शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एकता, तत्परता हाच खात्रीशीर मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:02 IST

कोरोनामृत्यू आणि नव्या लोकांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याउलट जेथे याबाबतीत शिथिलता आहे, तेथे या साथीला आटोक्यात ठेवणे कठीण जात आहे.

-एम. व्यंकय्या नायडूदेश सध्या एका गंभीर आरोग्यसंकटात आहे. कोरोना विषाणूचा जगभर प्रसार सुरूच आहे. आपण भारतात या महामारीचा चिंताजनक प्रसार रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’, ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि व्यक्तिगत स्वच्छता हे उपाय योजले आहेत. सामाजिक वर्तनाचे हे नवे मापदंड पाळल्याने आपल्याला फायदा झाला आहे. या उपायांचे जेथे कसोशीने पालन झाले, तेथील कोरोनामृत्यू आणि नव्या लोकांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याउलट जेथे याबाबतीत शिथिलता आहे, तेथे या साथीला आटोक्यात ठेवणे कठीण जात आहे.दिल्लीतील निजामुद्दीन येथील मोठ्या मेळाव्याच्या निमित्ताने हे कटू वास्तव देशापुढे आले; पण आपण इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून ढिलेपणा दाखवून नकारात्मक भूमिका घेतली तर काय होऊ शकते, याचा हा संदेश आहे. यातून याहून काही वेगळे अर्थ काढून एखाद्या ठरावीक समाजास दूषण देण्याने समाजात निष्कारण दुही माजेल. काही मूठभर लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजास आरोपी मानणे बरोबर होणार नाही.या महामारीने आपल्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आहे, हे मात्र नक्की. सण, उत्सव, सामाजिक आणि सांस्कृतिक समारंभांनी आपले सामाजिक जीवन समृद्ध होत असते. हे सर्व एकत्र जमून साजरे करतो. उत्साह व एकीने आनंद साजरा करण्याच्या मानवी प्रवृत्तीस ‘सोशल डिस्टन्सिंग’ मारक ठरणारे आहे; पण तरीही मोठा अनर्थ टाळण्यासाठी आपणही तुलनेने छोटे विस्कळितपण स्वत:हून स्वीकारले आहे. हे क्लेषदायक आहे हे खरे; पण कोरोनाविरुद्धचा लढा जिंकेपर्यंत आपल्याला हा कमी समाधानकारक मार्ग अनुसरणे अपरिहार्य आहे.

या आजाराचे स्वरूप व त्यासाठी घ्यायची काळजी, हे आपण नीटपणे समजून घ्यायला हवे. दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, कोरोनाबाधितांकडे संशयाने व तुच्छतेने पाहण्याऐवजी त्यांना चाचणी करून घेण्यास उद्युक्त केले, तर या साथीचा अधिक प्रभावी बंदोबस्त करता येईल. समाजातील स्थान वा धार्मिक विचार बाजूला ठेवून लोकांनी वैद्यकीय मदत घेण्यासाठी पुढे यायला हवे.खास करून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना संसर्गित रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले तसेच त्यांना वाईट वागणूक देण्याच्या अलीकडे घडलेल्या घटना हादेखील आणखी एक चिंतेचा विषय आहे. या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांकडे रोगाचा प्रसार करणारे म्हणून संशयाने पाहून त्यांना निवासाची सोय नाकारण्याचे प्रकारही घडले आहेत. डॉक्टरांविषयी पूर्वापार नितांत आदराची भावना बाळगली जाणाºया आपल्या देशात असे घडावे, हे केवळ दुर्दैवीच नव्हे, तर निंद्य आहे; त्यामुळे साथीचे रोगप्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून अशी कृत्ये दखलपात्र गुन्हा ठरवून त्यासाठी सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्याचे भारत सरकारने उचललेले पाऊल म्हणूनच अगदी योग्य आहे;
त्यामुळे आरोग्यसेवकांना भोगावा लागणारा हिंसाचार थांबेल, अशी आशा आहे. सरकारने ठरवून दिलेले निर्बंध लोक कसोशीने पाळत आहेत, याने मला आनंद होतो. धार्मिक रुढी व परंपरांचा पगडा दूर सारून सध्याच्या कठीण काळात उपासना आणि प्रार्थनेच्या पद्धती बदलण्याचे आवाहन सर्वच धर्मांचे नेते अनुयायांना करीत आहेत. आपले सामाजिक वर्तन गरजेनुसार बदलण्याची सकारात्मक भूमिका घेणे आपल्याला कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात नक्कीच साह्यभूत ठरेल. आपण शहाणपणाने, तत्परतेने व प्रतिबंधक उपायांकडे निरपेक्ष दृष्टीने पाहून वागलो तरच यात विजयी होऊ शकू. काळजी न घेता कोणताही समाज किंवा धर्म या रोगापासून कवचकुंडले देऊ शकत नाही.आपण एकदिलाने वागत असल्याने रामनवमी, बैशाखी, रमझान आणि इस्टर यांसारखे सण- उत्सव अगदी अंगवळणी पडल्यासारखे साधेपणाने साजरे करू शकतो, यानेही मला आनंद होतो. यंदा आपण आपापले धार्मिक पावित्र्य आणि शुचिता अशीच आपल्या हृदयात तसेच घरांमध्येच ठेवूया.(उपराष्ट्रपती)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या