शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विचारशक्ती

By admin | Updated: November 15, 2016 07:53 IST

मानवी जीवनाचे संचलन विचार, वाणी आणि कर्म याद्वारे होते. विचारांचे रुपांतर वाणी व कर्म यात होत असते. आपण म्हणू शकतो की ‘विचार’ हे बीज आहे.

मानवी जीवनाचे संचलन विचार, वाणी आणि कर्म याद्वारे होते. विचारांचे रुपांतर वाणी व कर्म यात होत असते. आपण म्हणू शकतो की ‘विचार’ हे बीज आहे. त्यापासून तयार झालेले फूल हे ‘वाणी’प्रमाणे तर ‘कर्म’ हे फळा प्रमाणे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विचारास सर्वाधिक महत्वपूर्ण स्थान असून योगशास्त्र तर पूर्णपणे विचारांवरच आधारित आहे. योगाची व्याख्या करताना भगवान पतंजली म्हणतात, योग हा आपल्या मनाच्या वृत्तीला लगाम घालणारा आहे. मनोवृत्ती म्हणजे मनात निर्माण होणाऱ्या विचारांचा कल्लोळ. त्याद्वारेच आपल्या मनात अनंत चिंता निर्माण होतात. त्या पूर्णपणे आपल्या वाणी, कर्म व शरीर यांना वाईट प्रकारे प्रभावित करतात. वैद्याकशास्त्रात म्हटले आहे की, मानवाला होणारे आजार हे ६० टक्क्यांहून अधिक मनातूनच निर्माण होतात. मानवी मनास आपण विचारप्रवाह सुध्दा म्हणू शकतो. हा प्रवाह सतत वाढत राहतो. झोपेमध्ये ज्या प्रकारे आपण स्वप्न पाहातो तसेच आपण झोपेमध्ये तणावग्रस्त देखील असतो. शेवटी अशा विचारांवर नियंत्रण आणून त्यांना सकारात्मक आणि सर्जनशील बनविणे हे मानवी जीवनासाठी आवश्यक असते. विचारांवर नियंत्रण करण्यासाठी ऋषीमुनींनी अनेक उपाय सांगितले आहेत. विचार नियंत्रित होण्यास सुरुवात होते, तेव्हां त्यास उर्जा प्राप्त होऊन ते सकारात्मक होऊन जातात.आपल्याला चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून सकारात्मक विचार निर्माण होण्यास बरीच मदत होते. धर्मग्रंथ आणि महापुरुषांचे जीवनपट यांचे वाचन केल्यास आपले विचार निश्चितच सृजनशील बनतात. वाचनाद्वारे मेंदूमध्ये जी कंपने तयार होतात, ती आपल्या विचारांना प्रभावित करीत असतात. चांगल्या ग्रंथाच्या वाचनातून जी कंपने निर्माण होतात ती चांगल्या विचारांना जन्म देतात. अशाच प्रकारे चांगले विचार ऐकल्यावर ते आपल्या विचारांना सृजनशील बनवतात. प्रवचन आणि चांगल्या वक्त्यांची भाषणे मानवी मनास खूप प्रभावित करतात.मानव जसा विचार करतो, तसाच तो बनत जातो. त्यामुळेच गुन्हेगारी व्यक्तीचे मन पूर्णपणे नकारात्मक आणि विध्वंसक विचारांनी भरलेले असते. शेवटी जगामध्ये असलेली हिंसा व घृणा समाप्त करावयाची असेल तर आपल्याला व्यक्तीच्या मनामध्ये सकारात्मक विचार भरणे आवश्यक आहे. व्यक्तीचे विचार बदलले तरच व्यक्ती बदलेल. मनामध्ये असलेल्या विचारामुळेच व्यक्ती ही सत्कर्मी अथवा दुष्कर्मी बनते. यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये चांगले संकल्प करण्याची परंपरा आहे 'तन्मे मन: शिवसंकल्पमस्तुु'

-डॉ. भूषणकुमार उपाध्याय