शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

विरोधक आहेत की नाही ते दिसेल..!

By अतुल कुलकर्णी | Updated: July 25, 2017 13:38 IST

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष राज्यात शिल्लक आहे की नाही हे आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात जनतेला दिसेल.

- अतुल कुलकर्णीराज्याच्या पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात होईल. राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मतं फुटली आणि संख्येने कमी असलेल्या विरोधकांचा उरलासुरला जोरही अधिवेशनाआधीच संपला. आता विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला अडचणीत आणण्याचे नियोजन करायला हवे. शस्त्र पारजून तयार ठेवायला हवीत. पण यातले काहीही न करता सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे आपापसातच भांडण सुरू आहे. राज्य विधिमंडळात नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणताना माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा ठराव आधी आणायचा की राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा? यावरून हे दोन पक्ष लहान मुलांसारखे भांडत आहेत.‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी एक म्हण आहे. ती या वादावादीवर चपखल लागू होते. इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव काँग्रेसने आधीच दिलेला होता. मग राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवून हा विषय संपवला असता तर सरकारला अडचणीत आणणारे अन्य विषय चर्चेला घेता आले असते. पण तुमचा ठराव मागे घ्या नाहीतर आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही असे सांगत राष्ट्रवादीने स्वत:च्या नेत्यालाच छोटे करून टाकले आहे. समोर युद्धाचा प्रसंग असताना तू माझी तलवार घेतलीस, मी तुझी ढाल देणार नाही... म्हणून भांडणं करण्याचा हा प्रकार जेवढा बालिश तेवढाच चिंतेचाही आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व कोणाचे हे स्पष्ट नाही, कोणाकडे पाहून पक्षात काम करावे असा चेहरा नाही. त्यामुळे या पक्षात आपल्याला काही भवितव्य आहे की नाही हा प्रश्न आमदारांना भेडसावत असताना त्यांना विश्वास देण्याचे काम कोणी करताना दिसत नाही.दुसरीकडे, राष्ट्रवादीत पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यभर नियोजनबद्ध रीतीने दौरे सुरूकेले आहेत. त्यांना साथ देण्याचे काम विरोधी पक्ष नेते म्हणून धनंजय मुंडे अत्यंत ताकदीने करत आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी छगन भुजबळ विधानभवनात आले. त्या घटनेने सगळी राष्ट्रवादी एकवटली. त्यांनी जो अनुभव त्यावेळी घेतला आणि त्यांचे चेहरे जे काही सांगत होते ते पाहिल्यानंतर तर हा पक्ष आता पेटून उठेल असे वाटत होते पण तसे काहीही झालेले दिसत नाही. उलट राष्ट्रवादीचे नेते काँग्रेससोबत फुटकळ विषयावर भांडत आहेत. इंदिरा गांधी आज असत्या तर नको तो ठराव असे म्हणाल्या असत्या. शरद पवारही काही वेगळे बोलतील असे नाही, आपल्याच नेत्यांची प्रतिष्ठा आपणच पणाला लावतोय याचेही भान कोणाला उरलेले नाही.भाजपा-शिवसेना सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक विषय असताना त्यांचा जाब काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारला विचारणार आहे की नाही? स्वच्छ भारत मोहिमेचा गाजावाजा झाला, दोन्ही काँग्रेसने यात काही केले नाही पण किती भाजपा आमदार, खासदारांची शहरं स्वच्छ झाली? त्याचे फोटो काढून आणून विधिमंडळात दाखवावे असे विरोधकांना वाटत नाही का? मोदींचा आदेश कचऱ्यात गेला का? असे विचारण्याची हिंमत दोन्ही काँग्रेसमध्ये आहे की नाही? ‘घर तेथे शौचालय’ म्हणून जाहिराती आल्या, पण भाजपा आमदार खासदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात किती शौचालये बांधली हे कोणी विचारणार की नाही? मुंबईत कोणीही उघड्यावर शौचाला बसत नाही म्हणून मुंबई पालिकेचा गौरव झाला तो किती खोटा आहे हे शिवसेनेला दाखवून देण्याची हिंमत भाजपात आहे पण ती दोन्ही काँग्रेसमध्ये उरली आहे का? आदिवासी विभागात चालू असलेल्या बेलगाम खरेदीवर सवाल करण्याएवढा अभ्यास विरोधकांनी केला की नाही? गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ‘मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याप्रमाणे मंजुरी देण्यात येत आहे’ असे फाईलवर लिहितात आणि त्यावर टीका झाली की त्या निर्णयाला स्थगिती दिली जाते, हा विषय विरोधकांना महत्त्वाचा वाटतो की नाही? शेतकऱ्यांची तूरदाळ व्यापाऱ्यांंनी हमीभावापेक्षा कमी दराने विकत घेतली आणि तीच डाळ नाफेड आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरुन पुन्हा हमीभावाने विकून स्वत:चे उखळ पांढरे करुन घेणाऱ्या लॉबीवर विरोधक बोलणार की नाही? विरोधक जिवंत असल्याचे पुरावे आजपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिसतील की नाही याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.