शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ समाजमन व्हावे सहनशील

By admin | Updated: November 17, 2016 05:12 IST

पृथ्वीवर सर्वत्र शांतता पसरावी, मानवी बुद्धिमत्ता आणि एकजूट यांचा वापर करून सहिष्णुतेचे वातावरण सर्वत्र निर्माण व्हावे,

पृथ्वीवर सर्वत्र शांतता पसरावी, मानवी बुद्धिमत्ता आणि एकजूट यांचा वापर करून सहिष्णुतेचे वातावरण सर्वत्र निर्माण व्हावे, या उद्देशाने युनेस्कोने १६ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिवस म्हणून साजरा करावयाचे ठरवले. आजचे जग दहशतवाद, जातीयवाद, हिंसा, प्रांतीयवाद, तीव्र राष्ट्रीयता, मूलतत्त्ववाद आदींमुळे अस्वस्थ आहे. त्यासाठी जगातील सर्व देशांनी पुढाकार घेऊन जात, धर्म, भाषा, लिंंग, राष्ट्र असे भेदभाव बाजूला सारून सकल मानवतेच्या कल्याणाच्या दिशेने सहनशीलतेची कास धरली पाहिजे, ही मूळ संकल्पना आहे. सहनशीलता एक सद्गुणच आहे. समाजातील मतभिन्नता किंंवा दुसऱ्याचे मत लादून घेणे म्हणजे सहनशीलता नव्हे, तर परस्परांवरील आदराने आणि एकमेकांशी समझोता करून जगण्याचा तो एक मार्ग आहे. शिक्षण हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरावे. एकमेकांवरील दृढ विश्वास हेही सहनशील समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असू शकते. समाजाची बांधिलकी या चळवळीसाठी आवश्यक आहे. पण आजच्या टेक्नोसॅव्ही युगात या सर्वांमधील सकारात्मक पाहणे, त्याचा अवलंब करणे हे एक मोठे आव्हान आहे. मानवी व्यवहारांकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे. आज व्यक्तिगत पातळीवर विचार करता नातेसंबंधांमधील ताणतणाव, व्यक्तीव्यक्तींमधील अविश्वासाचे वातावरण, पतीपत्नींमधील दुरावा या सर्वांकडे सहिष्णू वृत्तीने पाहिले तर सहनशीलतेचे, विचारांच्या आदानप्रदानाचे व त्यामधून मार्ग काढण्याचे महत्त्व समजावून घेता येईल. समाजातील विविध घटकांना, मग ते धार्मिक असोत, जातीय असोत, भाषेचे असोत, त्यांच्या मानवी हक्कांची जोपासना करताना खेळीमेळीचे, विचारांच्या आदानप्रदानाचे वातावरण कसे राहील, याचा विचार ही काळाची गरज आहे. भारतामध्ये अठरापगड जातींच्या समाजामध्ये सहिष्णुतेची मूल्ये जोपासताना सहनशीलतेची शिकवण संस्कारक्षम वयापासून देणे गरजेचे आहे. यासाठी संतांच्या शिकवणीला पर्याय राहत नाही. संतांच्या शिकवणीबरोबरच अन्य साहित्य, कला, संस्कृती यांच्या माध्यमातून विचारांचा हा नंदादीप सदैव तेवता ठेवला पाहिजे. विविध भाषा, रूढी, परंपरा असलेला समाज एकत्रित वावरताना त्या त्या संस्कृतीचे, विचारांचे मीलन होऊ शकले तर एकमेकांप्रती आदर, प्रेम, ममता यांचे वातावरण होण्यास सहकार्य होईल. याच दृष्टिकोनातून गेल्या वर्षी घुमान येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाकडे पाहता येईल. मराठी साहित्याचा गजर पंजाबमध्ये निनादला. यातून सकारात्मक वातावरण तयार झाले. याचेच द्योतक म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये पंजाबी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. पंजाबमधील संस्कृती, साहित्य, गुरू नानक साहेब, संत नामदेव यांच्या साहित्याचा गजर महाराष्ट्रात होत आहे. दोन भिन्न परंपरा असलेल्या समाजातील, भाषेतील समाज एकत्र येणार असेल तर यातून विचारस्वातंत्र्याचे नवे आयाम समोर येतील. एकमेकांप्रतीचा आदर वाढण्यास निर्माण होणारे वातावरण सकारात्मक राहील. मानवी मूलभूत हक्कांची जोपासना करीत असताना मानवतेची अस्मिता जपताना, युद्धाच्या, जातीपातीवरून होत असलेल्या कलहांच्या अरिष्टापासून वाचविण्यासाठी असहिष्णुता, असहनशीलता यांचा अंत व्हावा व मानवामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण व्हायला हवे. सहनशीलता म्हणजे दुर्बलता नव्हे; तर विवेकाने, सकारात्मकतेने कोणत्याही परिस्थितीला कणखरपणे सामोरे जाण्याचे, सकारात्मक मार्ग काढण्याचे व प्रगतीकडे वाटचाल करण्याचे माध्यम आहे. भारताला गेल्या शतकात ही सहनशीलतेची प्रेरणा महात्मा गांधी यांनी दिली. त्यांनी दाखविलेल्या अहिंंसेच्या मार्गावरून आजही पुढे वाटचाल केली तर ते मानवाला प्रगतीकडे नेण्याचे समर्थ साधन बनेल. सहनशीलता वृध्दींगत होणे गरजेचे आहे. - विजय बाविस्कर