शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

धरणीमातेचा आदर राखण्यासाठी...!

By विजय दर्डा | Updated: June 14, 2022 09:11 IST

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे.

विजय दर्डा (अध्यक्ष, लोकमत संपादकीय मंडळ)

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे. या मातेचा आदर, सन्मान केला पाहिजे, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण राहिलेली आहे. रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरातून आपण गेल्या काही दशकांत आपल्या धरणीमातेवर नकळतपणे खूप अत्याचार केले. शास्त्रज्ञ सांगतात की, सुपीक मातीचा केवळ १० सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी दहा-पाच नव्हे, तर तब्बल दोन हजार वर्षे लागतात. एवढ्या मौल्यवान मातीची आपण किती कदर केली पाहिजे?

आपण फार निष्काळजीपणाने वागतो आहोत. दरवर्षी जगातली तब्बल २४ अब्ज टन माती नष्ट होत आहे. मातीची ही हानी आपण वेळेत थांबवली नाही, तर मला भीती वाटते की तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्या नातवंडांना सहारा वाळवंट पाहण्यासाठी दूर आफ्रिकेत जावे लागणार नाही. ती सोय आपण आपल्याच गावात करून देऊ. आपण तेव्हा त्या जगात नसू, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण वाळवंटात ढकलून देणार आहोत का?

जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणं इतकं अवघड आहे का? नाही. मातीचा नाश होऊ नये, म्हणून जमीन नेहमी आच्छादित असली पाहिजे. हे आच्छादन म्हणजे सिमेंट काँक्रीट किंवा पेव्हर ब्लॉक्सचं नव्हे; तर गवत, पाला पाचोळा, पिकं, झाडं आदींचं नैसर्गिक आच्छादन. या नैसर्गिक आच्छादनामुळे मातीच्या थरात अब्जावधी जिवाणू वाढू लागतात. हेच जिवाणू जमीन जिवंत ठेवण्याचं काम करतात. जमिनीत हवा खेळती ठेवतात. संशोधकांच्या मते एक हेक्टर सुपीक जमिनीत 15 टन जीवाणू असतात. हेच जीवाणू जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवतात. याच जिवाणूंमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अन्नधान्य, फळं, फुलं जोमानं पिकतात. रासायनिक खतांची गरज कमी लागते. जमिनीच्या सर्वात वरच्या सहा इंच थरात केवळ एक टक्के सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक मॅटर) असला तरी ती जमीन उपजाऊ होते. दुर्दैवाने आज आपल्या देशात अनेक ठिकाणी पुरेसा ऑरगॅनिक मॅटर नाही. त्यामुळं प्रति हेक्टरी उत्पादकता घसरली आहे. यात वेळीच सुधारणा केली नाही तर गंभीर स्थिती ओढवेल.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रेंक्लिन रुझवेल्ट असं म्हणाले होते की, “The nation that destroys its soil destroys itself." रुझवेल्ट यांचं हे वाक्य 140 कोटी लोकसंख्येच्या भारतासाठी तर तंतोतंत खरं आहे. कारण आपण जर आपल्या मातीची काळजी घेतली नाही तर या देशातील जमीन 140 कोटी लोकांसाठी रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा कधीच पूर्ण करू शकणार नाही. केवळ अन्नसुरक्षाच धोक्यात येणार नाही. तर आत्ता जसे डिझेल-पेट्रोलसाठी आपण पूर्णतः परावलंबी आहोत, तसे रोजच्या भाकरी- भाजीसाठी हा देश परक्या राष्ट्रांच्या दयेसाठी मोहताज होईल. हे टाळण्यासाठी माती जपली पाहिजे.

मला इतकंच सांगायचं आहे की ज्या धरणीला 'माता' म्हणावं असं आपल्या संस्कृतीनं शिकवलं तिचं आरोग्य टिकवणं, सुधारणं ही आपलीच जबाबदारी आहे. महात्मा गांधी म्हणाले होते Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed.

माणसाने हाव न धरता धरणी मातेची काळजी करावी. अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

टॅग्स :Earthपृथ्वी