शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अस्वस्थ सरकारी वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:54 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलेल्या टीकेमुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसरली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलेल्या टीकेमुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसरली. आजवर ज्यांना आपण ‘आपला मानुस’ समजत होतो; त्यांनीच सरकारची लक्तरं अशी वेशीवर टांगणे रुचत नाही. आम्हाला जर त्यांच्या भाषणाचा मसुदा आगाऊ समजला असता तर, संमेलनाचे अनुदान दुप्पट करून, या आश्वासनावर त्यांच्या भाषणातील ‘आजचे अस्वस्थ वर्तमान’ आणि ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हे मुद्देच वगळून टाकण्यास आम्ही साहित्य महामंडळास भाग पाडले असते. महामंडळाचे अध्यक्ष वैदर्भीय असताना त्यांनीही आम्हांस असे गाफील ठेवावे? यात नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असले पाहिजे. देशमुखांच्या ‘पाणी! पाणी!!’ या कथेवर तात्काळ बंदी आणली पाहिजे. गुजरातच्या भूमीतून आपल्या सरकारवर अशी जाहीरपणे आगडपाखड करणे, हे बापूंना (आसाराम नव्हे!) तरी आवडले असते का? सरकारी पैशाने संमेलनाचा मांडव टाकायचा आणि वरून शासनावरच टीका करायची? छे!छे! हा तर सरळ-सरळ सरकारद्रोहच आहे. त्यामुळे तातडीने हक्कभंग ठराव आणला पाहिजे. त्यासाठी बांधकाम मंत्र्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. कुठल्याही ‘साहित्या’वर डांबर कसे ओतावे, हे त्यांच्याखेरीज इतरांना जमणारे नाही. शिवाय, त्यांना मराठी, हिंदी, गुजराती व कानडीत उत्तम गाता येतं, त्यामुळे एकाअर्थी ते बहुभाषिक साहित्यिकच! त्यामुळे सीएमनी तातडीने सा.बां.मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि एकनाथ खडसे, नारायण राणे या ‘अस्वस्थांचा’ समावेश असलेली एक मसुदा समिती गठित केली. समिती सदस्यांनी रात्र-रात्र जागून हक्कभंग ठरावाचा मसुदा तयार केला. त्यातील काही ‘विनोदी’ भाग वगळून सांस्कृतिकमंत्र्यांनी तो मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे सादर केला..................माननीय अध्यक्ष,(अ.भा.म.सा.सं, बडोदा-गुजरात)आम्ही येथे नम्रपणे नोंदवू इच्छितो की, आपण दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी केलेल्या अध्यक्षीय भाषणाने आजवरच्या रुढी-परंपरेचा संकेतभंग, अतिथींचा मुखभंग, आयोजकांचा मानभंग आणि सरकारचा हक्कभंग झाला आहे! सध्याच्या राजकीय व्यवस्थेमुळे आजचे वर्तमान अस्वस्थ बनले आहे; हा आपला आरोप निखालस खोटा, पूर्णत: निराधार आणि सरकारी पक्षावर अन्याय करणारा आहे. वस्तुत: अस्वस्थ वर्तमानास सरकार नव्हे, तर साहित्यिक, चित्रकार, पत्रकार, कलाकार अशी समस्त मंडळीच जबाबदार आहे. आजवरच्या साहित्यात आम्हा राजकारण्यांना खलनायक ठरवून आमची प्रतिमा मलिन करण्यात आली. कथा, कांदबºया, चित्रपट आणि वृत्तपत्रीय लिखाणात राजकीय मंडळींच्या सद्गुणांची साधी दखलही घेण्यात आली नाही. एकाही चित्रपटात आम्हांस नायक न बनवून आमचे कर्तृत्व दुर्लक्षित ठेवले गेले. सरकारी अनुदान, पुरस्कार घेऊन आमच्याबद्दलच असे अनुदार उद्गार काढणे हा अवमान असून ही सभा आपणांवर हक्कभंग आणत आहे!ता.क.- साहित्य संमेलनाचे अनुदान दुप्पट करण्याची घोषणा मागे घेण्यात येत आहे!!- नंदकिशोर पाटील

(nandu.patil@lokmat.com)  

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन