शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !

By अतुल कुलकर्णी | Updated: May 2, 2025 06:58 IST

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना मुंबईकरांची नाडी माहिती आहे. लोकांना पोलिसांच्या चिरीमिरीपासून त्यांनी वाचवले, तरी त्यांचे कौतुक होईल...

अतुल कुलकर्णी, संपादक लोकमत, मुंबई

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती झाली. गेले काही वर्षे ते मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून काम पाहत होते. एका म्यानात दोन तलवारी, असे चित्र यानिमित्ताने निर्माण झाले होते. नेमके कोणाचे ऐकायचे? असा प्रश्न अनेक अधिकाऱ्यांना पडत असे. आता ती संभ्रमावस्था दूर झाली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्तपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात बॉलीवूड आहे. शेअर मार्केटही इथेच आहे. अनेक बड्या उद्योगपतींची मुख्यालये या शहरात आहेत. दीड-पावणेदोन कोटी लोकसंख्येचे हे शहर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. कधीकाळी याच शहरावर नियंत्रण ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जात असे. मध्यंतरी हा लौकिक मागे पडला.

तुमचा दाऊद, तर आमचा गवळी, असे विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. मुंबईत  बिल्डरांना धमकावणे, खंडणी वसूल करणे, असे प्रकार घडायचे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली, तेव्हा एन्काऊंटरच्या ऑर्डर दिल्या गेल्या. विरोधातले गुंड दूर करण्यासाठी गुंडांच्या टोळ्यांनीच एन्काऊंटरचा वापर केल्याचा आरोपही त्या काळात झाला. दाऊद भारत सोडून निघून गेला. गवळी तुरुंगात गेला. त्यामुळे होणारे टोळी युद्धही मागे पडले. मधल्या काळात मुंबईवर दोन वेळा दहशतवादी हल्ले झाले. २६/११ चा हल्ला मोठा होता. त्यानंतर पोलिस दलात अनेक बदल झाले. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत फारसा फरक पडला नाही. मुंबईचे पोलिस आयुक्त किंवा राज्याचे पोलिस महासंचालक व्हावे, असे प्रत्येक अधिकाऱ्याचे स्वप्न असते. त्यासाठीच अनेक अधिकारी जिवाचे रान करतात. मात्र, या पदावर बसल्यानंतर अनेकांनी व्यक्तिगत हिशोब चुकते करण्यात वेळ घालवण्याचा इतिहास आहे. आता आपण सर्वोच्च पदावर आहोत, तेव्हा या विभागासाठी चांगले काही करू, असे वाटण्याची मानसिकता हरवत गेल्याचेही अनेकदा दिसले.

एका पोलिस आयुक्तांनी त्यांच्या आवडीचा अधिकारी मटका आणि नाफ्ताचे हप्ते गोळा करण्यासाठी ठेवला होता. तर, ‘मी थोडेच तुम्हाला मला पोलिस आयुक्त करा, असे सांगितले होते?’, असा सवाल एका पोलिस आयुक्ताने तत्कालीन गृहमंत्र्यांनाच केला होता. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ठरवले, तर ते काहीही करू शकतात, इतकी अफाट क्षमता या पदात आहे. अशावेळी हे पद कसे आणि कोणासाठी वापरायचे याचा निर्णय त्या-त्या पोलिस आयुक्तांनीच घ्यायचा असतो. आजपर्यंतच्या पोलिस आयुक्तांनी काय केले, याचा इतिहास मुंबईकरांसमोर आहे. गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. वांद्रे, जुहू, अंधेरी या पट्ट्यात असणाऱ्या नाइट क्लबमध्ये वेगवेगळ्या नशेची साधने सर्रास उपलब्ध आहेत. कधीकाळी बदनाम असणारा ग्रँटरोड आता काळाच्या आड गेला आहे. तिथे मिळणाऱ्या गोष्टी मोबाइल फोनवर फोटो बघून फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मागवण्याचे प्रकार सुरू झाले. सायबर क्राइमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्या वर्षी ३,६८४ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे गुन्हे दाखल झाले. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत १,२९४ कोटींचे गुन्हे दाखल आहेत. ‘तुम्ही कधीच मीडियाला सहज उपलब्ध झाला नाहीत, तुम्हाला भेटायचे तर मेल करावा लागत असे’, अशी खंत मावळते पोलिस आयुक्त विवेक फणसळकर निवृत्त होताना पत्रकारांनी त्यांच्या समक्ष बोलून दाखवली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्तपद देवेन भारती यांच्याकडे आले आहे. किती जणांना डावलून त्यांना हे पद दिले, या चर्चांना आता अर्थ नाही. १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे भारती मूळचे बिहारमधील दरभंगाचे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही त्यांचे चांगले सख्य होते. विद्यमान गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भारती यांनी महाराष्ट्रात आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावली आहे. गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित जिल्ह्यात त्यांनी काम केले आहे. त्याशिवाय १९९८ ते २००३ या कालावधीत त्यांनी केंद्राच्या गुप्तचर विभागातही काम केले आहे. मुंबईत त्यांनी विशेष शाखा, गुन्हे शाखा, कायदा व सुव्यवस्था, एटीएस, राज्य पोलिस मुख्यालय, अशा विविध ठिकाणी काम केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला, पत्रकार जे. डे. हत्या प्रकरण, इंडियन मुजाहिद्दीनवरील कारवाया, शिना बोरा हत्या प्रकरण हाताळण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे मुंबईकरांची नाडी त्यांना माहिती आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना पोलिसांच्या चिरीमिरीपासून जरी त्यांनी वाचवले, तरी लोक त्यांचे कौतुक करतील, अशी आज स्थिती आहे. त्यावेळी ते विशेष पोलिस आयुक्त होते. आता तेच सर्वेसर्वा आहेत. पत्रकारांशी कसे व किती संबंध ठेवायचे हे त्यांना चांगले समजते. त्यामुळे जी खंत फणसळकरांच्या बाबतीत व्यक्त झाली, ती यांच्या बाबतीत होईल, असे वाटत नाही. अत्यंत मितभाषी आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. प्रसंगी या स्वभावाला त्यांना मुरड घालावी लागेल. मुख्यमंत्र्यांनीही आता अन्य कोणाची विशेष पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक न करता एका म्यानात एकच तलवार राहू द्यावी. तलवारीचा डौल ही राहील आणि शानही... देवेन भारती यांना शुभेच्छा.

                atul.kulkarni@lokmat.com

टॅग्स :Policeपोलिस