शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूला ‘भयंकर व्यसन’ म्हणा तरी!

By admin | Updated: May 31, 2015 01:41 IST

मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तंबाखू आणि त्याच्याशी संबंधित व्यसने, त्यातील दुष्पपरिणाम यांचा ऊहापोह करणारा हा लेख...

मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तंबाखू आणि त्याच्याशी संबंधित व्यसने, त्यातील दुष्पपरिणाम यांचा ऊहापोह करणारा हा लेख...ज जगात आर्थिक उलाढालींची सर्वांत मोठी तीन क्षेत्रे उदयास आली आहेत. ती म्हणजे अश्लील संकेतस्थळे/ चित्रफिती, नशा आणणाऱ्या पदार्थांचे उत्पादन / विक्री उद्योग आणि स्मार्टफोन. या तिन्ही क्षेत्रांत प्रामुख्याने तरुण वर्ग ग्राहक असल्याने तरुणाईला आकृष्ट करण्यात किंबहुना त्याला वेड लावण्यात या क्षेत्रांनी यश प्राप्त केले आहे. भारत हा तर युवकांचा देश असल्यामुळे या उद्योगांनी इथं चांगलंच बस्तान बसवलं आहे. त्यातल्या त्यात व्यसनाधिनतेने युवा पिढीला अनिर्बंधपणे ग्रासले असल्याचे चित्र दिसत आहे. याची गंभीर दखल घेणे आवश्यक वाटते.अमलीपदार्थ, दारू यांना भयंकर व्यसन म्हणून ज्या गांभीर्याने पाहिले जाते तितके तंबाखूच्या व्यसनाकडे पाहिले जात नाही. किंबहुना भारतातील ग्रामीण, निमशहरी भागात तंबाखूसेवन हे व्यसन गंभीर व्यसन आहे हे त्यांच्या गावीही नसतं. स्थावर मालमत्ता जशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपोआप मिळत असते तसे तंबाखू-मशेरीसुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अलगद, विनासायास मिळत असल्यासारखं पिढ्यान्पिढ्या हे सारं सुखेनैव सुरू आहे.तंबाखूतल्या घातक द्रव्यांची जाणीवजागृती मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. तंबाखूत ४ हजारहून अधिक विषारी रसायने आहेत. त्यातील ४३ रसायने तर अतिशय घातक आहेत. त्यात निकोटीन हे नशा आणणारे घातक रसायन तर आहेच, पण हायड्रोजन सायनाईड, नेफ्थेलीन, अ‍ॅसिटोन, कॅडमियम, अर्सेनिक, कार्बन मोनाक्साईड, बुटेन यांसारखी अतिघातक, विषारी रसायने असल्याने तोंडाचा वा अन्य प्रकारचा कॅन्सर होण्याचा संभव असतो.जगात दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा फैलाव झाल्यावर माध्यमे रान उठवितात. शासकीय यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. पण इथे दरवर्षी १० लाख लोक मृत्युमुखी पडतात याचे शासनाला काही सोयरसुतक नाही.१५ वर्षांवरील २० टक्के महिला तंबाखू किंवा मशेरीचा वापर करतात असे संशोधनाअंती निष्पन्न झाले आहे. मानव विकास दराबाबत भारताचा जगात खूप खालचा म्हणजे १३६वा नंबर असला तरी तोंडाच्या कॅन्सरबाबतीत आता भारताने जगात पहिला नंबर मिळवला आहे याला काय म्हणावे.सिगारेटच्या पाकिटावर, तंबाखूच्या पुडीवर वैधानिक इशारा देणारे चित्र पाकिटाच्या आकाराच्या ८५ टक्के असावे अशी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची, तज्ज्ञांची मागणी आहे. पण ते चित्र ४० टक्केच्या वर काही जात नाही असे दिसते. अर्थात याने फार मोठा फरक पडेल असे नव्हे, पण जे शक्य आहे ते करण्याची सरकारची खुलेपणाने तयारी असायला हवी. मध्यंतरी तर काही विद्यमान खासदारांनी तंबाखूसेवनाचं समर्थन केलं. त्यामुळे कॅन्सर होत नाही असा नवा शोध त्यांनी लावला! असो, त्यांची विडी व सिगारेट उत्पादन यांच्याबद्दल किती ‘आस्था’ आहे हे लक्षात आले. सरकारने एक मात्र केले. ते म्हणजे तंबाखूजन्य वस्तूंवरची करवाढ दरवर्षी भरमसाठ करत नेली, पण इथं सरकारचं उत्पन्न वाढणं हे महत्त्वाचं नसून उत्पादनावर आपण काही नियंत्रण आणू शकतो का हे अधिक महत्त्वाचे आहे.