शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

टिपचा भुर्दंड

By admin | Updated: January 8, 2017 01:37 IST

१९७१ च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर भारतामध्ये मध्यमवर्ग खूप वेगाने वाढला आणि साहजिकच हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायदेखील खूप वेगाने वाढला.

- अ‍ॅड. उदय वारूंजीकर१९७१ च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर भारतामध्ये मध्यमवर्ग खूप वेगाने वाढला आणि साहजिकच हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायदेखील खूप वेगाने वाढला. महानगरात शनिवार - रविवार घरी स्वंयपाक न करता बाहेरच जेवायची प्रथा सुरू झाली. मात्र काही हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांच्या बिलावर मात्र उत्तम सोयी आणि सुविधा देण्याच्या नावाने जादा पैसे उकळणे चालू झाले. त्यावर केंद्र्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या डिसेंबरमधल्या स्पष्टीकरणात्मक पत्रामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.हॉटेलमध्ये लॉजिंग बोर्डिंग आणि त्याचप्रमाणे रेस्टॉरंटचाही समावेश होतो. यातील खाद्यपदार्थांच्या बिलावर व्हॅट आकारला जातो. हा कर असतो. तो राज्य सरकारच्या कायद्यानुसार बदलतो. त्याचप्रमाणे सेवाकर आकारला जातो. हा सेवाकर केंद्र सरकारच्या कायद्यानुसार असतो. सेवाकर संपूर्ण भारतामध्ये एकसारखा आहे. परंतु राहण्याच्या व्यवस्थेवर मात्र अन्य कर लावले जातात. याव्यतिरिक्त सुविधा पुरविण्याच्या नावाखाली मात्र ५ ते २0 टक्के सुविधा शुल्क आकारण्याची पद्धत सुरू झाली. सर्वसाधारणत: रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधेनंतर टिप देणे हे सभ्य माणसाचे लक्षण समजले जाते. ही टिप किती असावी याबाबत मात्र व्यक्तीसापेक्ष नियम असतात. कित्येक वेळा ग्राहक सुटे पैसे किंवा सुट्या नोटा टिप म्हणून देतात. ही टिप कित्येक वेळा वेटरसाठी दिली जाते. वेटरने दिलेल्या सुविधांमुळे समाधान झाल्यावर टिप द्यावी असे संकेत आहेत. पण काही मोठ्या हॉटेलमध्ये मात्र ही टिप सुविधा शुल्क देण्यात येणाऱ्या सुविधांच्या बदल्यात बिलामध्ये समाविष्ट केली जाते. वास्तविक पाहता सदर शुल्क हे कर नसल्यामुळे दिलेल्या सोयी आणि सुविधांच्या बदल्यात आकारले जाऊ शकते. मात्र असमाधानी ग्राहकांच्या तक्रारी केंद्रीय पातळीवरील ग्राहक हेल्पलाइनवर दाखल झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात स्पष्टीकरण दिले गेले. त्यानुसार सुविधा शुल्क हे ऐच्छिक आहे. त्याची जबरदस्ती करता येणार नाही. जर ग्राहक समाधानी नसेल तर बिलामधून सुविधा शुल्क माफ केले जाऊ शकते. पण यामुळे ग्राहक हक्कांची पायमल्ली होत आहे. जर सुविधा शुल्क हे ऐच्छिक असेल तर मग ते बिलामध्ये कसे काय समाविष्ट केले जाऊ शकते, हा प्रश्न आहे. बिलामध्ये कायदेशीर रक्कमच आकारली जाऊ शकते. मग ऐच्छिक गोष्टी बिलामध्ये घालून मग त्यातून सूट कशी देणार, हा प्रश्न आहे.हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकाला मेन्यू कार्ड दाखवले जाते. ते बघून आॅर्डर दिली जाते. म्हणजेच ग्राहक आणि हॉटेल या दोघांमध्ये दर ठरवला जातो. त्यामुळे बिलामध्ये दराबरोबरीने कर येऊ शकतात. मात्र सुविधा शुल्क येऊ शकत नाही. सर्वसाधारणत: सामान्य ग्राहक बिल आल्यावर बिल तपासून न बघता फक्त शेवटचा आकडा बघतो आणि पैसे देतो. कित्येक वेळा सामान्य ग्राहक जेवण झाल्याबरोबर लवकरात लवकर हॉटेलबाहेर पडतो. त्यामुळे जर सुविधा शुल्क आकारणीवरून वाद घालावा लागला तर हॉटेलमध्ये वादावादी होऊ शकते आणि मग ग्राहकाकडे हा फुकट्या कशाला इथे आला, अशा नजरेने बघितले जाते. त्यातून सुटका म्हणून अनेक वेळा सुविधा शुल्काकडे दुर्लक्ष केले जाते. एवढेच नव्हे तर नवीन बिल आणण्यासाठी लागणारा वेळदेखील ग्राहकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. आता जरी दर्शनी भागामध्ये सुविधा शुल्क हे ऐच्छिक असल्याचा फलक जरी लागला तरी या शुल्काला अधिकृतता कशी काय मिळणार? सुविधा शुल्क हे हॉटेलच्या गल्ल्यात गेल्यानंतर वेटरच्या खिशामध्ये जाईलच याचा भरोसा नसतो. अनेक मोठी हॉटेल सुविधा शुल्कामधील काही भाग आपल्याकडे ठेवून घेतात. त्यामुळे वेटर लोकांचेदेखील नुकसान होणार आहे. कर हा सरकारी असतो तर सुविधा शुल्क हे सुविधांवर अवलंबून असते. वेटरने चांगली सुविधा द्यावी म्हणून टिप असते. पण टिप ही बिलात समाविष्ट करणे म्हणजे टिप या संकल्पनेला गरज नसताना कायदेशीर बनविणे आणि ग्राहकाला भुर्दंड बजावणे होय. त्यामुळे टापटिप सुविधा देणाऱ्या वेटरला टिप द्यायची की हॉटेलला द्यायची आणि त्यातूनही टिप कायदेशीर कशी काय बनवू शकतात, हा प्रश्न आहे. ग्राहक हा राजा असतो. पण राजाला टिपचा भुर्दंड बसविणे योग्य नाही.

(लेखक हे ग्राहक न्यायालय अ‍ॅडव्होकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.)