शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

...ते शल्य अडवाणी कधीच सांगणार नाहीत

By गजानन जानभोर | Updated: October 5, 2017 03:24 IST

ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे?

ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे? अशी स्वत:चीच समजूत अडवाणींनी घातली असेल का? भारतीय राजकारणातील एका तपस्वी नेत्याच्या आयुष्याच्या संध्याकाळची ही वेदना...आपल्या घरात कुणी मोठी माणसे आली तर आपण त्यांना बसायला जागा देतो. ते आदरातिथ्य असते. सार्वजनिक ठिकाणी असा मान दिला तर तो संस्काराचा भाग ठरतो. आजची मुले विनम्र नाहीत, अशी चर्चा एरवी घराघरांत सुरू असते. आपले सार्वजनिक जीवन संस्कारशून्य होत असल्याचे ते निदर्शक आहे.

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना परवा नागपुरात येताना विमानात आलेला अनुभव असाच दु:खद आणि वेदना देणारा आहे. म्हटले तर ही घटना तशी साधी. त्यात फार काय, असेही म्हणता येईल. पण, ज्येष्ठांचा मानसन्मान जेव्हा समाजाच्या चिंतेचा विषय ठरतो तेव्हा या घटनेची नोंद घेणे गरजेचे वाटते. दिल्लीहून नागपूरला येताना अडवाणी दुसºया रांगेत बसले होते. आयुष्यभर देशाची सेवा केलेला एक ज्येष्ठ नेता या ठिकाणी बसलेला पाहून काही संवेदनशील प्रवाशांना वाईट वाटले. त्यांनी पहिल्या रांगेतील एका तरुणाला अडवाणींना त्याच्या जागेवर बसू देण्याची विनंती केली. तो प्रवासी तरुण आनंदाने उठेल आणि अडवाणींना जागा देईल, असे त्यांना वाटले. पण, तो उठला नाही. ‘ही जागा मला मिळाली आहे, त्यामुळे दुस-याला बसू देण्याचा प्रश्नच नाही’, असे म्हणत त्याने तुच्छपणे नकार दिला. त्या तरुणाने अडवाणींना जागा दिलीच पाहिजे असा काही कायदा नाही. पण, ज्येष्ठांचा आपण सन्मान राखला पाहिजे ही आपल्या संस्काराची पहिली शिकवण असते. अडवाणी कोण आहेत हे आपण क्षणभर विसरून जाऊ. पण, आपल्या आजोबाच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकाचा असा अनादर करणे ही गोष्ट कोणत्या संस्कारात बसते?

अडवाणींऐवजी कुण्या सामान्य मंत्र्याच्याबाबतीत असे घडले असते तर त्या तरुणाच्या स्वातंत्र्याचे व ठामपणाचे स्वागतच केले असते. पण, वय, देशसेवा, तपस्या यातून जी माणसे श्रद्धेय ठरतात, त्यांच्या बाबतीत अशी विनम्रता दाखवणे ही कायद्याची मागणी नाही तर आपण संस्कारशील असण्याचे ते द्योतक ठरते. विनयशीलता हा मनुष्य धर्माचा भाग आहे. अशावेळी त्या तरुणाला असे का सुचले नाही? दोष केवळ त्या एकट्या तरुणाला देणेही योग्य नाही. विमानातील पहिल्या रांगेत इतरही प्रवासी होते. अडवाणींचा मोठेपणा न उमगण्याइतपत तेसुद्धा एवढ्या खुज्या मनाचे होते?

अडवाणी आज ९० वर्षांचे आहेत. या वयाची माणसे हळवी असतात, आपल्या आत्मसन्मानाबाबत संवेदनशील असतात. आपल्या घरातील वृद्ध आई-वडील एखाद्या कारणामुळे अस्वस्थ झाल्यानंतरची त्यांची अवस्था अशावेळी आपण अडवाणींना डोळयासमोर ठेवून समजून घेतली पाहिजे. या दु:खद प्रसंगाबद्दल अडवाणी कधीच बोलणार नाहीत. पण, त्यांच्या मनात हे शल्य अखेरच्या श्वासापर्यंत राहील. माणसाचे आयुष्य स्मरण-विस्मरणाच्या हिंदोळयावर असते तेव्हा अशा जखमा त्याच्या मनात खोलवर रुतून बसतात. ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे? अशी स्वत:चीच समजूत अडवाणींनी घातली असेल का? भारतीय राजकारणातील एका तपस्वी नेत्याच्या आयुष्याच्या संध्याकाळची ही वेदना आपल्या साºयांच्याच संस्कारातील डागाळलेपण सांगणारी आहे.

(gajanan.janbhor@lokmat.com)

टॅग्स :BJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी