शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

अस्वस्थ सरकारी वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:54 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलेल्या टीकेमुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसरली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलेल्या टीकेमुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसरली. आजवर ज्यांना आपण ‘आपला मानुस’ समजत होतो; त्यांनीच सरकारची लक्तरं अशी वेशीवर टांगणे रुचत नाही. आम्हाला जर त्यांच्या भाषणाचा मसुदा आगाऊ समजला असता तर, संमेलनाचे अनुदान दुप्पट करून, या आश्वासनावर त्यांच्या भाषणातील ‘आजचे अस्वस्थ वर्तमान’ आणि ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हे मुद्देच वगळून टाकण्यास आम्ही साहित्य महामंडळास भाग पाडले असते. महामंडळाचे अध्यक्ष वैदर्भीय असताना त्यांनीही आम्हांस असे गाफील ठेवावे? यात नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असले पाहिजे. देशमुखांच्या ‘पाणी! पाणी!!’ या कथेवर तात्काळ बंदी आणली पाहिजे. गुजरातच्या भूमीतून आपल्या सरकारवर अशी जाहीरपणे आगडपाखड करणे, हे बापूंना (आसाराम नव्हे!) तरी आवडले असते का? सरकारी पैशाने संमेलनाचा मांडव टाकायचा आणि वरून शासनावरच टीका करायची? छे!छे! हा तर सरळ-सरळ सरकारद्रोहच आहे. त्यामुळे तातडीने हक्कभंग ठराव आणला पाहिजे. त्यासाठी बांधकाम मंत्र्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. कुठल्याही ‘साहित्या’वर डांबर कसे ओतावे, हे त्यांच्याखेरीज इतरांना जमणारे नाही. शिवाय, त्यांना मराठी, हिंदी, गुजराती व कानडीत उत्तम गाता येतं, त्यामुळे एकाअर्थी ते बहुभाषिक साहित्यिकच! त्यामुळे सीएमनी तातडीने सा.बां.मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि एकनाथ खडसे, नारायण राणे या ‘अस्वस्थांचा’ समावेश असलेली एक मसुदा समिती गठित केली. समिती सदस्यांनी रात्र-रात्र जागून हक्कभंग ठरावाचा मसुदा तयार केला. त्यातील काही ‘विनोदी’ भाग वगळून सांस्कृतिकमंत्र्यांनी तो मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे सादर केला..................माननीय अध्यक्ष,(अ.भा.म.सा.सं, बडोदा-गुजरात)आम्ही येथे नम्रपणे नोंदवू इच्छितो की, आपण दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी केलेल्या अध्यक्षीय भाषणाने आजवरच्या रुढी-परंपरेचा संकेतभंग, अतिथींचा मुखभंग, आयोजकांचा मानभंग आणि सरकारचा हक्कभंग झाला आहे! सध्याच्या राजकीय व्यवस्थेमुळे आजचे वर्तमान अस्वस्थ बनले आहे; हा आपला आरोप निखालस खोटा, पूर्णत: निराधार आणि सरकारी पक्षावर अन्याय करणारा आहे. वस्तुत: अस्वस्थ वर्तमानास सरकार नव्हे, तर साहित्यिक, चित्रकार, पत्रकार, कलाकार अशी समस्त मंडळीच जबाबदार आहे. आजवरच्या साहित्यात आम्हा राजकारण्यांना खलनायक ठरवून आमची प्रतिमा मलिन करण्यात आली. कथा, कांदबºया, चित्रपट आणि वृत्तपत्रीय लिखाणात राजकीय मंडळींच्या सद्गुणांची साधी दखलही घेण्यात आली नाही. एकाही चित्रपटात आम्हांस नायक न बनवून आमचे कर्तृत्व दुर्लक्षित ठेवले गेले. सरकारी अनुदान, पुरस्कार घेऊन आमच्याबद्दलच असे अनुदार उद्गार काढणे हा अवमान असून ही सभा आपणांवर हक्कभंग आणत आहे!ता.क.- साहित्य संमेलनाचे अनुदान दुप्पट करण्याची घोषणा मागे घेण्यात येत आहे!!- नंदकिशोर पाटील

(nandu.patil@lokmat.com)  

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन