शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

दोन लग्नाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:40 IST

सांगली आणि साताऱ्यात दोन अनोखे विवाह सोहळे पार पडले. समतेचे विचार रुजविण्यासाठी आणि अनिष्ट चालीरीतींना मूठमाती देण्यासाठी असे विवाहसोहळे आवश्यक आहेत.

- चंद्रकांत कित्तुरे

लग्न म्हणजे दोन जिवांना रेशीमगाठीत बांधणे. मनुष्यप्राण्याच्या आयुष्यात या लग्नाला खूप महत्त्व आहे. लग्न कसे करावे याबाबत हिंदू समाजात अनेक प्रकार आहेत. त्याला विवाहपद्धती म्हणतात. जाती- धर्मानुसार ते होत असले तरी त्यामध्ये बदल होत असतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत या विवाहसोहळ्यांचा थाट काही औरच असतो. पूर्वी हे सोहळे सात दिवस चालायचे. अलीकडच्या काळात ते एका दिवसावर आले आहेत. या सोहळ्यांमध्ये प्रथा आणि परंपरा याला मोठे महत्त्व असते. मात्र, काळानुरूप यामध्ये बदल होऊ लागले आहेत. असेच दोन आगळेवेगळे विवाहसोहळे सांगली आणि साताºयात पार पडले. रुढी, परंपरांमध्ये जखडलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे, पुरोगामित्वाचे एक पाऊल पुढे टाकणारे असेच या विवाह सोहळ्यांचे वर्णन करावे लागेल.यातील पहिला विवाह सोहळा सांगलीत झाला. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे या विवाहात पौरोहित्य एका महिलेने म्हणजेच वधूच्या मातेने केले. डॉ. निर्मला पाटील असे त्यांचे नाव. मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या त्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यांचे पती डॉ. सुधीर पाटील. दोघेही वैद्यकीय व्यवसाय करतात. समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरा यांना या दाम्पत्याचा विरोध आहे. डॉ. निर्मला पाटील यांनी तर याबाबत समाज प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे. ठिकठिकाणी त्या व्याख्यानेही देतात. विवाह संस्कारात महिलांना स्थान नसते, पण याला होणारा विरोध मोडून काढत शिवविवाह पद्धतीने होणाºया विवाहसोहळ्यात पौराहित्य करण्यास त्यांनी प्रारंभ केला. आतापर्यंत सुमारे ४० विवाहांमध्ये त्यांनी पौरोहित्य केले आहे. या दाम्पत्याची कन्या अक्षया ही डॉक्टर झाली आहे. तिचा विवाह ६ मे रोजी शिवविवाह पद्धतीने पार पडला. या सोहळ्याचे पौरोहित्यही डॉ. निर्मला यांनीच केले. कन्येच्या विवाहाचे पौरोहित्य तिच्या मातेनेच करणे ही महाराष्टÑातील पहिलीच घटना असावी. या विवाह सोहळ्यात सर्व कर्मकांडांना फाटा देण्यात आला होता. शिवसप्तकावेळी उपस्थितांनी अक्षता न टाकता टाळ्या वाजवून वधू-वरांचे अभिनंदन केले. कुणीही आहेर अथवा पुष्पगुच्छ आणला नव्हता. उलट सिंदखेडराजा येथे उभारण्यात येणाºया जिजाऊ सृष्टीसाठी देणगी पेटी ठेवण्यात आली होती.दुसरा विवाह साताºयात रविवारी पार पडला. प्रतापसिंहनगरात राहणारे गोकुळदास निवृत्ती उदागे व पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील सुप्रिया शिंदे यांच्या या विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्चाला फाटा देत गोकुळदास उदागे यांनी समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची सुमारे एक हजार पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. जाती-पातीच्या भिंती तोडून या समाजात थोर महापुरुषांचे विचार रुजविण्याबरोबरच सर्वांमध्ये समता व बंधुता निर्माण करण्यासाठी ही पुस्तके प्रेरणादायी ठरतील, असा त्यांचा विश्वास आहे. शनिवारीच इंग्लंडचा प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेघन मार्केल यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्याची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. आपल्याकडेही राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटीजचे विवाहसोहळे चर्चेचे ठरतात. त्याचप्रमाणे पुरोगामी पाऊल टाकणाºया या दोन विवाह सोहळ्यांची चर्चा व्हायला हवी. विवाह समारंभातील अनिष्ट चालीरीती, कर्मकांडांना मूठमाती देण्यासाठी समाजानेही अशा विवाह सोहळ्यांचे अनुकरण करायला हवे.

टॅग्स :marriageलग्न