शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

वाघांची नखे, गेंड्यांची शिंगे, हत्तींचे सुळे आणि मोरांची पिसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:07 IST

जिवंत वन्यप्राणी, पक्षी अथवा त्यांचे अवयव जगभरात प्रचंड किमतीला विकले जात असल्यामुळे या विचित्र लालसेपोटी हजारो तस्कर त्यांच्यावर तुटून पडले आहेत. 

- रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार

मौल्यवान समजल्या जाणाऱ्या निर्जीव चीजवस्तूंप्रमाणेच जंगलातील जिवंत वन्यप्राणी, पक्षी अथवा त्यांच्या शिकारीतून मिळवलेल्या अवशेषांना जगभरातून असलेली प्रचंड मागणी आणि किंमत लक्षात घेत हजारो तस्कर त्यांच्यावर तुटून पडले आहेत. या तस्करांकडून होणाऱ्या प्राणी-पक्ष्यांच्या संहारामुळे जैवविविधतेच्या साखळीतील हे मुके दुवे हळूहळू नष्ट होण्याचा धोका अगदी नजीक येऊन ठेपला आहे.   

भारताची जैवविविधता जगातील ७.६ टक्के सस्तन प्राणी आणि १२.६ टक्के पक्ष्यांसह जगातील सुमारे ६.५ टक्के वन्यजीव प्रजातींचे पालन करते. दुर्दैवाने, वन्यजीवांशी संबंधित उत्पादनांच्या जागतिक मागणीमुळे उपखंडात वन्यजीव गुन्हेगारीला चालना मिळाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) ‘स्मगलिंग इन इंडिया’ या ताज्या अहवालातील माहितीनुसार सलग सहा वर्षांच्या कालावधीतील कारवाईत १६२  देश आणि प्रदेशांमध्ये खतरनाक आंतरराष्ट्रीय नेटवर्कद्वारे चालणाऱ्या बेसुमार तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे.

सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू, मौल्यवान आभूषणे, पारंपरिक उपचारपद्धती, निरनिराळे गैरसमज, तसेच अगदी काळी जादू करण्यासारख्या कारणांसाठी मृत वन्यप्राण्यांचे अवशेष तस्करीच्या वाटेने जगभरात पोहचत आहेत. गेंड्याच्या शिंगामुळे कर्करोग बरा होतो असा गैरसमज अलीकडे दक्षिण आफ्रिकेत पसरल्याने गेंड्यांवर संक्रांत आलीय. पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलापासून हिमालयाच्या खडबडीत भूभागापर्यंत विविध वातावरणात राहणारे बिबटेही दुर्दैवाने सर्वांत धोक्यात आहेत. नखे आणि हाडांसाठी वाघ, शिंगांसाठी गेंडे आणि सुळ्यांसाठी हत्तीची शिकार, तसेच तारा कासवांच्या विक्रीचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. गेल्या तीन वर्षांत भारतात हस्तिदंत जप्तीची ९०, तर हत्तींच्या शिकारीची २९ प्रकरणे नोंदवली गेली.  खवले मांजर, साळिंदर, घुबड, हरिण, कासवे, मांडूळ, घार असे वन्यजीव पकडून त्यांना जिवंत किंवा हत्या करून त्यांचे अवयव जगभरात पाठवले जातात. त्याचबरोबर लाल चंदनासहित दुर्मीळ वनस्पतींचीही तस्करी अफाट आहे. वन्यप्राण्यांची तस्करी हा जगातला चौथा सगळ्यात मोठा संघटित अपराध करण्यात आघाडीच्या २० देशांमध्ये भारताचा समावेश आहे. वन्यजीव (संरक्षण) कायद्यांतर्गत संरक्षित असतानाही मोराची पिसे आणि जिवंत मोर हे तस्करांचा किमती ऐवज ठरले आहेत. न्हावा शेवा बंदरात मोराच्या शेपटीच्या पंखांचे तब्बल २८ लाख तुकडे आणि पिसांच्या १६ हजार काड्या नुकत्याच जप्त करण्यात आल्या. कर्नाटकातील शिमोगा येथे ठिपकेदार हरणांचे कातडे, ट्रॉफी आणि सांबरच्या शिंगांच्या विक्रीचा बाजारच उघडकीस आला.  वन्यजीव संरक्षण कायद्याने अनुसूची एक अंतर्गत हत्तींना सर्वोच्च पातळीचे संरक्षण देण्यात आले असले तरी  आशियाई हत्तींचे निवासस्थान असलेल्या आपल्या देशात शिकारी आणि तस्करांपासून त्यांचा बचाव करणे अतिशय कठीण झाले आहे. तामिळनाडूजवळच्या श्रीविल्लीपुथूर, ओडिशा, गुवाहाटी येथील कारवायांमध्ये मीटरभर लांबीचे हत्तीच्या सुळ्यांचे साठे हस्तगत करण्यात आल्याने या व्यापाराची व्याप्ती लक्षात आली. दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील वाढत्या मागणीमुळे, भारतातून कासवांची तस्करी वाढली आहे. पारंपरिक औषधींमध्येही त्यांचा वापर केला जातोच, शिवाय ही कासवे पाळल्यास ती समृद्धी आणतात या अंधश्रद्धेमुळे त्यांची तस्करी केली जाते. मध्य प्रदेशात एकाच कारवाईत डीआरआयने ३० बिबट्यांची कातडी जप्त केली.

विशेषत: आशिया आणि आफ्रिकेत आढळणारे खवले मांजर हे जगातील सर्वाधिक तस्करी केल्या जाणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. प्रामुख्याने पारंपरिक औषधांसाठी आणि शोभेच्या  वस्तू म्हणून त्यांच्या खवल्यांना प्रचंड मागणी असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 

भ्रष्टाचार, प्रभावहीन कायदे, न्यायव्यवस्थेतील दिरंगाईमुळे वन्यजीवांची लूटमार सुरू आहे. यात पकडले गेले तर स्थानिक शिकारी आणि दलालच. खरे सूत्रधार आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचे नेटवर्क कायमच अभेद्य राहते ते पुन्हा पुन्हा वन्यजीवांवर हल्ले करण्यासाठी. (उत्तरार्ध)ravirawool66@gmail.com

टॅग्स :Smugglingतस्करी