शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 05:56 IST

अगदी अलीकडे भारतात घडलेल्या अनेक घटना पाहता, भारतात आजही मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचे हनन होत आहे, असे दिसते.

- डॉ. रविनंद नामदेव होवाळवर्षी १० डिसेंबर रोजी जग ७१वा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा करत आहे. अगदी अलीकडे भारतात घडलेल्या अनेक घटना पाहता, भारतात आजही मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचे हनन होत आहे, असे दिसते. या पार्श्वभूमीवर भारतातील मानवाधिकारांचे हनन आणि मानवाधिकारांचे संरक्षण या दोन्ही विषयांची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली जाण्याची गरज आहे.१० डिसेंबर, १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ‘युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राइट’ अर्थात, ‘मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा’ प्रसिद्ध केला होता. १९४९ साली भारताने स्वीकारलेल्या भारतीय संविधानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या भागात यातील बहुतांश अधिकारांना भारतात कायदेशीरपणे लागू केले गेले. २८ सप्टेंबर, १९९३ पासून ‘मानवाधिकार (संरक्षण) अधिनियम, १९९३’ हा नवा कायदा लागू करण्यात आला. स्वातंत्र्य, समानता, कायद्याचे समान संरक्षण, शोषणापासून मुक्तता आदी आश्वासने या कायद्याने मिळाली, परंतु प्रत्यक्षात आजही भारतातील मानवाधिकारांबाबतची परिस्थिती दयनीय म्हणावी, अशीच आहे.या आठवड्यात, म्हणजे डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात ३ डिसेंबर, २०१८ रोजी उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरजवळ गोहत्येच्या आरोपावरून एका गटाने एका पोलीस अधिकाºयासह आणखी एकाची हत्या केली. गटासोबत झालेल्या संघर्षात या पोलीस अधिकाºयाच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर ‘आता भारतातले पोलीससुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत,’ अशी टिप्पणी प्रसारमाध्यमांनी केली आहे. या टिप्पणीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली आहे. सध्याची एकंदर परिस्थिती काय आहे, याचा यावरून आपल्याला अंदाज येतो. मानवाधिकारांच्या संदर्भात एकीकडे एक माणूस म्हणून पोलीस आणि इतर सुरक्षाकर्मींच्या मानवाधिकार-रक्षणाचा प्रश्न, दुसरीकडे काही सुरक्षाकर्मींनीच धोक्यात आणलेल्या सामान्य माणसांच्या मानवाधिकारांचा प्रश्न, तर तिसरीकडे सामान्य माणसांनी धोक्यात आणलेल्या सामान्य माणसांच्या मानवाधिकारांचा प्रश्न, अशा तिहेरी संकटात भारतीय समाज सध्या सापडलेला दिसत आहे.छत्तीसगडमधल्या बिलासपूर येथे दि. १४ आॅक्टोबर २०१८ रोजी एक साठ वर्षांची महिला आणि तिच्या सत्तावीस वर्षांच्या मुलीला एका महिला पोलीस अधिकाºयाने इतर पोलीस अधिकाºयांसमोर विवस्त्र करून जबर मारहाण केली. हे प्रकरण धक्कादायक तर आहेच, पण एक महिलाच अशा तºहेचे कृत्य करते व पुरुष अधिकारीही त्यास मौन संमती देतात, तेव्हा त्या प्रसंगांतील विदारकता सहनशक्तीच्या पलीकडे जाते. ९ आॅक्टोबर, २०१८ रोजी छत्तीसगडमधल्याच भिलाई स्टील प्लँटमध्ये गॅस पाइपलाइनचा स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले. रेल्वे येण्याच्या सुमारास रेल्वे क्रॉसिंगवरील बंद केलेले गेट उघडले नाही, म्हणून एका रेल्वे कर्मचाºयाचा हात तीन जणांनी मिळून तीक्ष्ण हत्यारांनी तोडल्याची घटना हरयाणातील सोनपतमध्ये १७ सप्टेंबर, २०१८ रोजी घडली. ही केवळ काही उदाहरणे आहेत.अलीकडेच भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातल्या कारागृहांतील मृत्यू किंवा कैद्यांचा छळ, एन्काउन्टर्स, सुरक्षाकर्मीकडून झालेली मानवाधिकार-उल्लंघने, अनुसूचित जाती-जमाती, स्त्रिया व मुलांवर झालेले अत्याचार, वांशिक दंगली, वेठबिगारी, शासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे झालेले मानवाधिकारांचे उल्लंघन, कर्मचाºयांच्या निवृत्तीनंतरचे प्रश्न, अशा विषयांच्या तक्रारी मानवाधिकार आयोगाकडे मोठ्या प्रमाणात येत असतात. वर्ष २०१३-१४ मध्ये मानवाधिकारांचे हनन झाल्याच्या तब्बल ९८,१३६ केसेस आयोगाकडे दाखल झाल्या होत्या. वर्ष २०१४-१५ मध्ये १,१४,१६७ केसेस दाखल झाल्या, तर वर्ष २०१५-१६ मध्ये हा आकडा १,१७,८०८ पर्यंत पोहोचला होता. मागील प्रलंबित केसेस धरून एकूण १,१८,२५४ केसेसचा त्या वर्षी आयोगाने निपटारा केला, असे आयोगाने जाहीर केले आहे. वर्ष संपताना म्हणजे, ३१ मार्च, २०१६ रोजी मानवाधिकार आयोगाकडे ४०,७६६ केसेस प्रलंबित होत्या, असे समजते. २०१५-१६ नंतरच्या दोन वार्षिक अहवालांशी संबंधित आकडेवारी हा लेख लिहिताना उपलब्ध झाली नाही.वर्ष २०१५-१६ मध्ये अशा प्रकारच्या एकंदर ३३२ केसेसमधील अत्याचारग्रस्तांना सहा कोटी पाच लक्ष साठ हजार रुपयांची मदत देण्याची शिफारस मानवाधिकार आयोगाने केली होती, पण प्रत्यक्षात केवळ ३३ केसेसमधील अत्याचारग्रस्तांनाच पन्नास लाख पंचावन्न हजार रुपयांची भरपाई दिल्याचा अहवाल आयोगाला प्राप्त झाला. एकूण भारतीय लोकसंख्येतील साधारणत: आठ ते नऊ टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. हे पाहता, महाराष्ट्रातील मानवाधिकार कायद्याची अंमलबजावणी समाधानकारक दिसते. तथापि, एकाही निरपराधाच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही, या दृष्टीनेच आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.(लेखक संविधान जनजागृती अभियानाचे प्रवर्तक आहेत.)