शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश नव्हे मानसिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:03 IST

महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक स्तर खालावत चालल्याची ओरड सातत्याने होत असल्याचे पहायला मिळते. यामुळेच पगारदारांसह हातावर कमावणाऱ्या पालकांचीही पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये दाखल करण्याची तयारी असते.

महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक स्तर खालावत चालल्याची ओरड सातत्याने होत असल्याचे पहायला मिळते. यामुळेच पगारदारांसह हातावर कमावणाऱ्या पालकांचीही पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये दाखल करण्याची तयारी असते. खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी पालक पहाटेपासून रांगा लावतात. तर सरकारी शाळांतील शिक्षकांना मुलांचा शोध घेण्यासाठी वस्ती-वस्तीत फिरावे लागते. याच जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांनी मोठमोठे संशोधक, अधिकारी घडविले आहेत. मात्र, सद्यस्थितीत याचा विसर पालकांसह प्रशासनाला व शिक्षण व्यवस्थेलाही पडला आहे. मुळात सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच उदासीन झाला आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी अधून मधून काहीसे प्रयत्न होताना दिसतात. मात्र, त्या प्रयत्नांना सरकार, प्रशासनाचे पाहिजे तसे पाठबळ मिळत नाही. साधे गणवेशाचेच बघाना. गेल्यावर्षी शाळेचे अर्धे सत्र संपले पण नागपूर महापालिकेच्या शाळेत शिकणाºया सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. मिळाले ते टिकावू नव्हते. यावर्षी शाळा सुरू होताच गणवेश देण्यासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, गणवेश मिळेल तोच दिवस खरा. जिल्हा परिषदेने यापुढे एक पाऊल टाकत गरीब विद्यार्थ्यांची थट्टाच चालविली आहे. इतिहासात पहिल्यांदा गेल्यावर्षी हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. २०१६ पर्यंत गणवेशाचे वाटप हे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून होत होते. शाळा व्यवस्थापन समिती तडजोड करून, सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करीत होती. मात्र, डीबीटीमुळे खाते उघडू न शकल्याने एससी, एसटी व बीपीएलच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही. आता जि.प.च्या शिक्षण विभागाने इतर मागासवर्गीय व खुल्या संवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी योजना आखली. हे पाऊल कौतुकास्पद आहे. मात्र, त्यासाठी बजेटमध्ये फक्त १०० रुपयांची तरतूद केली हे तेवढेच संतापजनक अन् क्लेषदायक आहे. १० हजारावर विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी करण्यात आलेली ही ‘भरीव’ तरतूद सरकारी शाळांमधील शिक्षणाप्रती सरकार किती गंभीर आहे, हे दाखवून देण्यासाठी पुरेशी आहे. मुळात अंगावर गणवेश असला म्हणजेच शैक्षणिक दर्जा उंचावतो असे नाही. मात्र, सद्यस्थितीत सरकारी शाळांमध्ये शिकणाºया मुलांच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला तर हे गणवेश गरीब विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मोठा मानसिक आधार देण्याचे काम करतात. परिस्थितीशी झगडणाºया या गुणवंतांचे हे मानसशास्त्रही समजून घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Schoolशाळा