शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पराधीन आहे जगती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 03:18 IST

लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते.

लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. असं म्हणतात, रक्ताची नाती घट्ट असतात; पण आई-वडिलांना वाळीत टाकण्याच्या घटनांचा वाढत चाललेला आलेख या नात्यालाच संपुष्टात आणू पाहात आहे.वडिलांच्या मृत्यूची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद! पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. तुम्हीच परस्पर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा.. मला त्यांची संपत्तीही नको...’ या आशयाचा मेल पाठवून अमेरिकेत राहणारा केल्विन जन्मदात्या पित्यालाच नाकारतो तेव्हा रक्ताची नाती घट्ट असल्याची म्हण धादांत खोटी ठरते. परवा मुंबईत फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो या वृद्धाचा एकांतवासात मृत्यू झाला. ज्या मुलाला जन्म दिला, शिकविले, त्याच्यासाठी अनेक रात्र जागून काढल्या त्याच मुलाने आपल्या अंत्यसंस्काराचा विधी एवढ्या निष्ठूरपणे नाकारावा, ही बाब या गंभीर घटनेमुळे सर्वांना अंतर्मुख करणारी आहे. विशेषत: माता-पिता आणि मुलांसाठी. मुलाला उच्च शिक्षण दिले. तो परदेशात गेला तेथेच स्थायिक झाला आणि जन्मदाता पित्याला विसरला. आईला मात्र त्याने अमेरिकेत बोलावून घेतले. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून एकांतवासाच्या काळोखात जीवन कंठत असलेल्या फ्रान्सिस यांनी कुटुंबाच्या विरहात जगाचा निरोप घेतला. समाजमन सुन्न करणाºया या घटनेचे विविध पैलू असू शकतात. कुटुंबातील कलह हेदेखील एक कारण असू शकते. परंतु कितीही मतभेद असले तरी कुणी जन्मदात्यांना अडगळीत टाकावे का, हा प्रश्न प्रत्येक मुलाने स्वत:ला विचारायला हवा. पुत्र प्राप्तीसाठी देवाला साकडे घालणारे, तो जन्मताच आनंदोत्सव साजरा करणारे, त्याच्या शिक्षणासाठी धडपड करणारे, प्रसंगी घर गहाण ठेवून त्याला परदेशात पाठविणारे आई-वडील जेव्हा एकांतवास भोगतात तेव्हा आपण केलेला त्याग व्यर्थ गेल्याची भावना त्यांच्या मनात घर करते; पण ते काही बोलत नाही. कुणाकडे तक्रारही करीत नाही. मुलगा, सून कशी आहे, विचारल्यावर त्यांच्याबद्दल चांगलेच सांगणाºया या जन्मदात्यांवर अखेर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते.म्हातारपणात आपला सांभाळ करण्याची अपेक्षा करणाºया अनेकांच्या वाट्याला एकांतवासाचे चटके येतात. बोलता, बोलता एक मित्र म्हणाला, मी पन्नाशी गाठली असली तरी आजही म्हाताºया बापाचा धाक वाटतो. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत होत नाही. अशीही मुलं आहेत समाजात ज्यांना आपल्या जन्मदात्याची कायम आदरयुक्त भीती असते. ती असायला हवी. कारण हीच आदरयुक्त भीती भावी पिढी घडविते. परंतु हल्ली याचे प्रमाण अत्यल्प आहे.लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. असं म्हणतात, रक्ताची नाती घट्ट असतात; पण आई-वडिलांना वाळीत टाकण्याच्या घटनांचा वाढत चाललेला आलेख या नात्यालाच संपुष्टात आणू पाहात आहे. एकंदरीत सर्वांना अस्वस्थ करणारा हा विषय सामाजिक प्रश्नाची व्याप्ती वाढविणारा आहे. शत्रुच्याही अंत्ययात्रेला जाण्याची आपली संस्कृती आहे. मात्र मुंबईतील घटनेने ‘पराधीन आहे जगती...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.