शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

‘त्यांना’ पोलिसांचे नव्हे गुन्ह्याचे भय वाटते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:13 IST

एरवी सराईत गुन्हेगार म्हटला की त्याचे हात कायम एखादा गुन्हा करण्यास वळवळत असतात. काही दिवस जरी त्याच्या हातून गुन्हा घडला नाही की त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटते

एरवी सराईत गुन्हेगार म्हटला की त्याचे हात कायम एखादा गुन्हा करण्यास वळवळत असतात. काही दिवस जरी त्याच्या हातून गुन्हा घडला नाही की त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटते. पण उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांची मात्र सध्या याच्या अगदी विपरीत परिस्थिती आहे. परवा तर येथील लूटमारीच्या आरोपातील दोन गुन्हेगार चक्क हातात एक फलक घेऊन फिरताना दिसते. त्यावर लिहिले होते, ‘भविष्यात मी कुठलाही अपराध करणार नाही. मेहनत मजुरी करून आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करेन.’ गेल्या आठवड्यात एक अट्टल चोर पोलीस चौकीत पोहोचला अन् ‘साहेब, माझ्यावर १५ हजारांचेच बक्षीस आहे मला अटक करवून घ्या’ अशी विनवणी करू लागला. यापैकी काहींनी गावकºयांसह ठाण्यात येऊन कानाला खडा लावत यापुढे गुन्हेगारी बंद अशी ग्वाही दिली. हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न पडणारच. विशेष म्हणजे असे शेकडो फरार आणि बक्षीस जाहीर असलेले गुन्हेगार ‘पाऊले चालती पोलीस ठाण्याची वाट...’ असे गात स्वत: पोलीस ठाण्यांमध्ये चालत येऊ लागले आहेत. खून, दरोडे, लूटमार करण्यातच कर्तृत्व मानणाºया या गुंडांचा अचानक असा वाल्याचा वाल्मिकी कसा व्हावा? हा योगींचा प्रभाव म्हणायचा की एन्काऊंटरचे भय? माहिती अशी आहे की गेल्या ५-६ महिन्यात या राज्यातील १४२ गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले. २६ गुंड जामीन मिळाल्यावरही कारागृहातच थांबले. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे ७१ गुन्हेगारांनी जामिनासाठीचा बॉण्ड रद्द करून पुन्हा जेलमध्ये परतण्यातच आपली खैर मानली. या सर्वांच्या मनात एकच दहशत आहे, एन्काऊंटरमध्ये मारले जाण्याची. उत्तर प्रदेशात १९ मार्च २०१७ रोजी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून मागील नऊ महिन्यात १,२४० चकमकी घडल्या आणि त्यात ४० गुन्हेगार ठार तर ३०५ जखमी झाले. या धरपकड मोहिमेत गुन्हेगारांची १४७ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली.राज्याच्या पोलीस विभागाने यासंदर्भातील अहवाल नुकताच जारी केला आहे. गुन्हेगारांचे आत्मसमर्पण जगजाहीर करण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातोय. योगी सरकार या मोहिमेद्वारे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरले असले तरी एन्काऊंटरच्या विक्रमामुळे मात्र वादाच्या भोवºयात अडकले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या चकमकी बनावट असल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रकरण राष्टÑीय मानवाधिकार आयोगाकडे गेले आहे. पण योगी मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसतात. बंदुकीची भाषा समजणाºयांना बंदुकीनेच उत्तर दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे मोठ्या गुन्हेगारांना कायद्याचे दळण दळत न बसता यमसदनी धाडणेच योग्य असल्याचे काही लोकांनाही आता वाटू लागले आहे. परिणामी ‘कठोर प्रशासक’ अशी आपली प्रतिमा बनविण्यास इच्छुक अनेक नेते या चकमकींची वकिली करताना दिसतात. ही परिस्थिती चिंताजनक आहे. या चकमकी खरंच बनावट असतील तर एकाअर्थी कायद्याचे शासन अमान्य करण्याचा हा प्रकार आहे. गुन्हेगारांवर वचक असलाच पाहिजे पण कायद्याचा. गुन्हेगारी ही प्रवृत्ती आहे. केवळ काही गुन्हेगारांना संपवून ती नियंत्रणात येणार नाही. त्याऐवजी लोकांच्या मनात कायद्याचा वचक कसा निर्माण होईल यादृष्टीने प्रयत्न होणे अधिक चांगले.- सविता देव हरकरे