अमेरिका व युरोपीय देशातील शासनानी तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पन्नावर टप्प्याटप्प्यांनी नियंत्रण आणून ते आता काही देशात ५० टक्के तर काही देशात त्यातून अधिक प्रमाणात नियंत्रण आणण्यात यश आले आहे. आपल्या देशातही हे उत्पादन दरवर्षी १० टक्क्यांनी कमी करत ५ वर्षांत ५० टक्क्यांपर्यंत कमी करता येईल. पण राजकीय इच्छाशक्ती कोणाकडे आहे?एक गमतीदार किस्सा. नवी मुंबईतील खारघर शहर दारूमुक्त शहर असल्याने रायगड विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक यांनी त्यांचा महसूल घटल्याने वरिष्ठांकडून मेमो दिले आहे. याचे कारण त्या अधीक्षक मॅडम सांगायच्या की, खारघर परिसरातील लोक बेलापूरमध्ये जाऊन दारू पितात व बेलापूरचे उत्पन्न त्यामुळे वाढते. बेलापूर हे ठाणे महसूल विभागात येत असल्याने तिथल्या अधीक्षक मॅडम यांची वरिष्ठांकडून तारीफ व्हायची. सरकारला माणसाच्या जीविताशी देणंघेणं असेल तर ज्यांचा याबाबतीतला महसूल कमी झाला किंवा त्यांनी तो कमी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांना प्रशस्तिपत्र दिले पाहिजे.सगळ्या गोळ्या, रोगजंतू, विषाणू या सर्वांपेक्षा धूम्रपान हे अधिक हानिकारक आहे. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण ६८ टक्केनी वाढते. एक विडी किंवा सिगारेट माणसाचं आयुष्य ६ मिनिटांनी कमी करते. धूम्रपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. धूम्रपानामुळे हार्मोन्स निर्मितीला इजा पोहोचत असल्याने गर्भधारण क्षमता क्षीण होते. शिवाय इक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे बीजांड गर्भाशयात प्रविष्ट होण्याऐवजी फॅलोपियन ट्युबमध्येच राहण्याचा धोका संभवतो. त्यामुळे ते मातेच्या किंवा अर्भकाच्या जिवावर बेतू शकते. पुरुषांच्या बाबतीतही लिंगताठरता अभावाचे धूम्रपान हे कारण मानले जाते. धूम्रपान वीर्यातल्या डीएनएला इजा करणारे असल्याने नपुंसकत्व येण्याची शक्यता वाढते.जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त शासनव्यवस्था, स्वयंसेवी संस्था, आरोग्य विषयातील तज्ज्ञ आदींनी एकत्रित येऊन काही ठोस व धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा भारत तरुणांचा जरी एकमेव देश असला तरी सुदृढ तरुणांचा देश म्हणता येईल अशी परिस्थिती नाही.शासनाला सोयरसुतक आहे का?जगात दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात दरवर्षी यामुळे मरणाऱ्यांची संख्या १० लाखांवर आहे. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा फैलाव झाल्यावर माध्यमे रान उठवितात. शासकीय यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. पण इथे दरवर्षी १० लाख लोक मृत्युमुखी पडतात याचे शासनाला काही सोयरसुतक आहे की नाही?डॉ. अजित मगदुम