शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

आडात आहे, पण पोहरा रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 11:23 IST

मिलिंद कुलकर्णी  माणूस निसर्गावर सातत्याने अत्याचार करीत असला तरी निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. त्याचा प्रत्यय यंदाही आला. सप्टेबरमध्येच ...

मिलिंद कुलकर्णी माणूस निसर्गावर सातत्याने अत्याचार करीत असला तरी निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. त्याचा प्रत्यय यंदाही आला. सप्टेबरमध्येच पावसाने वार्षिक सरासरी गाठली. बहुसंख्य धरणे तुडुंब भरली. अतिवृष्टीने झालेले उडीद, मूग आणि काही प्रमाणात कापसाचे नुकसान वेदनादायक आहे. मात्र रब्बी हंगाम चांगला जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. माणसाचा करंटेपणा पुन्हा ठळकपणे समोर आला, धरणे तुडुंब आहे, पण आमची नियोजनशून्यता, दूरदर्शीपणाचा अभाव, भ्रष्टाचाराची कीड यामुळे धरणे उशाला असून घसा कोरडा आहे. आडात आहे, पण पोहरा कोरडा राहिला आहे. शेती आणि नळपाणी योजनांना धरणातील पाणी पुरविण्यामध्ये जलसंपदा विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठे अपयश आले आहे. निसर्ग देतोय, पण आमची झोळी तोकडी आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.  विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे पर्जन्यमानाची अचूक नोंद आणि माहिती मिळत आहे. पावसाचे अंदाज देखील बहुतांश खरे ठरले. वादळ, अतिवृष्टीची शक्यता वास्तवात उतरली. बिहार, आसाम आणि महाराष्टÑातील पूर्व विदर्भात महापुराने थैमान घातले. जीवित व वित्त हानी झाली. कोरोनाच्या संकटात पूरग्रस्तांचे दु:ख देशवासीयांना फारसे कळले नाही. मदतीचे हात तिथपर्यंत पोहोचले नाही. गेल्यावर्षी पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुराने हाहाकार उडविला होता. आपत्ती व्यवस्थापन, नदी जोड असे विषय अशा प्रसंगात पुन्हा ऐरणीवर येतात. चर्चा होते, मात्र कार्यवाही होत नाही, हे मोठे दुखणे आहे. पर्जन्यमानाचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात भडगाव (९४ टक्के) वगळता सर्व १४ तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाची तुलना केली तर अमळनेर, चोपडा, पारोळा व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये अधिक पाऊस झाला आहे. तर जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव व बोदवड तालुक्यात गेल्या वर्षापेक्षा थोडा कमी पाऊस नोंदविला गेला आहे. अर्थात अर्धा सप्टेबर महिना बाकी असून परतीचा पाऊस चांगला होतो, असा अनुभव आहे. खान्देशातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा विचार केला तर १६ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, तर १५ प्रकल्प ८० टक्कयाहून अधिक भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरण १०० टक्के भरले आहे, तर नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणदेखील भरले आहे. हतूनर धरणात ६५ टक्के साठा असला तरी त्याचा विसर्ग करण्यात येत असतो. मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, बोरी व मन्याड पूर्ण भरले आहेत. मोर व बहुळात ९० टक्कयापेक्षा अधिक साठा आहे. गुळ आणि अंजनी ७५ टक्कयापेक्षा अधिक भरली आहेत. भोकरबारी मात्र २१ टक्कयावर अडले आहे. धुळे जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी वाडीशेवाडी, सोनवद हे ९० टक्कयापेक्षा अधिक तर करवंद, अनेर ही ८० टक्के, अमरावती ७८ टक्के भरले आहेत. सुलवाडे बॅरेज ५० टक्के भरले असून सारंगखेडा, अक्कलपाडा ५० टक्कयापेक्षा कमी आहेत. पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात रंगावली प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकाशा बॅरेज ४४ टक्के, शिवण ९१ टक्के तर दरा ७२ टक्के भरले आहे. आबादानी स्थिती असताना प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे पाणी उपसा करुन बांधापर्यंत नेण्यासाठी असलेल्या उपसा सिंचन योजनांचे भिजत घोंगडे कायम आहे. बोदवडबाबतदेखील तीच स्थिती आहे. धरणे भरली आहेत, पण बांध कोरडे राहणार आहेत. ही स्थिती जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्यतेने आणि राजकीय मंडळींच्या भ्रष्ट कारभारामुळे उद्भवली आहे. धरणात पाणी असले तरी शहरांना रोज पाणीपुरवठा करणारी शहरे मोजकी आहेत. शहादा आणि नवापूरला रोज पाणीपुरवठा होतो. नंदुरबारला पाणीपुरवठा करणाºया विचरक धरणात ९० टक्के तर आंबेपारा धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे, पण साठवण क्षमतेअभावी एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. धुळ्याला नकाणे तलावावरुन पाणी दिले जाते, तलाव पूर्ण भरलाय पण शहरात दोन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. वाघूर धरण १०० टक्के भरले आहे, पण जळगावला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. साक्रीमध्ये चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. केंद्र सरकारची अमृत पाणी योजना धुळे, जळगाव व भुसावळात सुरु आहे, पण त्यात अडथळे कायम आहे. शिरपुरात मात्र मुबलक पाणी पुरवठा होत आहे. निसर्गाचे देणे आम्ही कसे स्विकारतो, यावर बरेच अवलंबून आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव