शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

काळ तर मोठा कठीण आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 03:48 IST

शोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते.

- रविप्रकाश कुलकर्णीशोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते.लोकही पूर्वीच्याच तन्मयतेने ते ऐकतात. त्याचीच थोडी उजळणी करू या -‘शोले’ पूर्वीचा सिनेमा आणि ‘शोले’ नंतरचा सिनेमा असे म्हणण्याइतके परिवर्तन- बदल सिनेमाचा होत गेला. ‘शोले’मुळे खलनायकदेखील नायक झाला. त्याला तेवढे ग्लॅमर आले. परिणामी, बिस्किटासारख्या बाळाच्या जाहिरातीतदेखील ‘गब्बर की असली पसंद’ आले!शोलेचे संवाद इतके लोकप्रिय झाले की, कालपर्यंत असल्या रेकार्ड्स निघत होत्या. तिथे ‘शोले’ या रेकॉर्ड्सवर निघाल्या आणि नाक्यानाक्याच्या सार्वजनिक कार्यक्रमातून त्या वाजविल्या जाऊ लागल्या!पुढच्या चित्रपटात ‘शोले’ च्या कॉप्य दिसायला लागल्याच, पण नाटकातसुद्धा ‘शोले’ची बाधा दिसायला लागली. ‘शोले’चे लेखक सलीम जावेदचे हुजरे तर म्हणायला लागले की, ज्याच्या साम्राज्यावरचा सूर्य-लोकप्रतिनिधीचा सूर्य कधीच मावळणार नाही. आणि ते खरेच माणूस खुद्द सलीम जावेद उद्दामपणे वागू लागले म्हणे.हे असे सगळे वातावरण हे अभूतपूर्व असेच होते. त्यामुळेच अनुपमा चोप्रा यांनी ‘मेकिंग आॅफ शोले’ हे सांगणारे पुस्तक लिहिले. हिंदी सिनेमावरचे हे इंग्रजी पुस्तक, त्याला राष्टÑीय पुरस्कार मिळाला!हे फॅड इतके पसरत गेले की, मग हृषिकेश गुप्तेला हजार वेळा शोले पाहणाºयांची गोष्ट अशी कथा लिहावीशी वाटली.तेव्हा मग वाटले, आता शोले आणि त्यासंबंधात कुणाला काही सांगायचे राहिले असे वाटत नाही. सांगितले गेले, तर जुन्याचीच ती पुनरावृत्तीच असेल, पण नाही तसे नाही, अजूनही ‘शोले’ पिच्छा सोडायला तयार नाही, असे वाटायला लागलेय. बघा-इतना सन्नाटा क्यों है भाईहंगल विचारतोय कधीपासून,गब्बर झाडतोय कधीपासूनप्रार्थनासभेत प्रार्थना करणाºयांवरप्रभातकाळी मार्निंग वॉक करणाºयांवरतुम्ही गप्प आणिम्हातारा हंगल विचारतोयइतना सन्नाटा क्यों है भाईत्याला माहीत आहेसमीर अहमद मरून पडलाय गोळा लागून, पण तुम्ही ते सांगावे ही इच्छा नाही त्याची आणि ‘बोलणं’ हे जीवंतपणाचे लक्षण आहे म्हणून.तो सारखा विचारतोय.इतना सन्नाटा क्यों है भाईहं दिशादिग्दर्शन आहे ‘शोलेच्या कविता’मधून आणि त्याचे कवी आहेत किरण येले.आपले वाङ्मयवृत्त (जुलै २०१७) अंकात किरण येले यांच्या शोलेच्या कविता आलेल्या आहेत.किरण यांनी जणू कॅमेरा लावावा, असे चित्रण केले. सद्यस्थितीत किरणसारख्या कवीची घुसमट किती होत असेल आणि म्हणून त्याला ‘शोले’तदेखील स्वत:चा हुंकार दिसतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.दिवसेंदिवस झुंडशाहीचे प्राबल्य वाढत चालले आहे. आमच्या मनासारखे तुम्ही वागत नाही, बोलत नाही. मग आम्ही तुमचा आवाज घोटणार ही वृत्ती वाढत चालले आहे. सहिष्णुता ही गोष्ट म्हणजे आदर्शवाद आहे. जो गोष्ट कधीच अस्तित्वात नसते, त्याचा काहीच उपयोग नसतो, असे म्हणून गळा घोटण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. मग कधी नाटक बंद पाडण्याचे प्रकार होतात. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आतच अंदाजानेच तो आपल्या विरुद्ध आहे, असे वाटून त्याचे खेळच होऊ नये, याचा प्रयत्न सुरू होतो.ही समांतर स्वयंघोषित सेन्सॉरशिप त्यापुढे एकटा दुकटा हतबल होतोय...म्हणून तर म्हणतोय काळ तर मोठा कठीण आलाय हे खरेय.पण म्हणून भले आपला आवाज क्षीण असला, म्हणून काय झाले आपले मत व्यक्त करायला काय हरकत आहे? शोलेच्या कविता असाच एक उद्गार आहे.म्हणूनच त्याचे स्वागत करायचे.