शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

वाघांचे अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 23:15 IST

हल्ली वाघही जरा माणसाळलेले दिसतात. जंगल सोडून अधूनमधून ते शहरांकडे धाव घेत असतात.

- नंदकिशोर पाटीलहल्ली वाघही जरा माणसाळलेले दिसतात. जंगल सोडून अधूनमधून ते शहरांकडे धाव घेत असतात. मायानगरी मुंबापुरीत तर त्यांचं येणं-जाणं नित्याचंच झालं आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीपासून बालघाटाच्या डोंगरदऱ्यांपर्यंत कधीकाळी वाघांचा खूप दरारा होता. पण हल्ली जंगलात त्यांचं मन रमत नाही. शहरांतील ‘हायफाय’ जीवनशैलीची त्यांना भुरळ पडली असावी. शहरांतली माणसं जसं ‘वीकएन्ड’ला जंगलाकडे धाव घेतात, तसं आपणही शहरांत येऊन वीकएन्ड साजरा करावा असंही कदाचित त्यांना वाटत असावं. परवा मालाडच्या एका मल्टीप्लेक्समध्ये बिबट्या आढळला म्हणे. शहरी माणसांना बिबट्या आणि वाघातला फरकही धड कळत नाही. तो बिबट्या नव्हे, तर बिबट्याचा वेष धारण केलेला वाघ असण्याची शक्यता अधिक. सध्या वांद्रेतील सेनेतही बिबट्याची चलती असल्यामुळे आला असेल बिचारा वेषांतर करून! वाघांना शहराचं आकर्षण असण्यामागे तशी अनेक कारणं आहेत. शहरांत रस्तोरस्ती लागलेल्या होर्डिंग्ज्वरील ‘वाघां’ची चित्रे बघून खरेखुरे वाघही मनोमन सुखावत असतील. शहरात तसेही पोट भरण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. जर तुम्ही वाघकुळातील असाल, तर बसल्याजागी काम फत्ते होऊन जाते. फक्त गुरगुरता आलं पाहिजे! मागच्या आठवड्यात एक वाघोबा पाय मोकळे करायला म्हणून गिरगावात आलेले. समोरच्या गल्लीत शर्टावर ‘वाघसेने’चा बिल्ला लावलेला एक गल्लीदादा तिथल्या व्यापाºयांना जाम घाम फोडत होता. ते दृश्य बघून खºयाखुºया वाघाला हसू आवरेना. पण हसरा वाघ म्हणून लहान मुलांनी आपणास गुदगुल्या करायला नकोत, म्हणून त्यानं हसू आवरतं घेतलं. शहरातली पॉश रेस्टॉरंट्स, बार, पब्स बघून वाघांनाही ‘बसण्याचा’ मूड होत असेल का, ही शंका मनात यायला उशीर की, पिझ्झा, बर्गरवर ताव मारणारी माणसं बघून वाघांच्या तोंडाला पाणी सुटल्याचं मी पाहिलं आहे. उद्या कदाचित ‘मॅक्डोनॉल्ड’ किंवा ‘केएफसी’च्या काऊंटरवर केंटुकी चिकनची आॅर्डर देणारा एखादा वाघ दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, हल्ली जंगलातील शिकारीला वाघ मंडळी जाम वैतागली आहे. दिवसरात्र धावपळ केल्यानंतर कुठे एखादी शिकार हाती लागते. त्यातही वाटेकरी अधिक. त्यापेक्षा शहरातली खंडणी परवडली. नुसतं धमकावलं, तरी बिल्डर मंडळी खोकीभर ‘माल’ पाठवतात! फेरीवाल्यांकडून मिळणाºया चिरीमिरीवर पॉकेटमनी सहज निघून जातो. वाघ म्हटलं की, सहसा कुणी रिकाम्या हातांनी परत पाठवणार नाही. सत्ताधाºयांनाही व्याघ्रकोप परवडणारा नसतो. नाणारच्या नावानं नुस्ती डरकाळी फोडली तरी ‘लादणार नाही’ असा खुलासा मुख्यमंत्र्यांना करावा लागतो आणि ‘बाहेर पडणार’ अशी नुसती धमकी दिली तर शहेन‘शाहां’ना वांद्रेत येऊन पायधूळ झाडून जावी लागते. आपले वनमंत्री तर सतत कागदीवाघ नाचवित असतात.गतवर्षी तर त्यांनी चक्क भुसा भरलेला एक वाघ ‘मातोश्री’वर पाठवला होता. त्यातून त्यांना नेमकं काय सूचित करायचं होतं, याचा खुलासा अद्याप केलेला नाही. वनमंत्र्यांवर आता सेनेचे वाघ सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. शहरी वाघांचे चाललेले हे लांगुलचालन बघून जंगली वाघांची पावलं शहरांकडे पडली नाहीत तरच नवल!

टॅग्स :Tigerवाघ