शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Gujarat Assembly elections: गुजरातमध्ये भाजप नाही, ‘आप’च सत्तेवर येणार! CM पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 09:34 IST

गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निवडणूक रणनीतीविषयी इसुदान गढवी यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचित.

पत्रकारिता सोडून आपण राजकारणात कसे आणि का आलात?मी मुळात शेतकरी कुटुंबातला, देवी मातेला वाटले म्हणून पत्रकार झालो. जे वाईट आहे ते मी लोकांसमोर आणत होतो, पण गरजूंना मदत करू शकत नव्हतो. म्हणून देवी मातेच्या प्रेरणेनेच मी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.आम आदमी पक्षच का? काँग्रेस किंवा भाजप का नाही?या दोन पक्षांमुळेच तर गुजरातची आजची हलाखीची परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनामुळे लोक मरत असताना लक्ष देणारे कोणी नव्हते. संपूर्ण देशात जे गुजरात मॉडेल विकले जात आहे, त्याचे वास्तव गुजराती लोकांना ठाऊक आहे. बेरोजगारी वाढत आहे. काँग्रेसने तर भाजपपुढे गुडघेच टेकले आहेत. हळूहळू आम आदमी पक्षच देशातला मुख्य विरोधी पक्ष होत चालला आहे.

आपल्या पक्षाचे गुजरातमध्ये काय भविष्य दिसते? मागच्या निवडणुकीनंतर भाजप मोठ्या मुश्किलीने सरकार स्थापन करू शकले. काँग्रेसची इच्छा असती तर मागच्या वेळीच सरकार स्थापन झाले असते. पण आता काँग्रेस पक्ष इतका कमजोर झाला आहे की गेल्या वर्षी जिल्हा पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत ३१ पैकी एकही जागा या पक्षाला मिळविता आली नाही. आता हे दोन्ही पक्ष लोकप्रियतेपासून खूप लांब गेले असल्याने लोक आम आदमी पक्षाकडे आशेने पाहत आहेत. 

निवडणूक सर्वेक्षणांचे निकाल तसे सांगत नाहीत..मी स्वतः माध्यमांमध्ये होतो.. सर्वेक्षणे कशी केली जातात हे मला ठाऊक आहे. गुजरातच्या शहरी भागातील ६६ जागांपैकी किमान अर्ध्या जागांवर भाजप अडचणीत आहे. आम्हाला फक्त सुरतमधल्याच आठ किंवा नऊ जागा मिळतील. ग्रामीण भागातल्या २५ ते ३०  जागांवर भाजपला अतिशय कठीण लढत द्यावी लागत आहे. आत्ता लोक भाजपच्या भीतीने गप्प आहेत, पण मतदान करताना ते नक्कीच घाबरणार नाहीत.

आपले मुद्दे काय आहेत?  ‘महामंथन’ या नावाने चालणारा माझा एक तासाचा कार्यक्रम टीव्हीवर फार प्रसिद्ध होता. त्यात प्रत्येक गावातले प्रश्न मी मांडलेले आहेत. लोकांच्या प्रश्नांचे मला जेवढे आकलन आहे तेवढे गुजरातेत कोणाला असेल असे मला वाटत नाही. राज्यात ५० लाख बेकार युवक आहेत. ६७ लाख शेतकरी आहेत. सगळे हैराण आहेत. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे इथेही आम्हाला लोकांना मोफत वीज आणि पाणी द्यायचे आहे. राजकारणात आपल्याला अनुभव नाही, त्याचे काय?मी सोळा वर्षे राजकीय पत्रकारिता केली. अनेक राजकीय पक्ष धोरण ठरवण्यासाठी माझ्या संपर्कात असत. कोणते मुद्दे उपस्थित करावेत, निवडणूक कशी जिंकावी आणि सरकार कसे चालविले पाहिजे हे सगळे मी सांगत असे. तेव्हा या सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव माझ्याकडेच आहे.

गुजरातमध्ये यावेळी भाजप नव्हे तर मोदीजी निवडणूक लढत आहेत. आपण त्यांचा सामना कसा करणार?उलटे आहे, यावेळी मोदीजी नव्हे भाजप निवडणूक लढवत आहे. हळूहळू भाजपला हे समजून चुकले आहे की आपल्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. भ्रष्टाचार प्रशासनामध्ये खोलवर रुजला आहे. विषारी दारूने ७५ लोकांचा जीव जातो. कोणालाही शिक्षा होत नाही. पूल तुटून कित्येक लोक मरण पावतात, पण कोणालाही दोषी ठरवले जात नाही. जनता खूप शहाणी असते. गुजरातमध्ये लोकसभेसाठी मोदींना मते पडतील आणि विधानसभेसाठी ‘आप’ला !मागच्या निवडणुकीत अल्पेश ठाकूर,  हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण नेते काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपत आहेत. काँग्रेस भाजपची बी टीम झाली आहे, हेच तर मी म्हणतोय.­ मागच्या आठ वर्षांत काँग्रेसचे ६५ मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले. मागच्या पाच वर्षांत काँग्रेसचे १५ आमदार भाजपत गेले. आज काँग्रेसजवळ नेता नाही. कार्यकर्ते नाहीत आणि मुद्देही नाहीत. जर भाजप इतका बळकट आहे, तर पाच वर्षांत त्यांना तीन मुख्यमंत्री का बदलावे लागले? आपल्या एका उमेदवाराने अर्ज मागे का घेतला? दुसऱ्या पक्षाच्या लोकांना धमक्या देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावणे हे भाजपनेच केले आहे.. एका जागेवर त्यांनी केले; परंतु उरलेल्या १८१ जागांवर काय करणार?

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Aam Admi partyआम आदमी पार्टीElectionनिवडणूक