शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सोपान महादू पाटील हे त्यांचे कागदोपत्री नाव असले तरी त्यांची ओळख कष्टक-यांचे ‘भाई’ एस. एम. तात्या अशीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:26 IST

काही काही माणसं आपलं आयुष्यच अशा पद्धतीने जगतात की, त्यामुळे त्यांचे नाव हे केवळ नाव न राहता ती चक्क चळवळच बनते. त्याच पंक्तीतील नाव म्हणजे भाई एस. एम. तात्या!

काही काही माणसं आपलं आयुष्यच अशा पद्धतीने जगतात की, त्यामुळे त्यांचे नाव हे केवळ नाव न राहता ती चक्क चळवळच बनते. त्याच पंक्तीतील नाव म्हणजे भाई एस. एम. तात्या! सोपान महादू पाटील हे त्यांचे कागदोपत्री नाव असले तरी त्यांची ओळख मात्र भाई एस. एम. पाटील हीच होती. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या वरवडे या गावात जन्म झालेल्या या माणसाने आपले जीवन अगदी विद्यार्थी दशेपासूनच चळवळीसाठी वाहिले. राष्ट्रप्रेम आणि कष्टकरी बळीराजाविषयी वाटणारी कणव हा त्यांच्या चळवळीचा आणि जीवनाचा खरा आधार होता. त्याच आधाराच्या बळावर सोलापूरची जिल्हा परिषद असो, जिल्हा बँकेचे सभागृह असो अथवा विधिमंडळाचे सभागृह असो त्यांची मुलुखमैदानी तोफ गरजली की, अनेकांचे धाबे दणाणायचे! स्वच्छ चारित्र्य, प्रत्येक आंदोलनाच्या मुळाशी दडलेले लोकहित आणि लढवय्या बाणा यामुळे त्यांच्या तोफेला कमालीची जरब होती. ती जरब त्यांनी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जतन केली. त्यांची प्राणज्योत दि. २३ आॅक्टोबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी मालवली आणि राज्यभरातील कष्टक-यांच्या आणि बळीराजांच्या चळवळीतून एकच सूर उमटला... अरेऽरे... आपले एस. एम. तात्या आपल्याला सोडून गेले!स्वातंत्र्यानंतर देशात आणि महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक चळवळींच्या वैचारिक घुसळणीचा काळ सुरू झाला. त्याच काळात कष्टकरी आणि शेतक-यांचा कैवार घेण्याची शपथ घेऊन ३ आॅगस्ट १९४८ रोजी आळंदी येथे केशवराव जेधे, शंकरराव मोरे, क्रांतिसिंह नाना पाटील, माधवराव बागल, तुळशीदास जाधव, पंजाबराव देशमुख, दाजीबा देसाई यांसारख्या देशप्रेमी क्रांतिकारकांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यांचीच प्रेरणा घेऊन एस. एम. पाटील या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तरुणाने शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा मोठ्या दिमाखात आपल्या खांद्यावर त्यावेळी घेतला. त्या झेंड्याच्या पावित्र्य व प्रतिष्ठेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचण्याचा निर्णयही त्यांनी त्याच वेळी घेतला. शालेय शिक्षण वरवडे व मोडनिंब या गावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी सोलापूर व पुण्याकडे धाव घेतली. शिक्षण आणि चळवळ यांची सांगड घालत पुण्याच्या शिवाजी बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी कला शाखेची पदवी संपादन केली. राष्टÑ सेवादलातही निष्ठेने कार्य केले. अनेक विद्यार्थी चळवळी चालविल्या. देशात अन्नधान्य तुटवडा असताना १९६५ साली त्यासाठी आंदोलन करणाºया एस. एम. पाटील यांना स्थानबद्धही करण्यात आले होते. गोवा मुक्ती संग्रामात देखील सक्रिय राहिले.शेतकरी कामगार पक्षावरील निष्ठा जतन करत त्यांनी राज्यात अनेक चळवळी गतिमान केल्या. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या उजनी धरणाचे पाणी माढा तालुक्यालाच मिळत नव्हते. त्यावर २००८ साली त्यांनी रात्री १२ वाजता मशाल मोर्चा काढला आणि शासनाला जागे केले. तो मोर्चा आजही सर्वांना स्मरणात आहे. जिल्हा बँकेत तब्बल चार तप ते संचालक पदावर कार्यरत राहिले. शेतकºयांना अर्थसाह्य मिळविण्यासाठी त्यांची पोटतिडकीने चाललेली धडपड सोलापूर जिल्हा कधीही विसरू शकणार नाही. ‘तात्या’ ही सर्वांनीच त्यांना प्रेमाने दिलेली उपाधी! तात्यांचे चळवळ अधिष्ठान सांभाळण्याची जबाबदारी आता महाराष्टÑात जलतज्ज्ञ म्हणून ख्याती पावलेले जलमित्र अनिल पाटील आणि अ‍ॅड. बाळासाहेब पाटील या तात्यांच्या दोन चिरंजीवांवर आहे. ती त्यांनी समर्थपणे सांभाळावी हीच अपेक्षा.- राजा माने१ं्नं.ेंल्ली@’ङ्म‘ें३.ूङ्मे