शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

Gujarat Assembly elections: गुजरातमध्ये भाजप नाही, ‘आप’च सत्तेवर येणार! CM पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 09:34 IST

गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निवडणूक रणनीतीविषयी इसुदान गढवी यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचित.

पत्रकारिता सोडून आपण राजकारणात कसे आणि का आलात?मी मुळात शेतकरी कुटुंबातला, देवी मातेला वाटले म्हणून पत्रकार झालो. जे वाईट आहे ते मी लोकांसमोर आणत होतो, पण गरजूंना मदत करू शकत नव्हतो. म्हणून देवी मातेच्या प्रेरणेनेच मी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.आम आदमी पक्षच का? काँग्रेस किंवा भाजप का नाही?या दोन पक्षांमुळेच तर गुजरातची आजची हलाखीची परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनामुळे लोक मरत असताना लक्ष देणारे कोणी नव्हते. संपूर्ण देशात जे गुजरात मॉडेल विकले जात आहे, त्याचे वास्तव गुजराती लोकांना ठाऊक आहे. बेरोजगारी वाढत आहे. काँग्रेसने तर भाजपपुढे गुडघेच टेकले आहेत. हळूहळू आम आदमी पक्षच देशातला मुख्य विरोधी पक्ष होत चालला आहे.

आपल्या पक्षाचे गुजरातमध्ये काय भविष्य दिसते? मागच्या निवडणुकीनंतर भाजप मोठ्या मुश्किलीने सरकार स्थापन करू शकले. काँग्रेसची इच्छा असती तर मागच्या वेळीच सरकार स्थापन झाले असते. पण आता काँग्रेस पक्ष इतका कमजोर झाला आहे की गेल्या वर्षी जिल्हा पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत ३१ पैकी एकही जागा या पक्षाला मिळविता आली नाही. आता हे दोन्ही पक्ष लोकप्रियतेपासून खूप लांब गेले असल्याने लोक आम आदमी पक्षाकडे आशेने पाहत आहेत. 

निवडणूक सर्वेक्षणांचे निकाल तसे सांगत नाहीत..मी स्वतः माध्यमांमध्ये होतो.. सर्वेक्षणे कशी केली जातात हे मला ठाऊक आहे. गुजरातच्या शहरी भागातील ६६ जागांपैकी किमान अर्ध्या जागांवर भाजप अडचणीत आहे. आम्हाला फक्त सुरतमधल्याच आठ किंवा नऊ जागा मिळतील. ग्रामीण भागातल्या २५ ते ३०  जागांवर भाजपला अतिशय कठीण लढत द्यावी लागत आहे. आत्ता लोक भाजपच्या भीतीने गप्प आहेत, पण मतदान करताना ते नक्कीच घाबरणार नाहीत.

आपले मुद्दे काय आहेत?  ‘महामंथन’ या नावाने चालणारा माझा एक तासाचा कार्यक्रम टीव्हीवर फार प्रसिद्ध होता. त्यात प्रत्येक गावातले प्रश्न मी मांडलेले आहेत. लोकांच्या प्रश्नांचे मला जेवढे आकलन आहे तेवढे गुजरातेत कोणाला असेल असे मला वाटत नाही. राज्यात ५० लाख बेकार युवक आहेत. ६७ लाख शेतकरी आहेत. सगळे हैराण आहेत. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे इथेही आम्हाला लोकांना मोफत वीज आणि पाणी द्यायचे आहे. राजकारणात आपल्याला अनुभव नाही, त्याचे काय?मी सोळा वर्षे राजकीय पत्रकारिता केली. अनेक राजकीय पक्ष धोरण ठरवण्यासाठी माझ्या संपर्कात असत. कोणते मुद्दे उपस्थित करावेत, निवडणूक कशी जिंकावी आणि सरकार कसे चालविले पाहिजे हे सगळे मी सांगत असे. तेव्हा या सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव माझ्याकडेच आहे.

गुजरातमध्ये यावेळी भाजप नव्हे तर मोदीजी निवडणूक लढत आहेत. आपण त्यांचा सामना कसा करणार?उलटे आहे, यावेळी मोदीजी नव्हे भाजप निवडणूक लढवत आहे. हळूहळू भाजपला हे समजून चुकले आहे की आपल्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. भ्रष्टाचार प्रशासनामध्ये खोलवर रुजला आहे. विषारी दारूने ७५ लोकांचा जीव जातो. कोणालाही शिक्षा होत नाही. पूल तुटून कित्येक लोक मरण पावतात, पण कोणालाही दोषी ठरवले जात नाही. जनता खूप शहाणी असते. गुजरातमध्ये लोकसभेसाठी मोदींना मते पडतील आणि विधानसभेसाठी ‘आप’ला !मागच्या निवडणुकीत अल्पेश ठाकूर,  हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण नेते काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपत आहेत. काँग्रेस भाजपची बी टीम झाली आहे, हेच तर मी म्हणतोय.­ मागच्या आठ वर्षांत काँग्रेसचे ६५ मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले. मागच्या पाच वर्षांत काँग्रेसचे १५ आमदार भाजपत गेले. आज काँग्रेसजवळ नेता नाही. कार्यकर्ते नाहीत आणि मुद्देही नाहीत. जर भाजप इतका बळकट आहे, तर पाच वर्षांत त्यांना तीन मुख्यमंत्री का बदलावे लागले? आपल्या एका उमेदवाराने अर्ज मागे का घेतला? दुसऱ्या पक्षाच्या लोकांना धमक्या देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावणे हे भाजपनेच केले आहे.. एका जागेवर त्यांनी केले; परंतु उरलेल्या १८१ जागांवर काय करणार?

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Aam Admi partyआम आदमी पार्टीElectionनिवडणूक