शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...ते शल्य अडवाणी कधीच सांगणार नाहीत

By गजानन जानभोर | Updated: October 5, 2017 03:24 IST

ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे?

ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे? अशी स्वत:चीच समजूत अडवाणींनी घातली असेल का? भारतीय राजकारणातील एका तपस्वी नेत्याच्या आयुष्याच्या संध्याकाळची ही वेदना...आपल्या घरात कुणी मोठी माणसे आली तर आपण त्यांना बसायला जागा देतो. ते आदरातिथ्य असते. सार्वजनिक ठिकाणी असा मान दिला तर तो संस्काराचा भाग ठरतो. आजची मुले विनम्र नाहीत, अशी चर्चा एरवी घराघरांत सुरू असते. आपले सार्वजनिक जीवन संस्कारशून्य होत असल्याचे ते निदर्शक आहे.

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना परवा नागपुरात येताना विमानात आलेला अनुभव असाच दु:खद आणि वेदना देणारा आहे. म्हटले तर ही घटना तशी साधी. त्यात फार काय, असेही म्हणता येईल. पण, ज्येष्ठांचा मानसन्मान जेव्हा समाजाच्या चिंतेचा विषय ठरतो तेव्हा या घटनेची नोंद घेणे गरजेचे वाटते. दिल्लीहून नागपूरला येताना अडवाणी दुसºया रांगेत बसले होते. आयुष्यभर देशाची सेवा केलेला एक ज्येष्ठ नेता या ठिकाणी बसलेला पाहून काही संवेदनशील प्रवाशांना वाईट वाटले. त्यांनी पहिल्या रांगेतील एका तरुणाला अडवाणींना त्याच्या जागेवर बसू देण्याची विनंती केली. तो प्रवासी तरुण आनंदाने उठेल आणि अडवाणींना जागा देईल, असे त्यांना वाटले. पण, तो उठला नाही. ‘ही जागा मला मिळाली आहे, त्यामुळे दुस-याला बसू देण्याचा प्रश्नच नाही’, असे म्हणत त्याने तुच्छपणे नकार दिला. त्या तरुणाने अडवाणींना जागा दिलीच पाहिजे असा काही कायदा नाही. पण, ज्येष्ठांचा आपण सन्मान राखला पाहिजे ही आपल्या संस्काराची पहिली शिकवण असते. अडवाणी कोण आहेत हे आपण क्षणभर विसरून जाऊ. पण, आपल्या आजोबाच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकाचा असा अनादर करणे ही गोष्ट कोणत्या संस्कारात बसते?

अडवाणींऐवजी कुण्या सामान्य मंत्र्याच्याबाबतीत असे घडले असते तर त्या तरुणाच्या स्वातंत्र्याचे व ठामपणाचे स्वागतच केले असते. पण, वय, देशसेवा, तपस्या यातून जी माणसे श्रद्धेय ठरतात, त्यांच्या बाबतीत अशी विनम्रता दाखवणे ही कायद्याची मागणी नाही तर आपण संस्कारशील असण्याचे ते द्योतक ठरते. विनयशीलता हा मनुष्य धर्माचा भाग आहे. अशावेळी त्या तरुणाला असे का सुचले नाही? दोष केवळ त्या एकट्या तरुणाला देणेही योग्य नाही. विमानातील पहिल्या रांगेत इतरही प्रवासी होते. अडवाणींचा मोठेपणा न उमगण्याइतपत तेसुद्धा एवढ्या खुज्या मनाचे होते?

अडवाणी आज ९० वर्षांचे आहेत. या वयाची माणसे हळवी असतात, आपल्या आत्मसन्मानाबाबत संवेदनशील असतात. आपल्या घरातील वृद्ध आई-वडील एखाद्या कारणामुळे अस्वस्थ झाल्यानंतरची त्यांची अवस्था अशावेळी आपण अडवाणींना डोळयासमोर ठेवून समजून घेतली पाहिजे. या दु:खद प्रसंगाबद्दल अडवाणी कधीच बोलणार नाहीत. पण, त्यांच्या मनात हे शल्य अखेरच्या श्वासापर्यंत राहील. माणसाचे आयुष्य स्मरण-विस्मरणाच्या हिंदोळयावर असते तेव्हा अशा जखमा त्याच्या मनात खोलवर रुतून बसतात. ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे? अशी स्वत:चीच समजूत अडवाणींनी घातली असेल का? भारतीय राजकारणातील एका तपस्वी नेत्याच्या आयुष्याच्या संध्याकाळची ही वेदना आपल्या साºयांच्याच संस्कारातील डागाळलेपण सांगणारी आहे.

(gajanan.janbhor@lokmat.com)

टॅग्स :BJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी