शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ते चोर आणि हे बावळट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:05 IST

आठ लक्ष कोटींचे प्रचंड कर्ज बड्या धनवंतांनी व उद्योगपतींनी बुडविले असताना व ते वसूल होण्याची शक्यता उरली नसताना एकट्या मुंबई शहरातील उद्योगांनी गेल्या तीन वर्षांत (म्हणजे मोदींच्या राजवटीत) देशाला १९ हजार ६७३ कोटी रुपयांनी गंडविले असल्याची व त्यातले बहुतेक गुंतवणूककर्ते सरकारच्या हाती लागत नसल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशिलाने उघड केली आहे.

आठ लक्ष कोटींचे प्रचंड कर्ज बड्या धनवंतांनी व उद्योगपतींनी बुडविले असताना व ते वसूल होण्याची शक्यता उरली नसताना एकट्या मुंबई शहरातील उद्योगांनी गेल्या तीन वर्षांत (म्हणजे मोदींच्या राजवटीत) देशाला १९ हजार ६७३ कोटी रुपयांनी गंडविले असल्याची व त्यातले बहुतेक गुंतवणूककर्ते सरकारच्या हाती लागत नसल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशिलाने उघड केली आहे. बँका बुडवायच्याच असतात, त्यातला पैसा परत करायचाच नसतो आणि बुडविलेल्या पैशाला सरकारचा आशीर्वाद कधी ना कधी मिळतच असतो, असा विश्वास बाळगणारे बदमाश धनवंत देशात सर्वत्र आहेत. त्यांच्या मागे तपासाचा ससेमिरा लावण्याऐवजी आपल्या राजकीय विरोधकांच्या छोट्या मोठ्या व्यवहाराकडे लक्ष देण्याची सध्याच्या सरकारची वृत्ती अशा गुन्हेगारांना संरक्षण देणारी व त्यांचे बळ वाढविणारीही ठरत आहे. २०१५ मध्ये ५५६० कोटी ६६ लाख, २०१६ मध्ये ४२७३ कोटी ८७ लाख तर २०१७ मध्ये ९८३८ कोटी ८६ लाख अशी ही या बड्यांनी केलेली चोरी आहे. बँका त्यांची नावे देशाला सांगत नाहीत आणि सरकारचे भयही त्यांना वाटत नाही. आश्चर्य याचे की या बड्या माणसांनी बँकांना बुडवायचे आणि त्या बुडायला लागल्या की, देशाची अर्थव्यवस्था सावरायला म्हणून सरकारने जनतेचा पैसा त्यांच्या घशात ओतून त्यांना ‘बलशाली’ बनवायचे ही तºहा आता साºयांच्या अंगवळणी पडली आहे. बँका बुडविणारे लोक देश सोडून पसार होतात किंवा देशातच कुण्या मोठ्या राजकीय पुढाºयाच्या मदतीने भूमिगत होतात. देशातील सामान्य व स्वत:ला देशभक्त म्हणविणारी माणसे आपण घाम गाळून मिळविलेला पैसा त्या बुडव्यांची चोरी दडवायला सरकारच्या स्वाधीन करतात. परिणामी बुडविणारे सुरक्षित होतात, सरकारे स्थिर होतात आणि सामान्य माणसे होती तशीच म्हणजे गरीब राहतात. या गरिबीतच देशभक्ती आहे, असे समाधान मानणारे आणि आपल्या पैशाच्या दरोड्यावर बदमाशांना बळ देणारे सरकार स्थिर व सावध असल्याचे वाटून घेणारे लोक खरोखरीच कोण आणि कसे असतात? घरात चोरी झाली की तिचा रिपोर्ट पोलिसात न देता ‘झाले गेले विसरून जा’ या वृत्तीने वागणारे हे लोक स्थितप्रज्ञ नसतात. ते दुबळे आणि बावळटही असतात. आपला पैसा आपल्याला सांगून त्या बुडव्यांची चोरी लपविणारे सरकार या माणसांना काम करणारे व शक्तिशाली असल्याचे वाटत असते. अशा सरकारांची शक्ती चोरांना संरक्षण देण्यात आणि सर्वांची घरे लुबाडण्यातच खर्ची होताना दिसते. ज्या लोकशाहीत लोक असे सरकार व बँकांबाबत अंधश्रद्धा बाळगणारे व निमूटपणे जगणारे असतात ती लोकशाही प्रत्यक्षात लोकशाही नसते. सरकारचे अंधानुकरण करीत भांडवलदारांचे लाड पुरविणारी अर्धवट बुद्धीची समाजव्यवस्था असते. गंमत याची या जनतेचे संसदेतील प्रतिनिधीही तिच्या या लुटीबद्दल सरकारला जाब विचारत नाहीत आणि त्यांनी तो विचारला की नाही याविषयी त्यांचे मतदारही त्यांना रस्त्यात पकडून प्रश्न विचारीत नाहीत. किती माणसे पळाली. मल्ल्या गेला, ललित मोदी पळाला, नीरव मोदी निसटला. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून बँकांसह देशाला बुडविणारे किती गुन्हेगार देशात राजरोसपणे हिंडत आहेत आणि सरकारच्या मांडीला मांडी लावून व्यासपीठावर गर्दी करीत आहेत. विरोधी पक्षातील संशयितांना पकडून देश मजबूत होत नाही. त्यासाठी सर्वच अपराध्यांना, ते स्वपक्षीय असले तरी ताब्यात घ्यावे लागते. त्यांना साथ देणाºया बँकांच्या संचालकांच्या व अधिकाºयांच्याही मुसक्या आवळाव्या लागत असतात. पण सरकार तसे करीत नाही. कारण आपला पैसा देऊन चोरांच्या चोºया दडविणारी प्रजा ज्या देशात असते त्यातील सरकारांना याविषयी सुस्तपणाच नव्हे तर एक निर्ढावलेला बेफिकीरपणा दाखवणे जमत असते. झालेच तर ‘देश श्रीमंत झाल्याचा हाही एक पुरावा आहे’ असे त्याला जगाला सांगता येते.

टॅग्स :bankबँकCorruptionभ्रष्टाचारIndiaभारत