शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असून-नसून सारखे

By गजानन दिवाण | Updated: August 13, 2018 23:13 IST

अनेक वर्षांनंतर जायकवाडी धरण भरले. आता ते २९ टक्क्यांवर आले आहे. शंभर टक्क्यांचा आनंद मानायचा की २९ टक्क्यांचे दु:ख? कारण हे धरण भरले काय नि मृतसाठ्यात गेले काय, औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही.

जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पाऊस न झाल्याने पाण्याची आवक बंद झाली. वरून पाणीच येत नसल्याने गेल्या पंधरवड्यात जायकवाडी धरणातील साठा तब्बल तीन टक्क्यांनी घटला. पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिलाच महिना जून पाणलोट क्षेत्रात पूर्णत: कोरडा गेला. जुलै महिन्यातही पंधरा दिवस पाऊस झालाच नाही.

औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील सुमारे एक लाख ८० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र जायकवाडी प्रकल्पामुळे ओलिताखाली आले आहे. शिवाय औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड, मानवतसह सुमारे २५० गावांची तहान याच धरणाच्या पाण्यावर भागते आहे. या पावसाळ्यात मराठवाड्यात पाऊस झाला नाही आणि पाणलोट क्षेत्रातही तो बरसला नाही. त्यामुळे या प्रकल्पात पाणी आलेच नाही. दुसरीकडे पिण्यासाठी या प्रकल्पातील पाण्याचा उपसा सुरूच होता. त्यामुळे या धरणातील पाण्याचा साठा १९ टक्क्यांवर गेला होता. सुदैवाने काही दिवसांपूर्वी नाशकात पाऊस झाला.

गोदावरीला पूर आल्याने जुलैच्या तिसऱ्या आठवाड्यात जायकवाडीत पाणी आले. त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा १९ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांवर पोहोचला. आता पुन्हा नाशिक जिल्ह्यात पाऊस बंद झाल्याने पाणी येणे बंद झाले आहे. परिणामी, पाणीपातळी पुन्हा तीन टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी हे धरण १०० टक्के भरले होते. अनेक वर्षांनंतर ते भरले. आता ते २९ टक्क्यांवर आले आहे.

शंभर टक्क्यांचा आनंद मानायचा की २९ टक्क्यांचे दु:ख? कारण हे धरण भरले काय नि मृतसाठ्यात गेले काय, औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. धरण मृतसाठ्यात असतानाही होत नव्हते इतके हाल गेल्या काही वर्षांत औरंगाबादकरांचे होताना दिसत आहेत. औरंगाबादसह सर्वच शहरांची लोकसंख्या वाढली. त्यामुळे या प्रकल्पावरील भारही वाढला, हे खरे असले तरी नियोजन नाही, हीच मोठी अडचण आहे.

पाण्याची गळती थांबविण्यासाठी मनपाकडे कुठलीच योजना नाही. त्यामुळे पाणी असूनही औरंगाबादकरांची तहान भागत नाही. यावर उपाय म्हणून ‘समांतर’ योजना पुढे आली. या योजनेचे गुºहाळ संपता संपत नाही. येत्या वर्षभरात समांतर योजनेतून औरंगाबादकरांना पाणी दिले जाईल, असे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी म्हटले असले तरी मागचा अनुभव पाहता ते प्रत्यक्षात घडेल असे वाटत नाही.

१५ लाख लोकसंख्येच्या या शहराला दररोज पाणी मिळावे. यासाठी जायकवाडीतून चांगली यंत्रणा उभारून पुरेसे पाणी शहरात आणावे, अशी मानसिकताच या पालिकेची आणि राजकारण्यांची दिसत नाही. समांतर जलवाहिनीची मूळ योजना ७७२ कोटींची. आता या योजनेसाठी ९६६ रुपये खर्च येणार आहे. याचा अर्थ २९८ कोटींचा वाढीव बोजा औरंगाबादकरांवर लादण्यात येणार आहे. आता चार हजार रुपये द्यावी लागणारी पाणीपट्टी या योजनेनंतर किमान दहा हजारांवर जाणार आहे. याचा जाब विचारायचा कोणी आणि कोणाला?

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणwater shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडा