शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

उबग आणणारी संवेदनहीनता

By admin | Updated: January 29, 2016 03:52 IST

रोजरोजच घडणाऱ्या गोष्टींबद्दल गांभीर्य न बाळगण्याची म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी मानसिकता सार्वजनिक वा सरकारी पातळीवरील कामकाजासंदर्भातही किती प्रबळ होत चालली

- किरण अग्रवालरोजरोजच घडणाऱ्या गोष्टींबद्दल गांभीर्य न बाळगण्याची म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी मानसिकता सार्वजनिक वा सरकारी पातळीवरील कामकाजासंदर्भातही किती प्रबळ होत चालली आहे, हे नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयातील कारभारावरून पुरते स्पष्ट व्हावे. सातत्याने वेगवेगळ्या आंदोलनांना व पुरवठ्याशी संबंधित गडबडींना सामोरे जावे लागूनही या आयुक्तालयाच्या कारभारात सुधारणा होताना दिसू नये हे केवळ आश्चर्याचेच नसून, या विभागात ‘अच्छे दिन’ येण्याची आस बाळगून असणाऱ्यांचा अपेक्षाभंग करणारेही म्हणावयास हवे.आदिवासींच्या विकासाकरिता केंद्र व राज्य शासनानेही अनेकविध योजना आखल्या आणि आतापर्यंत त्यावर कोट्यवधी रुपये खर्चिले गेले असले तरी, त्यातून अपेक्षित विकास घडून आल्याचे दिसून येऊ शकलेले नाही ही वास्तविकता आहे. यात केल्या जात असलेल्या खर्चातील फोलपणा तर आहेच, शिवाय खर्च न होता परत जाणारा निधीही असल्याचे दिसून येते. राज्य शासनाचा विचार करायचा तर यंदा सुमारे सहा हजार कोटींचे, म्हणजे इतर विभागांच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक खर्चाचे बजेट आदिवासी विकास विभागासाठी प्रस्तावित आहे. पण दोन महिन्यांवर मार्च एण्ड येऊनही यातील निम्मासुद्धा निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे आता आर्थिक वर्षअखेरीस कशी कामे हाती घेतली जातील आणि त्यांची देयके अदा होतील, हे अधिक उलगडून सांगण्याची गरज नसावी. विद्यार्थ्यांना पावसाळ्यात द्यावयाचे रेनकोट देता देता अखेर लोकरीचे स्वेटर खरेदी करण्याचा निर्णय या विभागाने घेतला, पण तोही संशयास्पद ठरला; यावरूनच यातील गोलमालाची पुरेशी कल्पना यावी. विशेष म्हणजे, आदिवासी भागातील रस्ते व अन्य सोयीसुविधांसह शैक्षणिक क्षेत्रातील आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहातील स्थिती अधिक दयनीय आहे. नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयासमोर होणारी नित्याची आंदोलने त्याची साक्ष ठरावीत.आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळत नसल्याची तसेच वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार नेहमीच केली जाऊनही त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले जात नाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्रीच्या विद्यार्थ्यांना ऐन थंडीत कुडकुडत आठ दिवसांचा पायी प्रवास करून नाशिक गाठण्याची गरज त्यामुळेच भासली. त्याहीपूर्वी शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना आठ दिवस नाशकातील आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडावा लागला होता. तळोदा येथील विद्यार्थीही लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात आंदोलनाला आले होते, तर कळवण तालुक्यातील नाकोडा येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट भोजनाच्या निषेधार्थ जेवणावर बहिष्कार टाकून उपाशीपोटी नाशिकचा रस्ता धरला होता. असे कायम कुणाचे न कुणाचे आंदोलन आदिवासी आयुक्तालयावर सुरू असते, पण प्रत्येकवेळी थातूरमातूर आश्वासने देऊन वेळ निभावली जाते आणि ‘मागचे पाढे पच्चावन्न’ झाल्यागत स्थिती होते. संवेदनाच बोथट झाल्याचा जो अनुभव यातून येतो तो उबग आणि चीड आणणाराही आहे. वसतिगृहातील जेवणाच्या निकृष्टतेबद्दलच्या एकसारख्या तक्रारींसाठी वेळोवेळी आंदोलने केली जाऊनही त्यात सुधारणा होत नसेल, तर त्यातून आदिवासी विद्यार्थ्यांऐवजी नेमके कुणाचे ‘पोषण’ होत आहे असा प्रश्न उपस्थित होणारच. पण दुर्दैव म्हणजे आदिवासी जमातीत इतर कुणाचा समावेश करण्याची चर्चा होताच तावातावाने पुढे येऊन त्यास विरोध करणारे या जमातीतील नेतृत्वही यासंदर्भात मात्र मिठाची गुळणी धरून गप्प राहतात. ना सरकारमधले मंत्री काही करत, ना विरोधातले. त्यामुळे आदिवासींच्या आयुष्यातही ‘अच्छे दिन’ येण्याची स्वप्ने धूसरच ठरली आहेत.