शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक : सरकारची भूमिका प्रामाणिक की डावपेचाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:59 IST

आयुष्याची जोडीदारीण म्हणून जिचा हात हातात घेतला, एके दिवशी सहजपणे तिला ‘तलाक’ हा शब्द तीन वेळा ऐकवायचा अन् कस्पटासमान घराच्या उंबरठ्याबाहेर भिरकावून द्यायचे.

सुरेश भटेवराआयुष्याची जोडीदारीण म्हणून जिचा हात हातात घेतला, एके दिवशी सहजपणे तिला ‘तलाक’ हा शब्द तीन वेळा ऐकवायचा अन् कस्पटासमान घराच्या उंबरठ्याबाहेर भिरकावून द्यायचे. माणुसकीच्या मूल्यालाच अपमानित करणारी ही अघोरी प्रथा, त्याचे प्रमाण अत्यल्प असले तरी मुस्लीम समुदायात एकविसाव्या शतकातही ती प्रचलित आहे. मोदी सरकारने या प्रथेला पायबंद घालण्याचा निर्धार केला अन् मुस्लीम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयक २०१७, लोकसभेत गुरुवारी चर्चेला आले. संसदेतला प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने विधेयकाला दुरुस्ती सुचवली नाही की विरोधही केला नाही मात्र विधेयकातल्या ठळक त्रुटींना अधोरेखित करीत विधेयकाचा दुरुपयोगही होऊ शकतो, याची सरकारला जाणीव करून दिली. हे संवेदनशील विधेयक घिसाडघाईत मंजूर करणे उचित नाही, सखोल विचार विनिमयासाठी स्थायी समितीकडेच ते पाठवले पाहिजे असा आग्रहही धरला. तथापि असाउद्दिन ओवेसींसह विरोधकांच्या दुरुस्त्या नामंजूर करीत, बहुमताच्या बळावर सरकारने लोकसभेत गुरुवारी हे विधेयक मंजूर करवून घेतले. पुढल्या सप्ताहात ते राज्यसभेत जाईल. तिथे सरकारच्या बाजूने बहुमत नाही. साहजिकच हे विधेयक स्थायी समितीकडे जावे यासाठी विरोधक पुरेपूर प्रयत्न करतील. राज्यसभेत तरीही हे विधेयक मंजूर झालेच तर राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.सुप्रीम कोर्टाने २२ आॅगस्ट २०१७ रोजी तलाक-ए-बिद्दत प्रथेला पूर्णत: बेकायदेशीर व राज्यघटनेच्या मूलतत्वांशी विसंगत ठरवले. संसदेने या संदर्भात नवा कायदा करण्याचा विचार करावा, अशी सूचनाही केली. मुस्लीम महिलांच्या सशक्तीकरणाचा उदात्त उद्देश नमूद करीत, सरकारने हे विधेयक निकालाला अनुसरून सादर केले, असे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले. तथापि गेल्या तीन वर्षातले मोदी सरकारचे एकतर्फी वर्तन पाहता, विरोधक तर सोडाच, कायद्याचे समर्थन करणाºया मुस्लीम संघटनांचाही कायदा मंत्र्याच्या युक्तिवादावर विश्वास नाही. भाजपचा इरादा खरोखर मुस्लीम महिलांची या कुप्रथेतून मुक्तता करण्याचा आहे की ओवेसींच्या आरोपानुसार मुस्लीम समुदायातल्या पुरुष मंडळींना नव्या कायद्याचा धाक दाखवून, भीती व तणावाखाली ठेवण्याचा डाव आहे, अशी शंका अनेकांनी बोलून दाखवली आहे.