शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

देवाशपथ खरे सांगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:32 IST

न्यायदानाला विलंब करणे म्हणजे न्याय नाकारणे, हे कायद्याचे सर्वमान्य तत्त्व आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मोहटे येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट या न्यासाच्या चौकशीबाबत जे काही सुरू आहे, ते असेच दिसते.

न्यायदानाला विलंब करणे म्हणजे न्याय नाकारणे, हे कायद्याचे सर्वमान्य तत्त्व आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मोहटे येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट या न्यासाच्या चौकशीबाबत जे काही सुरू आहे, ते असेच दिसते. मोहटा हे नामांकित देवस्थान आहे. या देवस्थानचे वैशिष्ट्य हे की जिल्हा न्यायाधीश त्याचे अध्यक्ष आहेत. राज्यात अशी काही निवडक देवस्थाने आहेत जेथे न्यायाधीश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मोहटा देवस्थानच्या व्यवस्थापनाबाबत धर्मादाय आयुक्तांकडे २०११ पासून तक्रारी आहेत. न्यायालयात जनहित याचिकाही आहे. मात्र, या तक्रारी व निवाडा निष्कर्षापर्यंत जायला तयार नाही. त्यामुळे देवस्थानचे व्यवस्थापन दोषी की उपस्थित झालेल्या शंका तथ्यहीन, याचा सोक्षमोक्षच होत नाही. या देवस्थानने मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सोने पुरले हा कळीचा मुद्दा आहे. नगरच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने याबाबत २०११ सालीच चौकशी केली आहे. त्यात सोने पुरल्याचे स्वत: व्यवस्थापनाने मान्य केले. पण, आश्चर्य असे की या चौकशीवर तत्कालीन सहायक धर्मादाय आयुक्तांनी काही आदेशच केलेला दिसत नाही. त्यामुळे पुढे काही कार्यवाहीच झाली नाही. या प्रकरणात मोहटे येथील काही सजग ग्रामस्थांनी औरंगाबाद खंडपीठात २०१४ साली जनहित याचिका दाखल केली. तीही प्रलंबित आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. मात्र, पोलीसही ‘चौकशी सुरू आहे’ असे सरकारीछाप उत्तर देत आपली सुटका करतात. न्यायाधीश अध्यक्ष असलेल्या एखाद्या संस्थेच्या व्यवस्थापनाबाबत जेव्हा आरोप होतात तेव्हा ते आरोप भिजत राहण्यापेक्षा निकाली निघणे जास्त महत्त्वाचे आहे. येथे तसे होताना दिसत नाही. सध्याही सरकारच्या आदेशानुसार नगरच्या धर्मादाय उपआयुक्तांमार्फत देवस्थानची विविध प्रकरणी चौकशी सुरू आहे. मात्र, अलीकडे उपायुक्तांनी चौकशीला स्थगिती दिली. चौकशीतील मुद्यांबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाशी झालेल्या चर्चेनुसार ही स्थगिती दिल्याचे ते आपल्या आदेशात म्हणतात. वास्तविकत: देवस्थानची चौकशी करू नका, असा कुठल्याही न्यायालयाचा आदेश त्यांच्याकडे नाही. सर्वच तक्रारी याचिकेशीही निगडीत नाहीत. मात्र, तरी स्थगिती आली. वरिष्ठांशी चर्चा कधी झाली ती वेळही उपायुक्तांनी आदेशात नमूद केली आहे. ती आहे रात्री १०ची. रात्री १० वाजता एखाद्या देवस्थानबाबत चर्चा करण्यासाठी धर्मादाय उपायुक्त कार्यालय उघडे असते, ही नवीनच माहिती समोर आली. सगळाच संभ्रम आहे. न्यायालयात साक्षीदाराला देवाची शपथ घ्यावी लागते. मोहटा प्रकरणातही सर्वसामान्य भाविकांची विश्वस्त आणि सरकारी यंत्रणांकडून एक सामान्य अपेक्षा आहे. ‘देवाशपथ खरे सांगा’ !

टॅग्स :Courtन्यायालय