शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

आजचा अग्रलेख : ‘रेड कॉरिडॉर’ला तडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 06:01 IST

साठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगामधील नक्षलबाडीपासून सुरू झालेल्या या हिंसक चळवळीत सामान्य नागरिक, तसेच पोलिस व निमलष्करी दलांचे जवान व नक्षली मिळून हजारो जीव गेले.

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल व स्थानिक पोलिसांनी मंगळवारी दुपारी सशस्त्र चकमकीत तब्बल २९ नक्षल्यांना कंठस्नान घातले. त्यात शंकर राव व ललिता यांसारख्या डोक्यावर लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने नक्षल्यांचा खात्मा हा त्या हिंसक चळवळीला नक्कीच मोठा धक्का आहे. विशेषत: ‘रेड कॉरिडॉर’च्या रूपाने देशात समांतर सरकार चालविण्याचा माओवाद्यांचा मनसुबा अशा कारवायांमुळे जवळपास उद्ध्वस्त झाला, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

साठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगामधील नक्षलबाडीपासून सुरू झालेल्या या हिंसक चळवळीत सामान्य नागरिक, तसेच पोलिस व निमलष्करी दलांचे जवान व नक्षली मिळून हजारो जीव गेले. पश्चिम बंगालमधील जंगलमहलपासून ते झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा ते दक्षिणेकडे केरळपर्यंत हिंसक कारवाया होत राहिल्या. देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना एक मोठा टापू त्यापासून वंचित राहिला. तथापि, परस्पर समन्वयातून सुरक्षा दलांच्या केलेल्या धाडसी कारवायांनी गेल्या दशकभरात दक्षिण, तसेच पूर्वेकडील बराच भाग या हिंसाचारातून मुक्त केला आहे. आता नक्षल्यांचे थोडेबहुत अस्तित्व मध्य भारतातील दक्षिण छत्तीसगड व आग्नेय महाराष्ट्राच्या छोट्याशा टापूतच शिल्लक आहे. त्यातही  अबूजमाड या दुर्गम व डोंगराळ भागात अजूनही नक्षल्यांचा गड कायम आहे. 

त्याच भागात कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा ते कारोनार गावांदरम्यान मंगळवारी पोलिस व निमलष्करी दलांनी नोंदविलेली कामगिरी कौतुकास्पद आणि नक्षल्यांचा सुपडासाफ करण्याच्या दिशेने मोठे व महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल. कारण, मतदान व लोकशाही प्रक्रियेला प्रचंड विरोध असलेल्या नक्षल्यांना सुरक्षा दलांनी ऐन निवडणुकीच्या काळात हा धक्का दिला आहे. कांकेरच्या दक्षिणेकडील बस्तर व पश्चिमेकडील गडचिरोलीत पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या, १९ एप्रिलला होत आहे, तर कांकेर मतदारसंघातील मतदान दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी होईल. साहजिकच या तिन्ही मतदारसंघांमध्ये घातपात घडविण्याचा प्रयत्न हिंसक माओवाद्यांकडून अपेक्षित होता. 

गडचिरोलीत प्रचार सुरू झाल्यापासून तेलंगणा सीमेकडून नक्षल्यांची घुसखोरी होत असल्याचे लक्षात आले होते. पोलिसांनी १९ मार्च रोजी कोलामार्का भागात अशी घुसखोरी करणारे चार नक्षलवादी मारले. त्यात विभागीय समितीच्या सदस्यांचा समावेश होता. नंतर दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना पिपली बुर्गीजवळच्या जंगलात अटक करण्यात आली. आता महाराष्ट्र सीमेला लागून असलेल्या कांकेर येथे मारले गेलेले नक्षलवादी कदाचित महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसी कारवायांमुळेच तिकडच्या डोंगरांमध्ये लपून बसण्यास बाध्य झाले असावेत.  नक्षली हिंसाचारापुढे आपली सुरक्षादले हतबल असल्याचे जुने चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. विशेषत: अवघ्या पाच वर्षांमध्ये नक्षल्यांचा सामना करताना पाच वर्षांच्या कालावधीत पोलिसांची हिंमत कशी व किती वाढली, हे दोन घटनांमधून स्पष्ट होते. 

१ मे २०१९ रोजी महाराष्ट्र स्थापना दिन, तसेच कामगार दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात जांभूळखेडा येथे नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या पंधरा जवानांचा मृत्यू झाला होता. त्यात पोलिसांच्या काही चुका झाल्याचे अनुमान निघाले. विशेषत: बारा तास आधी जिथे नक्षल्यांनी वाहने जाळली तिकडे कोणतीही खबरदारी न घेता जवानांना खासगी वाहनाने पाठविण्याची चूक गंभीर होती. त्या घटनेतून महाराष्ट्र व छत्तीसगड, या दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी, तसेच निमलष्करी दलांनी बोध घेतला.

प्रत्येक छोट्या-मोठ्या कारवाईआधी योग्य ती दक्षता, सर्व प्रकारच्या धोक्यांचा आढावा घेतला जाऊ लागला. परिणामी, अडीच वर्षांनंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये कोटगुल- ग्यारापत्ती भागात सी-६० कमांडोंनी नक्षली तळ उद्ध्वस्त केला, तीन राज्यांचा प्रमुख असलेल्या मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांचा खात्मा झाला, तेव्हा एकही जवान जखमी झाला नाही.  अडीच वर्षांनंतरच्या कांकेर जिल्ह्यातील कारवाईत २९ नक्षलींना कंठस्नान घातले गेले, तेव्हाही सीमा सुरक्षा दल व स्थानिक डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डच्या पथकातील केवळ तीन जवान जखमी झाले आणि तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. जवानांच्या धाडसाने माओवाद्यांचे कंबरडे माेडत चालले आहे. त्यासाठी पोलिस व निमलष्करी दलांचे अभिनंदन!

टॅग्स :naxaliteनक्षलवादी