शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

पराधीन आहे जगती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 03:18 IST

लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते.

लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. असं म्हणतात, रक्ताची नाती घट्ट असतात; पण आई-वडिलांना वाळीत टाकण्याच्या घटनांचा वाढत चाललेला आलेख या नात्यालाच संपुष्टात आणू पाहात आहे.वडिलांच्या मृत्यूची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद! पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. तुम्हीच परस्पर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा.. मला त्यांची संपत्तीही नको...’ या आशयाचा मेल पाठवून अमेरिकेत राहणारा केल्विन जन्मदात्या पित्यालाच नाकारतो तेव्हा रक्ताची नाती घट्ट असल्याची म्हण धादांत खोटी ठरते. परवा मुंबईत फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो या वृद्धाचा एकांतवासात मृत्यू झाला. ज्या मुलाला जन्म दिला, शिकविले, त्याच्यासाठी अनेक रात्र जागून काढल्या त्याच मुलाने आपल्या अंत्यसंस्काराचा विधी एवढ्या निष्ठूरपणे नाकारावा, ही बाब या गंभीर घटनेमुळे सर्वांना अंतर्मुख करणारी आहे. विशेषत: माता-पिता आणि मुलांसाठी. मुलाला उच्च शिक्षण दिले. तो परदेशात गेला तेथेच स्थायिक झाला आणि जन्मदाता पित्याला विसरला. आईला मात्र त्याने अमेरिकेत बोलावून घेतले. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून एकांतवासाच्या काळोखात जीवन कंठत असलेल्या फ्रान्सिस यांनी कुटुंबाच्या विरहात जगाचा निरोप घेतला. समाजमन सुन्न करणाºया या घटनेचे विविध पैलू असू शकतात. कुटुंबातील कलह हेदेखील एक कारण असू शकते. परंतु कितीही मतभेद असले तरी कुणी जन्मदात्यांना अडगळीत टाकावे का, हा प्रश्न प्रत्येक मुलाने स्वत:ला विचारायला हवा. पुत्र प्राप्तीसाठी देवाला साकडे घालणारे, तो जन्मताच आनंदोत्सव साजरा करणारे, त्याच्या शिक्षणासाठी धडपड करणारे, प्रसंगी घर गहाण ठेवून त्याला परदेशात पाठविणारे आई-वडील जेव्हा एकांतवास भोगतात तेव्हा आपण केलेला त्याग व्यर्थ गेल्याची भावना त्यांच्या मनात घर करते; पण ते काही बोलत नाही. कुणाकडे तक्रारही करीत नाही. मुलगा, सून कशी आहे, विचारल्यावर त्यांच्याबद्दल चांगलेच सांगणाºया या जन्मदात्यांवर अखेर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते.म्हातारपणात आपला सांभाळ करण्याची अपेक्षा करणाºया अनेकांच्या वाट्याला एकांतवासाचे चटके येतात. बोलता, बोलता एक मित्र म्हणाला, मी पन्नाशी गाठली असली तरी आजही म्हाताºया बापाचा धाक वाटतो. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत होत नाही. अशीही मुलं आहेत समाजात ज्यांना आपल्या जन्मदात्याची कायम आदरयुक्त भीती असते. ती असायला हवी. कारण हीच आदरयुक्त भीती भावी पिढी घडविते. परंतु हल्ली याचे प्रमाण अत्यल्प आहे.लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. असं म्हणतात, रक्ताची नाती घट्ट असतात; पण आई-वडिलांना वाळीत टाकण्याच्या घटनांचा वाढत चाललेला आलेख या नात्यालाच संपुष्टात आणू पाहात आहे. एकंदरीत सर्वांना अस्वस्थ करणारा हा विषय सामाजिक प्रश्नाची व्याप्ती वाढविणारा आहे. शत्रुच्याही अंत्ययात्रेला जाण्याची आपली संस्कृती आहे. मात्र मुंबईतील घटनेने ‘पराधीन आहे जगती...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.