शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काळ तर मोठा कठीण आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 03:48 IST

शोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते.

- रविप्रकाश कुलकर्णीशोले चित्रपटाविषयी काही सांगण्याचे राहिले आहे का? असे वाटण्याइतके त्याबद्दल पुन्हा-पुन्हा बोलले गेले आहे. लिहूनदेखील झालेले आहे, तरीसुद्धा ‘शोले’बद्दल पुन्हा-पुन्हा बोलले जाते.लोकही पूर्वीच्याच तन्मयतेने ते ऐकतात. त्याचीच थोडी उजळणी करू या -‘शोले’ पूर्वीचा सिनेमा आणि ‘शोले’ नंतरचा सिनेमा असे म्हणण्याइतके परिवर्तन- बदल सिनेमाचा होत गेला. ‘शोले’मुळे खलनायकदेखील नायक झाला. त्याला तेवढे ग्लॅमर आले. परिणामी, बिस्किटासारख्या बाळाच्या जाहिरातीतदेखील ‘गब्बर की असली पसंद’ आले!शोलेचे संवाद इतके लोकप्रिय झाले की, कालपर्यंत असल्या रेकार्ड्स निघत होत्या. तिथे ‘शोले’ या रेकॉर्ड्सवर निघाल्या आणि नाक्यानाक्याच्या सार्वजनिक कार्यक्रमातून त्या वाजविल्या जाऊ लागल्या!पुढच्या चित्रपटात ‘शोले’ च्या कॉप्य दिसायला लागल्याच, पण नाटकातसुद्धा ‘शोले’ची बाधा दिसायला लागली. ‘शोले’चे लेखक सलीम जावेदचे हुजरे तर म्हणायला लागले की, ज्याच्या साम्राज्यावरचा सूर्य-लोकप्रतिनिधीचा सूर्य कधीच मावळणार नाही. आणि ते खरेच माणूस खुद्द सलीम जावेद उद्दामपणे वागू लागले म्हणे.हे असे सगळे वातावरण हे अभूतपूर्व असेच होते. त्यामुळेच अनुपमा चोप्रा यांनी ‘मेकिंग आॅफ शोले’ हे सांगणारे पुस्तक लिहिले. हिंदी सिनेमावरचे हे इंग्रजी पुस्तक, त्याला राष्टÑीय पुरस्कार मिळाला!हे फॅड इतके पसरत गेले की, मग हृषिकेश गुप्तेला हजार वेळा शोले पाहणाºयांची गोष्ट अशी कथा लिहावीशी वाटली.तेव्हा मग वाटले, आता शोले आणि त्यासंबंधात कुणाला काही सांगायचे राहिले असे वाटत नाही. सांगितले गेले, तर जुन्याचीच ती पुनरावृत्तीच असेल, पण नाही तसे नाही, अजूनही ‘शोले’ पिच्छा सोडायला तयार नाही, असे वाटायला लागलेय. बघा-इतना सन्नाटा क्यों है भाईहंगल विचारतोय कधीपासून,गब्बर झाडतोय कधीपासूनप्रार्थनासभेत प्रार्थना करणाºयांवरप्रभातकाळी मार्निंग वॉक करणाºयांवरतुम्ही गप्प आणिम्हातारा हंगल विचारतोयइतना सन्नाटा क्यों है भाईत्याला माहीत आहेसमीर अहमद मरून पडलाय गोळा लागून, पण तुम्ही ते सांगावे ही इच्छा नाही त्याची आणि ‘बोलणं’ हे जीवंतपणाचे लक्षण आहे म्हणून.तो सारखा विचारतोय.इतना सन्नाटा क्यों है भाईहं दिशादिग्दर्शन आहे ‘शोलेच्या कविता’मधून आणि त्याचे कवी आहेत किरण येले.आपले वाङ्मयवृत्त (जुलै २०१७) अंकात किरण येले यांच्या शोलेच्या कविता आलेल्या आहेत.किरण यांनी जणू कॅमेरा लावावा, असे चित्रण केले. सद्यस्थितीत किरणसारख्या कवीची घुसमट किती होत असेल आणि म्हणून त्याला ‘शोले’तदेखील स्वत:चा हुंकार दिसतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.दिवसेंदिवस झुंडशाहीचे प्राबल्य वाढत चालले आहे. आमच्या मनासारखे तुम्ही वागत नाही, बोलत नाही. मग आम्ही तुमचा आवाज घोटणार ही वृत्ती वाढत चालले आहे. सहिष्णुता ही गोष्ट म्हणजे आदर्शवाद आहे. जो गोष्ट कधीच अस्तित्वात नसते, त्याचा काहीच उपयोग नसतो, असे म्हणून गळा घोटण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. मग कधी नाटक बंद पाडण्याचे प्रकार होतात. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आतच अंदाजानेच तो आपल्या विरुद्ध आहे, असे वाटून त्याचे खेळच होऊ नये, याचा प्रयत्न सुरू होतो.ही समांतर स्वयंघोषित सेन्सॉरशिप त्यापुढे एकटा दुकटा हतबल होतोय...म्हणून तर म्हणतोय काळ तर मोठा कठीण आलाय हे खरेय.पण म्हणून भले आपला आवाज क्षीण असला, म्हणून काय झाले आपले मत व्यक्त करायला काय हरकत आहे? शोलेच्या कविता असाच एक उद्गार आहे.म्हणूनच त्याचे स्वागत करायचे.