विधेयकातल्या ठळक तरतुदींकडे कटाक्ष टाकला तर एकाच वेळी सलग तीनदा ‘तलाक’ शब्द बोलून, लिहून, ई-मेल, एसएमएस अथवा व्हॉटस् अ‍ॅपद्वारे पाठवून पत्नीला घटस्फोट देणे, बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. विधेयकानुसार हा गुन्हा अजामीनपात्र व गंभीर आहे. तीन तलाक देणाºया पतीला तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूदही विधेयकात आहे. तलाक पीडित महिलेला स्वत:साठी तसेच लहान बालकांच्या पोटगी व संरक्षणासाठी मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करता येईल. तिच्या मागणीवर संबंधित मॅजिस्ट्रेट अथवा न्यायदंडाधिकाºयांना उचित निकाल देण्याचा अधिकार आहे. विधेयकाचा उद्देश उदात्त आणि मानवतेच्या मूल्यांचे संवर्धन करणारा आहे. प्रथमदर्शनी त्याचे स्वागतच व्हायला हवे तथापि विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आक्षेपांना सरकारतर्फे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही त्यामुळे मुस्लीम समुदायात संभ्रमाचे वातावरण आहे.‘तीन तलाक’ ही अघोरी प्रथा समाप्त व्हावी, अशीच काँग्रेस,अण्णाद्रमुक, डावे पक्ष, समाजवादी, राजद, बीजू जनता दल आदी प्रमुख पक्षांची व अनेक स्वयंसेवी संघटनांची भूमिका आहे. तथापि प्रस्तुत विधेयक घाईगर्दीत आणण्यामागे भाजपचा नेमका हेतू काय? याबद्दल तमाम विरोधकांना शंका आहे. तलाक-ए बिद्दतला अजामीनपात्र गुन्हा ठरवून, तलाक देणाºयाला तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकले तर तलाक पीडित महिलेला पोटगीची रक्कम कोण आणि कशी देणार? या महत्त्वाच्या मुद्याकडे विधेयकाने लक्षच दिलेले नाही, असा आक्षेप काँग्रेसच्या सुश्मिता देव यांनी चर्चेत नोंदवला. विधेयकातील शिक्षेची तरतूद तर बहुतांश विरोधी पक्षांना मान्य नाही. प्रस्तुत विधेयकावर भाष्य करताना सुप्रीम कोर्टातल्या विख्यात विधिज्ञ इंदिरा जयसिंग म्हणतात, ‘प्रस्तुत विधेयक एकीकडे तीन तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरवते आणि दुसरीकडे पीडित महिलेला पोटगीसाठी अर्ज करण्याची तरतूदही करते. या दोन्ही गोष्टी एकाचवेळी कशा शक्य होतील? मुस्लीम महिला न्यायालयाचे दार यासाठी ठोठावते की पतीबरोबर तिला रहाता यावे. किमानपक्षी तिच्या आर्थिक गरजा त्याने भागवाव्यात. तलाक शब्दप्रयोगाचा वापर करणाºया पतीलाच सरकारने तुरुंगात टाकले तर निकाह शिल्लक राहील काय? मग पीडित महिलेला हक्क आणि सन्मान कसा आणि कुणाकडून मिळणार? असा रास्त मुद्दा उपस्थित करीत सरकारने घाईगर्दीत आणलेल्या विधेयकाच्या पुनर्विचाराची गरज आहे,’ असे मत त्यांनी नोंदवले. जुनाट कुप्रथा राबवणाºयांच्या जोखडातून मुस्लीम महिलांना खरोखर मुक्त करणारा कायदा अस्तित्वात येणार असेल तर त्याचे सर्वांनी खुल्या दिलाने स्वागत करायला हवे पण सरकारची भूमिका मात्र त्यासाठी नि:संशय प्रामाणिक असायला हवी. तीन वर्षात धार्मिक तणावाला उत्तेजन देणाºया, विशेषत: लव्ह जिहादला विरोध करणाºया अनेक घटना घडल्या. या घटनांच्या निमित्ताने अतिउत्साही धर्ममार्तंडांनी धार्मिक हिंसाचाराला उत्तेजन देणारी भाषा वारंवार ऐकवली. सरकारने त्यांच्या विरोधात कुठेही ठोस कारवाई केल्याचे चित्र दिसले नाही.(राजकीय संपादक, लोकमत)