शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

धरणीमातेचा आदर राखण्यासाठी...!

By विजय दर्डा | Updated: June 14, 2022 09:11 IST

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे.

विजय दर्डा (अध्यक्ष, लोकमत संपादकीय मंडळ)

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे. या मातेचा आदर, सन्मान केला पाहिजे, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण राहिलेली आहे. रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरातून आपण गेल्या काही दशकांत आपल्या धरणीमातेवर नकळतपणे खूप अत्याचार केले. शास्त्रज्ञ सांगतात की, सुपीक मातीचा केवळ १० सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी दहा-पाच नव्हे, तर तब्बल दोन हजार वर्षे लागतात. एवढ्या मौल्यवान मातीची आपण किती कदर केली पाहिजे?

आपण फार निष्काळजीपणाने वागतो आहोत. दरवर्षी जगातली तब्बल २४ अब्ज टन माती नष्ट होत आहे. मातीची ही हानी आपण वेळेत थांबवली नाही, तर मला भीती वाटते की तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्या नातवंडांना सहारा वाळवंट पाहण्यासाठी दूर आफ्रिकेत जावे लागणार नाही. ती सोय आपण आपल्याच गावात करून देऊ. आपण तेव्हा त्या जगात नसू, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण वाळवंटात ढकलून देणार आहोत का?

जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणं इतकं अवघड आहे का? नाही. मातीचा नाश होऊ नये, म्हणून जमीन नेहमी आच्छादित असली पाहिजे. हे आच्छादन म्हणजे सिमेंट काँक्रीट किंवा पेव्हर ब्लॉक्सचं नव्हे; तर गवत, पाला पाचोळा, पिकं, झाडं आदींचं नैसर्गिक आच्छादन. या नैसर्गिक आच्छादनामुळे मातीच्या थरात अब्जावधी जिवाणू वाढू लागतात. हेच जिवाणू जमीन जिवंत ठेवण्याचं काम करतात. जमिनीत हवा खेळती ठेवतात. संशोधकांच्या मते एक हेक्टर सुपीक जमिनीत 15 टन जीवाणू असतात. हेच जीवाणू जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवतात. याच जिवाणूंमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अन्नधान्य, फळं, फुलं जोमानं पिकतात. रासायनिक खतांची गरज कमी लागते. जमिनीच्या सर्वात वरच्या सहा इंच थरात केवळ एक टक्के सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक मॅटर) असला तरी ती जमीन उपजाऊ होते. दुर्दैवाने आज आपल्या देशात अनेक ठिकाणी पुरेसा ऑरगॅनिक मॅटर नाही. त्यामुळं प्रति हेक्टरी उत्पादकता घसरली आहे. यात वेळीच सुधारणा केली नाही तर गंभीर स्थिती ओढवेल.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रेंक्लिन रुझवेल्ट असं म्हणाले होते की, “The nation that destroys its soil destroys itself." रुझवेल्ट यांचं हे वाक्य 140 कोटी लोकसंख्येच्या भारतासाठी तर तंतोतंत खरं आहे. कारण आपण जर आपल्या मातीची काळजी घेतली नाही तर या देशातील जमीन 140 कोटी लोकांसाठी रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा कधीच पूर्ण करू शकणार नाही. केवळ अन्नसुरक्षाच धोक्यात येणार नाही. तर आत्ता जसे डिझेल-पेट्रोलसाठी आपण पूर्णतः परावलंबी आहोत, तसे रोजच्या भाकरी- भाजीसाठी हा देश परक्या राष्ट्रांच्या दयेसाठी मोहताज होईल. हे टाळण्यासाठी माती जपली पाहिजे.

मला इतकंच सांगायचं आहे की ज्या धरणीला 'माता' म्हणावं असं आपल्या संस्कृतीनं शिकवलं तिचं आरोग्य टिकवणं, सुधारणं ही आपलीच जबाबदारी आहे. महात्मा गांधी म्हणाले होते Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed.

माणसाने हाव न धरता धरणी मातेची काळजी करावी. अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

टॅग्स :Earthपृथ्वी