शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘त्या’ मुलींच्या पालकांना शिक्षा झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:31 IST

या देशात अजूनही ४० टक्के बालविवाह होतात. धक्कादायक म्हणजे, जगातील एकूण बालविवाहांपैकी एक तृतीयांश बालविवाह एकट्या भारतात होतात. आणि बहुतांश वेळेला मुलींचे जन्मदातेच त्यांना या आगीत लोटत असतात. त्यामुळे अशा बालविवाहात अडकलेल्या मुलींची सुटका करून त्यांच्या पालकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

या देशात अजूनही ४० टक्के बालविवाह होतात. धक्कादायक म्हणजे, जगातील एकूण बालविवाहांपैकी एक तृतीयांश बालविवाह एकट्या भारतात होतात. आणि बहुतांश वेळेला मुलींचे जन्मदातेच त्यांना या आगीत लोटत असतात. त्यामुळे अशा बालविवाहात अडकलेल्या मुलींची सुटका करून त्यांच्या पालकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.बालविवाह झालेल्या ११ मुलींनी हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्र्तींना पत्र लिहून त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली तेव्हा बालविवाहाच्या या कुप्रथेनं आजही हजारो निष्पाप मुलींचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं जातंय याचं वास्तव पुन्हा एकदा समाजापुढं आलं.अर्थात हे वास्तव यापूर्वीही अनेकदा उघड झालं असलं तरी आमच्या संवेदना एवढ्या बोथट झाल्याय की निव्वळ एक घटना म्हणून याकडे बघायचं, तात्पुरती हळहळ व्यक्त करायची अन् मग नेहमीप्रमाणं आपल्या कामाला लागायचं, एवढंच काय ते आम्ही आजवर करत आलोय. ही घटना यासाठी अधिक सकारात्मक मानायची कारण या मुली स्वत: हिंमत करून बालविवाहाविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. आम्हाला आमच्या सर्व हक्कांपासून वंचित ठेवलं जातंय, अनेक संकटांचा सामना करावा लागतोय अशी व्यथा त्यांनी या पत्रात मांडली आणि न्यायालयानेही त्यांच्या वेदनांची गांभीर्याने दखल घेत या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले. या याचिकेच्या निमित्ताने १८८४ च्या अशाच एका बंडाचे स्मरण होते. भारतातील प्रॅक्टिस करणाºया पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई सावे (राऊत) यांनी त्यांचा बालविवाह अमान्य करीत पतीच्या घरी जाण्यास नकार दिला त्यावेळी फार मोठं वादळ उठलं होतं. त्यावेळी न्यायालयाने रखमाबार्इंविरुद्ध निर्णय देत पतीसोबत राहा अथवा जेलमध्ये जावं लागेल असा आदेश दिला. तेव्हा मी जेलमध्ये जाणं पसंत करेल पण अशाप्रकारच्या विवाहबंधनात कदापि राहणार नाही, अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली. भारतवंशाचं दुर्दैव हे की रखमाबार्इंसारख्यांचं बंड आणि राजाराममोहन राय यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी या कुप्रथेच्या उच्चाटनाकरिता दिलेला प्रदीर्घ लढा व्यर्थ ठरावा अशी भीषण परिस्थिती आजही कायम आहे. शेकडो वर्षं बालविवाहाचे चटके सोसल्यानंतरही आम्ही त्यातून बाहेर पडण्यास तयार नाही.ब्रिटिश काळात १९२९ साली बालविवाह प्रतिबंधक कायदा अमलात आला होता. त्यानंतर १९४९, ७८ आणि २००६ साली त्यात सुधारणा करण्यात आल्या. पण या कायद्याची जेवढ्या कठोरतेने अंमलबजावणी व्हायला पाहिजे तशी ती होताना दिसत नाही. त्यामुळेच मानवाधिकार आयोगानेही वाढत्या बालविवाहांची गांभीर्यानं दखल घेत त्यांच्या उच्चाटनाकरिता ठोस पावलं उचलण्याची सूचना केली आहे.बालविवाह हा फक्त सामाजिक प्रश्न नाही. मुलींचे शिक्षण आणि आरोग्याशीही त्याचा थेट संबंध आहे. त्यामुळं बी. महालता आणि इतर दहा जणींनी आपल्या बालविवाहाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचं जे धाडस दाखवलं ते इतरांनाही दाखवावं लागणार आहे.मनात कुठलेही भय न बाळगता आत्मविश्वासानं या कुप्रथेला कडाडून विरोध करावा लागणार आहे. अन्यथा ज्या देशात वंशाचा दिवा चालविण्यास एकतरी मुलगा असावा या बुरसटलेल्या मानसिकतेपोटी लाखो ‘नकोशा’ मुली जन्माला येतात, ज्या देशात अजूनही कायद्याची लक्तरे वेशीला टांगून गाव पंचायती (अ)न्याय करतात आणि एका बलात्काºयाला मटणाचं गाव जेवण देण्याची शिक्षा ठोठावली जाते तिथे या शेकडो हजरो निष्पाप मुलींना न्याय कसा मिळणार?- सविता देव हरकरे savita.harkare@lokmat .com