शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

...तर कचरा प्रश्न पेटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 3:21 AM

कचरा उचलणार नाही, अशी जाहीर धमकी कंत्राटदारांनी महापालिकेला दिली़ या धमकीचा परिणाम प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांवर थेट होणार नसला तरी त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांना सोसावा लागणार

कचरा उचलणार नाही, अशी जाहीर धमकी कंत्राटदारांनी महापालिकेला दिली़ या धमकीचा परिणाम प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांवर थेट होणार नसला तरी त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांना सोसावा लागणार हे निश्चित़ महत्त्वाचे म्हणजे धमकी देण्याचे बळ कंत्राटदारांना मिळाले कुठून हा खरे तर चिंतनाचा विषय आहे़ ही धमकी देण्याचे कारणही चक्रावून टाकणारे आहे़ कंत्राटदार कचºयात डेब्रिज टाकतात, असा आरोप प्रशासनाने केला व तशी रीतसर तक्रार पोलिसांकडे केली़ पोलिसांनी अधिकाºयाला पुढे येऊन तक्रार करायला सांगितले़ कोणीच अधिकारी पुढे आला नाही़ अखेर पालिकेने कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस धाडली़ कंत्राटदारांनी नोटिसीला जशास तसे उत्तर देत पालिकेला थेट धमकी दिली़ गृहनिर्माण सोसायट्यांनी कचरा वर्गीकरण केले नाही, तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणारी पालिका आता कंत्राटदारांच्या उत्तराची वाट बघत आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याचे काम पालिकेचे असताना कंत्राटदारांची धमकी ऐकून घेणे हे पालिकेला शोभनीय नाही़ रस्त्याचे काम असो वा अन्य कोणतेही; वर्षानुवर्षे तेच कंत्राटदार ही कामे करत आहेत़ कामाचा दर्जा वाढो, न वाढो किंवा ते काळ्या यादीत जावो; अथवा ते घोटाळेबाज ठरोत, तरीही त्याच कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट दिले जाते़ त्यामुळे वाढत असलेली कंत्राटदारांची मुजोरी पालिकेने तोडायला हवी़ वाहन टोइंग करणाºया कंत्राटदार कंपनीला शह देण्यासाठी हे काम विदर्भातील एका कंपनीला देण्यात आले. मुंबईतील वाहन टोइंगचे काम सध्या अ‍ॅटोमॅटेड पद्धतीने सुरू आहे. या सूत्रानुसार पालिकेनेही आता वागायला हवे़ डम्पिंगचा प्रश्न इतका गंभीर झाला, की न्यायालयाने पालिकेच्या नियोजनाचे वेळोवेळी वाभाडे काढले़ कचरा पेटणार, अशा आशयाचे वृत्त अनेक वेळा चर्चेला आले. मात्र अद्याप पालिकेने यावर ठोस तोडगा काढलेला नाही़ त्यात कंत्राटदारही पालिकेला धमकी देऊन मोकळे झाले़ मुलुंड डम्पिंगचा मुद्दा एकेकाळी वादग्रस्त ठरला होता़ एका राजकीय नेत्याने पालिका मुख्यालयासमोर कचरा आणून टाकला होता़ तेव्हा पालिका प्रशासन झोपेतून जागे झाले व मुलुंड डम्पिंग तोडगा काढण्याची सूत्रे हलली़ याचा आदर्श आता सर्वसामान्यांनी घेण्याची वेळ आली आहे.पालिकेने वेळीच कचराप्रश्नी तोडगा काढला नाही तर पालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा आणून टाकण्याचे धाडस सर्वसामान्यांना दाखवावे लागेल. त्यामुळे हा प्रश्न आता अधिक तापू द्यायचा नसल्यास पालिकेने तातडीने कचराप्रश्नी तोडगा काढावा व कंत्राटदारांची मुजोरी कायमची संपवावी, जेणेकरून सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत.