शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ पोलिसांचे नव्हे गुन्ह्याचे भय वाटते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:13 IST

एरवी सराईत गुन्हेगार म्हटला की त्याचे हात कायम एखादा गुन्हा करण्यास वळवळत असतात. काही दिवस जरी त्याच्या हातून गुन्हा घडला नाही की त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटते

एरवी सराईत गुन्हेगार म्हटला की त्याचे हात कायम एखादा गुन्हा करण्यास वळवळत असतात. काही दिवस जरी त्याच्या हातून गुन्हा घडला नाही की त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटते. पण उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांची मात्र सध्या याच्या अगदी विपरीत परिस्थिती आहे. परवा तर येथील लूटमारीच्या आरोपातील दोन गुन्हेगार चक्क हातात एक फलक घेऊन फिरताना दिसते. त्यावर लिहिले होते, ‘भविष्यात मी कुठलाही अपराध करणार नाही. मेहनत मजुरी करून आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करेन.’ गेल्या आठवड्यात एक अट्टल चोर पोलीस चौकीत पोहोचला अन् ‘साहेब, माझ्यावर १५ हजारांचेच बक्षीस आहे मला अटक करवून घ्या’ अशी विनवणी करू लागला. यापैकी काहींनी गावकºयांसह ठाण्यात येऊन कानाला खडा लावत यापुढे गुन्हेगारी बंद अशी ग्वाही दिली. हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न पडणारच. विशेष म्हणजे असे शेकडो फरार आणि बक्षीस जाहीर असलेले गुन्हेगार ‘पाऊले चालती पोलीस ठाण्याची वाट...’ असे गात स्वत: पोलीस ठाण्यांमध्ये चालत येऊ लागले आहेत. खून, दरोडे, लूटमार करण्यातच कर्तृत्व मानणाºया या गुंडांचा अचानक असा वाल्याचा वाल्मिकी कसा व्हावा? हा योगींचा प्रभाव म्हणायचा की एन्काऊंटरचे भय? माहिती अशी आहे की गेल्या ५-६ महिन्यात या राज्यातील १४२ गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले. २६ गुंड जामीन मिळाल्यावरही कारागृहातच थांबले. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे ७१ गुन्हेगारांनी जामिनासाठीचा बॉण्ड रद्द करून पुन्हा जेलमध्ये परतण्यातच आपली खैर मानली. या सर्वांच्या मनात एकच दहशत आहे, एन्काऊंटरमध्ये मारले जाण्याची. उत्तर प्रदेशात १९ मार्च २०१७ रोजी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून मागील नऊ महिन्यात १,२४० चकमकी घडल्या आणि त्यात ४० गुन्हेगार ठार तर ३०५ जखमी झाले. या धरपकड मोहिमेत गुन्हेगारांची १४७ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली.राज्याच्या पोलीस विभागाने यासंदर्भातील अहवाल नुकताच जारी केला आहे. गुन्हेगारांचे आत्मसमर्पण जगजाहीर करण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातोय. योगी सरकार या मोहिमेद्वारे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरले असले तरी एन्काऊंटरच्या विक्रमामुळे मात्र वादाच्या भोवºयात अडकले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या चकमकी बनावट असल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रकरण राष्टÑीय मानवाधिकार आयोगाकडे गेले आहे. पण योगी मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसतात. बंदुकीची भाषा समजणाºयांना बंदुकीनेच उत्तर दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे मोठ्या गुन्हेगारांना कायद्याचे दळण दळत न बसता यमसदनी धाडणेच योग्य असल्याचे काही लोकांनाही आता वाटू लागले आहे. परिणामी ‘कठोर प्रशासक’ अशी आपली प्रतिमा बनविण्यास इच्छुक अनेक नेते या चकमकींची वकिली करताना दिसतात. ही परिस्थिती चिंताजनक आहे. या चकमकी खरंच बनावट असतील तर एकाअर्थी कायद्याचे शासन अमान्य करण्याचा हा प्रकार आहे. गुन्हेगारांवर वचक असलाच पाहिजे पण कायद्याचा. गुन्हेगारी ही प्रवृत्ती आहे. केवळ काही गुन्हेगारांना संपवून ती नियंत्रणात येणार नाही. त्याऐवजी लोकांच्या मनात कायद्याचा वचक कसा निर्माण होईल यादृष्टीने प्रयत्न होणे अधिक चांगले.- सविता देव हरकरे