसजनांना कायमच वाटत आले आहे. 

गेले वर्षभर मुंबई काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. एकनाथ गायकवाड हंगामी अध्यक्ष आहेत आणि मुंबईकरांना ते नावाव्यतिरिक्त फारसे परिचितही नाहीत. मिलिंद देवरा काही काळ  अध्यक्ष होते. पण दक्षिण मुंबईवगळता शहराशी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध नव्हता. निरूपम केवळ पश्चिम उपनगरापुरते आणि त्यातही उत्तर भारतीय मंडळींत त्यांना स्थान. अशा वेळी भाजपविरुद्ध ठामपणे लढू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी काँग्रेसमध्ये स्वतःहून आलेल्या मराठमोळ्या ऊर्मिला मातोंडकरला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष केले असते, तिच्यामागे राज्य व केंद्रीय नेते उभे राहिले असते, तर तिने नक्कीच संधीचे सोने करून दाखविले असते. या नव्या नेतृत्वामुळे किमान काँग्रेस कार्यकर्ते तरी निश्चितच सक्रिय झाले असते. तिने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी खेद वा खंत व्यक्त करण्याऐवजी ‘ऊर्मिला मातोंडकर आत्ताही सत्ताधारी महाविकास आघाडीचाच भाग आहे’, असे अजब वक्तव्य केले. त्यामुळे तिच्या शिवसेनेत जाण्यास काँग्रेस नेतृत्वही जबाबदार आहे की काय अशीच शंका येते. ऊर्मिलाचे वक्तृत्व उत्तम आहे, राजकीय, सामाजिक प्रश्नांची तिला चांगली जाण आहे. ती सुसंस्कृत आहे, कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे  मिसळते, हे गेल्या निवडणुकीत लोकांनी पाहिले आहे. अनेकांना माहीत नसेल  कदाचित, तिच्यावर घरातच  समाजवादी चळवळीचे संस्कार झाले आहेत. तिच्या हिंदुत्वामध्येही सर्वधर्मसमभाव आहे, हे तिच्या  शिवसेनेतील प्रवेशानंतरच्या वक्तव्यांतून दिसून आले आहे.

तिने  भाजपशी लढण्यासाठी काँग्रेसची निवड केली होती. पण तो पक्ष भाजपशी लढू शकेल का, अशी शंका तिला येऊ लागली. लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसने केंद्र वा राज्य पातळीवर आत्मचिंतन केले नाही. जे चर्चा करू इच्छितात, त्यांच्यावर पक्षविरोधी असा शिक्का मारला जातो. मध्यंतरी मध्य प्रदेशातील तरुण नेते  ज्योतिरादित्य सिंदिया पक्ष सोडून गेले, राजस्थानातील सचिन पायलटही निघालेच होते, त्यांना कसेबसे थांबविले गेले. हे तरुण नेते का नाराज आहेत, त्यांना पक्षात पुढे आणण्यात आपण कमी पडत आहोत का, याचा विचार काँग्रेसने करायला हवा, आत्मचिंतन सतत व्हायला हवे. ते होत नसल्याने पक्ष अधिकाधिक दुबळा होताना दिसत आहे. अशा वेळी ऊर्मिला मातोंडकर   शिवसेनेत गेली, हे काँग्रेसचे नक्कीच नुकसान आहे. अर्थात तसा विचार तरी काँग्रेस नेते करतील का हा प्रश्नच आहे.  शिवसेनेचा मात्र फायदा झाला, हे नक्की ! भाजपशी लढण्यासाठी सेनेला चांगली महिला नेता मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेत निश्चितच आनंद असेल. पण काँग्रेसला तिच्या जाण्याचे काहीच वाटत नसेल तर परिस्थिती गंभीरच म्हणायला हवी.

(लेखक लोकमतचे समूह वृत्त समन्वयक आहेत) 

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस