शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

त्यांचे बुद्धीशीच वैर आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:20 IST

आजही ज्या थोरा-मोठ्यांची नावे समाज आदराने घेतो आहे ते बुद्धी व तर्क, प्रज्ञा व प्रतिभा यांच्या आधारानेच मोठे ठरले आहेत.

आजही ज्या थोरा-मोठ्यांची नावे समाज आदराने घेतो आहे ते बुद्धी व तर्क, प्रज्ञा व प्रतिभा यांच्या आधारानेच मोठे ठरले आहेत. अडचण या साऱ्यांपासून दूर राहणाऱ्या निर्बुद्धांची आहे. त्यांना पुढे जाता येत नाही. जमलेच तर ते कुणा पुढाºयाचे अनुयायी तेवढे होतात.‘बुद्धिवाद्यांना जागीच मारा’ हा एका ज्येष्ठ संघपुत्राने नागपुरात आपल्या श्रोत्यांना व अनुयायांना दिलेला संदेश जेवढा अंतर्मुख करणारा तेवढाच आपल्या भवितव्याच्या वाटचालीविषयी चिंता करायला लावणारा आहे. ज्ञान, बुद्धी, प्रज्ञा, विचार, तर्क आणि प्रतिभा या समाजाला पुढे आणि उंचीवर नेणाºया बाबी आहेत. त्यांचा आधार, आश्रय व अध्ययन करणाऱ्यांना समाजाने नेहमीच त्याचे मार्गदर्शक म्हणून गौरविले आहे. आजही ज्या थोरा-मोठ्यांची नावे समाज आदराने घेतो आहे ते बुद्धी व तर्क, प्रज्ञा व प्रतिभा यांच्या आधारानेच मोठे ठरले आहेत. अडचण या साºयांपासून दूर राहणाºया निर्बुद्धांची आहे. त्यांना पुढे जाता येत नाही. नेते होता येत नाही. जमलेच तर ते कुणा पुढाºयाचे वा बुवाबाबाचे अनुयायी, वारकरी वा झेंडेकरीच तेवढे होतात. अशी माणसे मग स्वत:ला निष्ठावान व श्रद्धावान म्हणवतात. श्रद्धा वा निष्ठा या वाईट बाबी अर्थातच नाहीत. त्यामुळे समाजाचे स्थैर्य बºयापैकी दिसत असते. मात्र, त्यांच्यात पुढे जाण्याची, पुढचे पाहण्याची वा भविष्याचा वेध घेण्याची क्षमता कमी असते. ती बहुदा स्थितीवादी माणसे असतात. माणसे सगळीच वाढत वा मोठी होत नाहीत. काही किंवा बहुसंख्य माणसे तशीच राहतात. लहान असताना होती तशीच तारुण्यात व तरुणपणी असतील तशीच म्हातारपणी. ती स्थितीशील असतात. त्यातून त्यांची बुद्धी मारण्याच्या व्यवस्था आपल्याकडे आहेत. त्याच्या संस्था व संघटना आहेत. त्याचे गुरू व श्रद्धास्थाने आहेत. या माणसांवर त्यांची ती श्रद्धास्थाने एकच एक संस्कार घडवीत असतात. ‘विचार करू नका, श्रद्धा ठेवा’. श्रद्धेनेच कल्याण होईल, विचार भरकटतात, श्रद्धा तुम्हाला जागच्या जागीच ठेवतात, म्हणून श्रद्धेची कास धरा, ज्ञानाला दूर ठेवा इ.इ. ‘जगातील सारे ज्ञान कुराणात आहे, त्यामुळे बाकीची ग्रंथालये जाळायला हरकत नाही’ असे एका धर्माने सांगितले; तर दुसºयाने ‘व्यासोच्छिष्टम जगत्सर्वम’ म्हणून सारे ज्ञान महाभारतात आले आहे, तुम्ही दुसरे काही वाचण्या-अभ्यासण्याची गरज नाही, असे सांगितले. श्रद्धा अशाच वाढतात. विल ड्युरांट म्हणतो धर्मश्रद्धांनी तर्कच नव्हे, तर तत्त्वज्ञाने मारली, विचार संपविले आणि जग आहे तेथेच रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला. आता जग अशा वेडगळ समजुतींच्या फार पुढे गेले आहे. अशा स्थितीत, बदललेल्या वातावरणात ज्यांच्या श्रद्धांची आसने डळमळीत झाली त्यांना नव्याने जोर चढला आहे व ते पुन्हा एकवार ‘बुद्धी मारा, बुद्धिवाद्यांना जागीच मारा’ असे उपदेश करायला निघाले आहेत. बुद्धी सत्तेला व व्यवस्थेला प्रश्न विचारते, शंका उत्पन्न करते. अमूक गोष्ट अशीच का, कशामुळे, असे मुद्दे उपस्थित करते. त्यातून सत्य पुढे आणण्याचा, ते उघड करण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण ज्यांना सत्य समोर येणे सहन होत नाही, त्यांच्यातूनच मग दाभोलकरांचा खून होतो, पानसरे मारले जातात, गौरी लंकेशला घरात मारले जाते आणि कलबुर्गींना गोळ्या घातल्या जातात. गांधीजी असेच मारले गेले. तुकारामाची गाथा नदीत बुडविली गेली, ज्ञानेश्वरांना समाधी घ्यावी लागली, सॉक्रेटिसला विष दिले गेले. हे जगात सर्वत्र झाले कारण सत्ता व प्रस्थापित यांना सत्याने विचारलेले, बुद्धीला घाम फोडणारे प्रश्न चालत नाहीत. त्यांना आज्ञाधारक स्वयंसेवकांची फौज लागते. जी फक्त आज्ञा पाळते. त्यांनी प्रश्न विचारायचे नसतात. बुद्धी हेच या प्रश्नांचे मूळ असल्याने मग बुद्धी नको आणि बुद्धिवादीही नको असे म्हटले जाते. श्रद्धावानांचे मोर्चे निघत नाहीत, त्यांची आंदोलने होत नाहीत, त्यांच्या मिरवणुका निघत नाहीत. निघतात त्या त्यांच्या दिंड्या. ते तसे का करतात याचे उत्तर पुष्कळदा त्यांनाही देता येत नाही. कारण ते त्यांना समजावून देण्याची गरज त्यांच्या मार्गदर्शकांना नसते. एकदा बुद्धी नाकारायची हे ठरले की मग समजुतीची गरजच संपते. मग नागरिकांना विचारवंत व्हायचे की प्रचारवंत, ज्ञानजीवी व्हायचे की अज्ञानजीवी, असे प्रश्न पडतात. ज्ञानी विवेकाची कास धरतात. विवेकाला बुद्धी लागते, तर्क लागतो व विचारशक्ती लागते. ‘बुद्धिवाद्यांना जागीच ठार करा’ म्हणणारे त्यांना मारत नाहीत. त्यांना सत्ता व व्यवस्था यांना अवघड प्रश्न विचारणारे मारायचे असतात. कारण प्रश्न नसले की शांतता असते. (फक्त तेथे लोकशाही नसते एवढेच).

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