शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

या सरकारांनाच आरोपी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 02:39 IST

शोषणाला संरक्षण देत असल्याची व त्यांना आळा घालण्याच्या प्रयत्नात अडसर उभे करीत असल्याची अतिशय संतापजनक बाब समोर आली आहे.

मुझफ्फरपूर आणि देवरिया येथील मुलींच्या आधार केंद्रात झालेल्या त्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांनी सारा देश हादरला असतानाच देशातील अनेक राज्ये व त्यांची सरकारे अशा शोषणाला संरक्षण देत असल्याची व त्यांना आळा घालण्याच्या प्रयत्नात अडसर उभे करीत असल्याची अतिशय संतापजनक बाब समोर आली आहे. देशातील नऊ हजारांवर आधार केंद्रांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची तपासणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर व त्याविषयीचे रीतसर आदेश महिला व बालकल्याण खात्याने काढल्यानंतर अशी तपासणी करायला आलेल्या पथकांना या केंद्रात प्रवेश करायलाच देशातील नऊ राज्य सरकारांनी परवानगी नाकारली आहे. ती नाकारणाऱ्या राज्यांत दिल्ली, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, केरळ आणि बंगालचा समावेश आहे. या राज्यात बिहारचाही समावेश व्हायचा होता. पण ऐनवेळी केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे त्या राज्याने अशा तपासणी पथकांना त्यांचे काम करण्याची परवानगी दिली आहे. मुळात आधारकेंद्रे गरीब व निराधार मुला-मुलींना आधार व संरक्षण देऊन त्यांच्या वाढीला व विकासाला मदत करायला स्थापन झाली. स्वाभाविकच त्यातील मुले व मुली सर्व अर्थाने सुरक्षित असतील व त्यांचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर होणार नाही अशी निश्चिंततेची भावना समाजात होती. मात्र मुझफ्फरपूर व देवरिया येथील आधारकेंद्रे हीच त्यांच्या लैंगिक शोषणाची केंद्रे बनली असल्याचे बाहेर येताच देशभरातील अशा सर्वच केंद्रांच्या स्वच्छ कारभाराविषयीचा प्रश्न सरकार व समाज यांच्यासमोर उभा राहिला. त्याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने या केंद्रांच्या तपासणीचा आदेश केंद्र सरकारला दिला. आता या तपासाला राज्य सरकारेच परवानगी नाकारताना दिसत असतील तर तीही या लैंगिक शोषणाच्या आरोपान्वये गुन्हेगार ठरणारी आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे हाच मुळात एक अपराध आहे. पोलीस तपासातील अडथळा हा तर मोठाच गुन्हा आहे. केंद्र सरकारची तपासणी पथके ज्या गुन्ह्यांचा तपास करायला निघाली त्यांचे स्वरूप तर आणखी लाजिरवाणे, घृणास्पद व अनैतिक आहे. वास्तव हे की या आधार केंद्रात असणाºया मुलामुलींचे पालन पोषण व संरक्षण यांची जबाबदारी पालक या नात्याने राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी देशातील अनेक राज्यांनी केवढ्या अनास्थेने सांभाळली ते सांगणारे हे विदारक चित्र देश पाहत आहे. अल्पवयीन मुली व मुले नुसती निराधारच नाही तर दुबळी व असुरक्षितही असतात. त्यांच्यावर अत्याचार करणे कोणत्याही गुंडाला वा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जमणारे असते. काही काळापूर्वी निघालेल्या उंबरठा या मराठी चित्रपटात अशा आधार केंद्रातील व सुधारगृहातील मुली काही बड्या माणसांच्या भोगासाठी कशा पुरविल्या जातात याचे कमालीचे विषण्ण करणारे चित्रण समाजाने पाहिले. मात्र ते पाहत असताना हे प्रकार क्वचितच कुठे घडत असतील व त्यांची संख्याही फार मोठी असणार नाही असे वाटले होते. पण आताचे वास्तव आपले तसे वाटणेच निरर्थक स्वरूपाचे आहे हे सांगणारे आहे. साºया देशात अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण होते व ते अशा आधार केंद्रांनाही थांबविता येत नाही असे सांगणारे हे चित्र आहे. लैंगिक अत्याचाराचे बळी कुटुंबातही असतात. त्यात लहान मुला-मुलींची संख्याही लक्षणीय असते. तशा बाहेर आलेल्या घटनांच्या बातम्या वृत्तपत्रातही येतात. पण ‘घरातील,’ म्हणून ही प्रकरणे दबतात वा दाबली जातात. आजचा प्रकार मात्र या अपराधांना असलेला राष्टÑीय आयाम सांगणारा व त्याचे विक्राळ रूप उघड करणारा आहे. राज्य सरकारेच त्या प्रकाराला संरक्षण देत असतील आणि त्यासाठी केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालय यांचे आदेश ऐकायला नकार देत असतील तर त्या सरकारांना व त्यांच्या संबंधित अधिकाºयांना न्यायासनासमोर उभे करणे व त्यांना अतिशय कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे. ज्या देशातील मुला-मुलींना सरकार वा समाज संरक्षण देऊ शकत नाही, त्याच्या भविष्याचे रक्षण फक्त नियतीच्याच हाती राहते हे दुर्दैव साºयांनी लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :Molestationविनयभंग