शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धरणीमातेचा आदर राखण्यासाठी...!

By विजय दर्डा | Updated: June 14, 2022 09:11 IST

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे.

विजय दर्डा (अध्यक्ष, लोकमत संपादकीय मंडळ)

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे. या मातेचा आदर, सन्मान केला पाहिजे, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण राहिलेली आहे. रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरातून आपण गेल्या काही दशकांत आपल्या धरणीमातेवर नकळतपणे खूप अत्याचार केले. शास्त्रज्ञ सांगतात की, सुपीक मातीचा केवळ १० सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी दहा-पाच नव्हे, तर तब्बल दोन हजार वर्षे लागतात. एवढ्या मौल्यवान मातीची आपण किती कदर केली पाहिजे?

आपण फार निष्काळजीपणाने वागतो आहोत. दरवर्षी जगातली तब्बल २४ अब्ज टन माती नष्ट होत आहे. मातीची ही हानी आपण वेळेत थांबवली नाही, तर मला भीती वाटते की तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्या नातवंडांना सहारा वाळवंट पाहण्यासाठी दूर आफ्रिकेत जावे लागणार नाही. ती सोय आपण आपल्याच गावात करून देऊ. आपण तेव्हा त्या जगात नसू, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण वाळवंटात ढकलून देणार आहोत का?

जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणं इतकं अवघड आहे का? नाही. मातीचा नाश होऊ नये, म्हणून जमीन नेहमी आच्छादित असली पाहिजे. हे आच्छादन म्हणजे सिमेंट काँक्रीट किंवा पेव्हर ब्लॉक्सचं नव्हे; तर गवत, पाला पाचोळा, पिकं, झाडं आदींचं नैसर्गिक आच्छादन. या नैसर्गिक आच्छादनामुळे मातीच्या थरात अब्जावधी जिवाणू वाढू लागतात. हेच जिवाणू जमीन जिवंत ठेवण्याचं काम करतात. जमिनीत हवा खेळती ठेवतात. संशोधकांच्या मते एक हेक्टर सुपीक जमिनीत 15 टन जीवाणू असतात. हेच जीवाणू जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवतात. याच जिवाणूंमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अन्नधान्य, फळं, फुलं जोमानं पिकतात. रासायनिक खतांची गरज कमी लागते. जमिनीच्या सर्वात वरच्या सहा इंच थरात केवळ एक टक्के सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक मॅटर) असला तरी ती जमीन उपजाऊ होते. दुर्दैवाने आज आपल्या देशात अनेक ठिकाणी पुरेसा ऑरगॅनिक मॅटर नाही. त्यामुळं प्रति हेक्टरी उत्पादकता घसरली आहे. यात वेळीच सुधारणा केली नाही तर गंभीर स्थिती ओढवेल.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रेंक्लिन रुझवेल्ट असं म्हणाले होते की, “The nation that destroys its soil destroys itself." रुझवेल्ट यांचं हे वाक्य 140 कोटी लोकसंख्येच्या भारतासाठी तर तंतोतंत खरं आहे. कारण आपण जर आपल्या मातीची काळजी घेतली नाही तर या देशातील जमीन 140 कोटी लोकांसाठी रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा कधीच पूर्ण करू शकणार नाही. केवळ अन्नसुरक्षाच धोक्यात येणार नाही. तर आत्ता जसे डिझेल-पेट्रोलसाठी आपण पूर्णतः परावलंबी आहोत, तसे रोजच्या भाकरी- भाजीसाठी हा देश परक्या राष्ट्रांच्या दयेसाठी मोहताज होईल. हे टाळण्यासाठी माती जपली पाहिजे.

मला इतकंच सांगायचं आहे की ज्या धरणीला 'माता' म्हणावं असं आपल्या संस्कृतीनं शिकवलं तिचं आरोग्य टिकवणं, सुधारणं ही आपलीच जबाबदारी आहे. महात्मा गांधी म्हणाले होते Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed.

माणसाने हाव न धरता धरणी मातेची काळजी करावी. अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

टॅग्स :Earthपृथ्वी