शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

आजचा अग्रलेख : ‘रेड कॉरिडॉर’ला तडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 06:01 IST

साठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगामधील नक्षलबाडीपासून सुरू झालेल्या या हिंसक चळवळीत सामान्य नागरिक, तसेच पोलिस व निमलष्करी दलांचे जवान व नक्षली मिळून हजारो जीव गेले.

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल व स्थानिक पोलिसांनी मंगळवारी दुपारी सशस्त्र चकमकीत तब्बल २९ नक्षल्यांना कंठस्नान घातले. त्यात शंकर राव व ललिता यांसारख्या डोक्यावर लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने नक्षल्यांचा खात्मा हा त्या हिंसक चळवळीला नक्कीच मोठा धक्का आहे. विशेषत: ‘रेड कॉरिडॉर’च्या रूपाने देशात समांतर सरकार चालविण्याचा माओवाद्यांचा मनसुबा अशा कारवायांमुळे जवळपास उद्ध्वस्त झाला, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

साठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगामधील नक्षलबाडीपासून सुरू झालेल्या या हिंसक चळवळीत सामान्य नागरिक, तसेच पोलिस व निमलष्करी दलांचे जवान व नक्षली मिळून हजारो जीव गेले. पश्चिम बंगालमधील जंगलमहलपासून ते झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा ते दक्षिणेकडे केरळपर्यंत हिंसक कारवाया होत राहिल्या. देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना एक मोठा टापू त्यापासून वंचित राहिला. तथापि, परस्पर समन्वयातून सुरक्षा दलांच्या केलेल्या धाडसी कारवायांनी गेल्या दशकभरात दक्षिण, तसेच पूर्वेकडील बराच भाग या हिंसाचारातून मुक्त केला आहे. आता नक्षल्यांचे थोडेबहुत अस्तित्व मध्य भारतातील दक्षिण छत्तीसगड व आग्नेय महाराष्ट्राच्या छोट्याशा टापूतच शिल्लक आहे. त्यातही  अबूजमाड या दुर्गम व डोंगराळ भागात अजूनही नक्षल्यांचा गड कायम आहे. 

त्याच भागात कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा ते कारोनार गावांदरम्यान मंगळवारी पोलिस व निमलष्करी दलांनी नोंदविलेली कामगिरी कौतुकास्पद आणि नक्षल्यांचा सुपडासाफ करण्याच्या दिशेने मोठे व महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल. कारण, मतदान व लोकशाही प्रक्रियेला प्रचंड विरोध असलेल्या नक्षल्यांना सुरक्षा दलांनी ऐन निवडणुकीच्या काळात हा धक्का दिला आहे. कांकेरच्या दक्षिणेकडील बस्तर व पश्चिमेकडील गडचिरोलीत पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या, १९ एप्रिलला होत आहे, तर कांकेर मतदारसंघातील मतदान दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी होईल. साहजिकच या तिन्ही मतदारसंघांमध्ये घातपात घडविण्याचा प्रयत्न हिंसक माओवाद्यांकडून अपेक्षित होता. 

गडचिरोलीत प्रचार सुरू झाल्यापासून तेलंगणा सीमेकडून नक्षल्यांची घुसखोरी होत असल्याचे लक्षात आले होते. पोलिसांनी १९ मार्च रोजी कोलामार्का भागात अशी घुसखोरी करणारे चार नक्षलवादी मारले. त्यात विभागीय समितीच्या सदस्यांचा समावेश होता. नंतर दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना पिपली बुर्गीजवळच्या जंगलात अटक करण्यात आली. आता महाराष्ट्र सीमेला लागून असलेल्या कांकेर येथे मारले गेलेले नक्षलवादी कदाचित महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसी कारवायांमुळेच तिकडच्या डोंगरांमध्ये लपून बसण्यास बाध्य झाले असावेत.  नक्षली हिंसाचारापुढे आपली सुरक्षादले हतबल असल्याचे जुने चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. विशेषत: अवघ्या पाच वर्षांमध्ये नक्षल्यांचा सामना करताना पाच वर्षांच्या कालावधीत पोलिसांची हिंमत कशी व किती वाढली, हे दोन घटनांमधून स्पष्ट होते. 

१ मे २०१९ रोजी महाराष्ट्र स्थापना दिन, तसेच कामगार दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात जांभूळखेडा येथे नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या पंधरा जवानांचा मृत्यू झाला होता. त्यात पोलिसांच्या काही चुका झाल्याचे अनुमान निघाले. विशेषत: बारा तास आधी जिथे नक्षल्यांनी वाहने जाळली तिकडे कोणतीही खबरदारी न घेता जवानांना खासगी वाहनाने पाठविण्याची चूक गंभीर होती. त्या घटनेतून महाराष्ट्र व छत्तीसगड, या दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी, तसेच निमलष्करी दलांनी बोध घेतला.

प्रत्येक छोट्या-मोठ्या कारवाईआधी योग्य ती दक्षता, सर्व प्रकारच्या धोक्यांचा आढावा घेतला जाऊ लागला. परिणामी, अडीच वर्षांनंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये कोटगुल- ग्यारापत्ती भागात सी-६० कमांडोंनी नक्षली तळ उद्ध्वस्त केला, तीन राज्यांचा प्रमुख असलेल्या मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांचा खात्मा झाला, तेव्हा एकही जवान जखमी झाला नाही.  अडीच वर्षांनंतरच्या कांकेर जिल्ह्यातील कारवाईत २९ नक्षलींना कंठस्नान घातले गेले, तेव्हाही सीमा सुरक्षा दल व स्थानिक डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डच्या पथकातील केवळ तीन जवान जखमी झाले आणि तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. जवानांच्या धाडसाने माओवाद्यांचे कंबरडे माेडत चालले आहे. त्यासाठी पोलिस व निमलष्करी दलांचे अभिनंदन!

टॅग्स :naxaliteनक्षलवादी