शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

धरणीमातेचा आदर राखण्यासाठी...!

By विजय दर्डा | Updated: June 14, 2022 09:11 IST

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे.

विजय दर्डा (अध्यक्ष, लोकमत संपादकीय मंडळ)

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे. या मातेचा आदर, सन्मान केला पाहिजे, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण राहिलेली आहे. रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरातून आपण गेल्या काही दशकांत आपल्या धरणीमातेवर नकळतपणे खूप अत्याचार केले. शास्त्रज्ञ सांगतात की, सुपीक मातीचा केवळ १० सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी दहा-पाच नव्हे, तर तब्बल दोन हजार वर्षे लागतात. एवढ्या मौल्यवान मातीची आपण किती कदर केली पाहिजे?

आपण फार निष्काळजीपणाने वागतो आहोत. दरवर्षी जगातली तब्बल २४ अब्ज टन माती नष्ट होत आहे. मातीची ही हानी आपण वेळेत थांबवली नाही, तर मला भीती वाटते की तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्या नातवंडांना सहारा वाळवंट पाहण्यासाठी दूर आफ्रिकेत जावे लागणार नाही. ती सोय आपण आपल्याच गावात करून देऊ. आपण तेव्हा त्या जगात नसू, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण वाळवंटात ढकलून देणार आहोत का?

जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणं इतकं अवघड आहे का? नाही. मातीचा नाश होऊ नये, म्हणून जमीन नेहमी आच्छादित असली पाहिजे. हे आच्छादन म्हणजे सिमेंट काँक्रीट किंवा पेव्हर ब्लॉक्सचं नव्हे; तर गवत, पाला पाचोळा, पिकं, झाडं आदींचं नैसर्गिक आच्छादन. या नैसर्गिक आच्छादनामुळे मातीच्या थरात अब्जावधी जिवाणू वाढू लागतात. हेच जिवाणू जमीन जिवंत ठेवण्याचं काम करतात. जमिनीत हवा खेळती ठेवतात. संशोधकांच्या मते एक हेक्टर सुपीक जमिनीत 15 टन जीवाणू असतात. हेच जीवाणू जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवतात. याच जिवाणूंमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अन्नधान्य, फळं, फुलं जोमानं पिकतात. रासायनिक खतांची गरज कमी लागते. जमिनीच्या सर्वात वरच्या सहा इंच थरात केवळ एक टक्के सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक मॅटर) असला तरी ती जमीन उपजाऊ होते. दुर्दैवाने आज आपल्या देशात अनेक ठिकाणी पुरेसा ऑरगॅनिक मॅटर नाही. त्यामुळं प्रति हेक्टरी उत्पादकता घसरली आहे. यात वेळीच सुधारणा केली नाही तर गंभीर स्थिती ओढवेल.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रेंक्लिन रुझवेल्ट असं म्हणाले होते की, “The nation that destroys its soil destroys itself." रुझवेल्ट यांचं हे वाक्य 140 कोटी लोकसंख्येच्या भारतासाठी तर तंतोतंत खरं आहे. कारण आपण जर आपल्या मातीची काळजी घेतली नाही तर या देशातील जमीन 140 कोटी लोकांसाठी रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा कधीच पूर्ण करू शकणार नाही. केवळ अन्नसुरक्षाच धोक्यात येणार नाही. तर आत्ता जसे डिझेल-पेट्रोलसाठी आपण पूर्णतः परावलंबी आहोत, तसे रोजच्या भाकरी- भाजीसाठी हा देश परक्या राष्ट्रांच्या दयेसाठी मोहताज होईल. हे टाळण्यासाठी माती जपली पाहिजे.

मला इतकंच सांगायचं आहे की ज्या धरणीला 'माता' म्हणावं असं आपल्या संस्कृतीनं शिकवलं तिचं आरोग्य टिकवणं, सुधारणं ही आपलीच जबाबदारी आहे. महात्मा गांधी म्हणाले होते Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed.

माणसाने हाव न धरता धरणी मातेची काळजी करावी. अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

टॅग्स :Earthपृथ्वी