शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

गुलशनाबादेतील ‘कंटक’वन

By admin | Updated: October 15, 2016 00:04 IST

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक मोर्चांना जसे कोपर्डी येथील अत्यंत दुर्दैवी घटना हे तात्कालीक निमित्त ठरले तसेच नाशिक जिल्ह्यातील अशांततेलाही तळेगाव अंजनेरी

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक मोर्चांना जसे कोपर्डी येथील अत्यंत दुर्दैवी घटना हे तात्कालीक निमित्त ठरले तसेच नाशिक जिल्ह्यातील अशांततेलाही तळेगाव अंजनेरी येथील तशाच प्रकारच्या घृणास्पद घटनेचे निमित्त घडले. परंतु दुर्दैवाने ही तुलना येथेच संपते, कारण तद्नंतर नाशकात जे घडले, त्याच्याशी तळेगाव प्रकरणाचाही संबंध उरला नाही. संबंध होता तो केवळ टोळीबाजांचा व समाजकंटकांचा. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगावमधील अवघ्या पाच वर्षीय अजाण बालिकेवर जो शारीरिक अत्याचार झाला त्यातून लोकभावना संतप्त होणे कुणीही समजून घेऊ शकते आणि म्हणूनच गेल्या शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्दैवी प्रकारानंतर रविवारीही त्या घटनेची संपूर्ण शहरात गडद छाया पसरून राहाणे स्वाभाविक होते. पण त्यानंतर सलग तीन दिवस नाशिक शहर व जिल्ह्याच्याही काही भागात जे काही सुरू झाले आणि होत राहिले त्याचा तळेगावच्या घटनेशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. या अशांततेशी व जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेलेल्या भीतीच्या वातावरणाशी संबंध असेलच तर तो शहरातील विविध समाजकंटकांच्या टोळ्यांमधील संघर्ष आणि वर्चस्ववाद यांचा. शिवाय येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीशीही या सर्व प्रकाराचा संबंध जोडता येऊ शकणारा आहे. सलग चार ते पाच दिवस नाशिक शहर व काही प्रमाणात जिल्ह्याला ज्यांनी वेठीस धरले ते कोणत्याही विशिष्ट पक्षाचे, संघटनेचे, समाजाचे, पंथाचे, धर्माचे वा वर्गाचे लोक नव्हते. साऱ्यांचाच त्यात थोड्याफार प्रमाणात सहभाग होता. पण, त्यातील गंभीर बाब म्हणजे रस्त्यावर उतरणारी आणि जनसामान्यांना भयभीत करणारी ही सारी मंडळी निर्नायकी होती. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचीच मात्रा चालत नव्हती. ही अशी निर्नायकीच अनिर्बंधतेला निमंत्रण देणारी असते. त्यातून विवेक हरवल्याखेरीज राहात नाही व असे जेव्हा होते, तेव्हा सर्वार्थाने नुकसानच घडून येते, जे नाशकात झाले. कोणे एकेकाळी नाशिकला जातीय दंगलींची एक पार्श्वभूमी होती. परंतु सुदैवाने गेल्या दोन अडीच दशकांपासून एक सुंदर शांत शहर असाच नावलौकिक नाशिकने प्राप्त केला. या लौकिकास बट्टा लावण्याचे काम करणाऱ्या समाजकंटकांच्या विभिन्न टोळ्या अलीकडच्या काळात जोमाने कार्य करू लागल्या होत्या. यातील काही टोळीबाजांना माजी मंत्री छगन भुजबळ यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आधार लाभल्याचे आजही बोलले जाते. ते सत्यही असेल पण पूर्ण सत्य नव्हे. कारण भुजबळच नव्हे तर साधे नगरसेवकही आता अशा टोळ्यांचे तारणहार बनू लागले आहेत व त्यात त्यांना शरम वाटेनाशी झाली आहे. अर्थात अशा प्रवृत्तींचा जन्मच मुळात राजकीय व्यवस्थेत म्हणजे राजकीय पक्षात होत असतो आणि त्याला कोणताही पक्ष अपवाद राहिलेला नाशकात दिसून येत नाही व तीच खरी चिंतेची बाब आहे.लक्षणीय म्हणजे गुंडापुंडांना आश्रय देणारे पक्ष म्हणून अन्य सर्वच राजकीय पक्षांना एका पारड्यात टाकून स्वत:च्या साधनशुचितेचा टेंभा मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचेही या संदर्भातील सोवळे सुटून पडले. महापालिकेतील दोन जागांसाठीच्या गेल्या पोटनिवडणुकीप्रसंगी पवन पवार नामक एका अत्यंत कुख्यात गुंडाला या पक्षाने आपल्या कडेवर घेतले. पण यच्चयावत सर्व माध्यमांनी त्या संदर्भात टीका करूनही त्याला कडेवरून उतरविले गेले नाही. कारण तो या पक्षाने उघड्या डोळ्यांनी घेतलेला निर्णय होता. ज्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याचे उघडपणे बोलले गेले. याच पवारला नाशकातील अशांततेप्रकरणी अटक केली गेल्याचे पाहाता भाजपाच्या श्रीमुखात बसून गेली आहे. तेव्हा राजकीय व्यवस्थांच्या टोळीभरण-पोषणाचा जो मुद्दा या निमित्ताने पुढे येऊन गेला आहे, तो अधिक महत्त्वाचा ठरावा. - किरण अग्रवाल