शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

शब्द हे ब्रह्म, ते ‘असंसदीय’ कसे असतील?

By विजय दर्डा | Updated: July 18, 2022 07:48 IST

प्रश्न खासदारांच्या संसदेतल्या वर्तनाचा आहे. शब्दांनाच पिंजऱ्यात उभे करून काय साधले जाणार? बोलण्यात मुद्दा असेल, तर कठोर शब्दांची गरजच नसते!

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

संसदीय शब्दांची यादी तसे पाहता दरवर्षी जाहीर होते, पण या वेळच्या नव्या यादीवरून बराच वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे असे म्हटले. शब्दांवर अशा प्रकारचा अंकुश लोकशाहीमध्ये योग्य नाही. जीवनात हरघडी उपयोगी पडणारे शब्द असंसदीय कसे असू शकतील? 

आता जरा या शब्दांवर नजर टाका. तानाशाह, जुमलाजीवी, जयचंद, अंट-शंट, करप्ट, नौटंकी, ढिंढोरा पीटना, निकम्मा, बालबुद्धी, उलटा चोर कोतवाल को डाटे, उचक्के, अहंकार, काला दिन, गुंडागर्दी, गुलछर्रा, गुल खिलाना असे शब्द  संसदेत वापरले गेले तर ते रेकॉर्डमधून काढून टाकले जातील. सत्तारूढ पक्षावर टीका करताना वारंवार वापरले जातात तेच शब्द जाणूनबुजून काढले गेले आहेत असे विरोधकांचे म्हणणे! त्यामुळे हुकूमशहा, दादागिरी, दंगा हे शब्दसुद्धा आता असंसदीय ठरले आहेत. समजा, कुठे दंगल झाली आणि संसदेत त्याबद्दल चर्चा करायची आहे तर दंगा शब्द न वापरून कसे चालेल? शब्दांना  ‘असंसदीय’ ठरवण्याची ही परंपरा योग्य नव्हे!

मी अठरा वर्षे संसदीय राजकारणात होतो, पत्रकारही आहे. शब्दांची सार्थकता जाणतो. संसदीय आणि असंसदीय शब्द हा वाद केवळ हिंदुस्थानात नाही. जगातल्या अनेक देशात अनेक शब्दांचा उपयोग वेळोवेळी प्रतिबंधित केला गेला आहे.

भारतातही १९५४ पासून अशी यादी तयार केली जाऊ लागली. कुठल्यातरी संदर्भात विशिष्ट शब्द सभापतींनी अशिष्ट मानून तो वापरायला मनाई केली. नंतर राज्यांच्या विधानसभांतही ही प्रक्रिया सुरू झाली. आता दरवर्षी नवी यादी तयार होते. या वेळच्या यादीवरून सर्वाधिक वादंग निर्माण झाला आहे. 

खरे तर, शब्द हे ब्रह्म आहेत. तीच आपली भारतीय संस्कृती आणि परंपराही आहे. भाव प्रकट करण्याचे माध्यम शब्द असतात. शिव्या सोडल्या तर सामान्यतः कोणताच शब्द असंसदीय होऊ शकत नाही. काही शब्द कठोर जरूर असतील, बोचरेही असतील. एक छोटासा शब्द नातेसंबंधांच्या चिंध्या करू शकतो. धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून सुटलेला शब्द परत आणता येत नाही.  व्यक्तिगत जीवन असो, सामाजिक अवकाश असो वा संसद, शब्दांचा उपयोग समजून उमजून केला पाहिजे. कठोर शब्दांमुळेच महाभारत घडले आणि कठोर शब्दांमुळेच रावणाची लंकाही जळाली.

आपल्या म्हणण्यात दम असेल, विचारामागे योग्य ती तर्कसंगती असेल तर कोणालाही दुखावणाऱ्या कठोर शब्दांचा वापर करण्याची गरजच पडत नाही. एकदा हेमकांत बरुआ यांनी आवेशात येऊन नेहरूंना अपशब्द वापरला. तरीही नेहरूंनी त्यांना चहाला बोलावले आणि सांगितले, ‘तुम्ही बोलता चांगले, पण रागावता फार!’ फिरोज गांधीही जबरदस्त प्रहार करीत, पण त्यांचे शब्द संयमित असत.

परिस्थिती कशी बिघडते ते पाहिले आहे. आता, भाजपा, काँग्रेस, लालूजी, ममतादीदी, जयललिता, करुणानिधी या शब्दांमध्ये काय  असंसदीय आहे? - पण ही नावे घेताच विरोधक तुफान उभे करत. आजही ते दिसतेच. सर्वोच्च न्यायालयात खडाजंगी वाद-प्रतिवाद होतात, पण तिथे कधी हा असंसदीय शब्दांचा मुद्दा उपस्थित होतो का? - नाही! कारण तिथे वर्तनातली सभ्यता पाळली जाते. विरोधी पक्षांबद्दल सभ्यता राखणे ही सरकारची जबाबदारी आहे, तसेच विरोधी खासदारांनीही आपले संसदीय आचरण इतरांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असे ठेवले पाहिजे. 

तरुण मतदारांचे आपल्या खासदार, आमदारांच्या वर्तनाकडे लक्ष असते. संसद हे लोकशाहीचे मंदिर मानले जाते. आपल्या आराध्य देवतेसमोर  असेल, तसेच वर्तन संसदेतही असले पाहिजे. वर्तन सुसंस्कृत असेल तर एखादा शब्द असंसदीय ठरण्याचा प्रश्नच येणार नाही. 

१९५६ साली गोडसे हा शब्द असंसदीय शब्दांच्या यादीत टाकला गेला. राज्यसभेत तत्कालीन उपसभापती पीजे कुरियन यांनी एका खासदाराला गोडसे हा शब्द वापरायला मनाई केली. तेव्हा शिवसेनेचे तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यांनी लोकसभेच्या त्यावेळच्या सभापती सुमित्रा महाजन यांना पत्र लिहिले, ‘गोडसे तर माझे आडनाव आहे. माझे नाव असलेला शब्द मी वापरायचा नाही, हे कसे?’ 

- सभापतींनी ‘गोडसे’ शब्द असंसदीय शब्दांच्या यादीतून काढून टाकला आणि केवळ पूर्ण नाव ‘नथुराम गोडसे’ प्रतिबंधित मानले जाईल, असा निर्देश दिला.

जाता जाता:

रशियाकडून ‘एस ४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करणाऱ्या भारताबद्दल अमेरिका कोणती भूमिका घेणार, याकडे जगाचे लक्ष लागले होते. दोन वर्षांपूर्वी तुर्कस्तानने रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्रे घेतली तेव्हा नाराज झालेल्या अमेरिकेने त्या देशावर कडक प्रतिबंध लावले. 

भारताने त्याची पर्वा केली नाही आणि व्यवहार पूर्ण झाला. आता अमेरिका काय करते याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भारतावर निर्बंध लावण्याचा विचारसुद्धा करणे हे अमेरिकेला परवडणारे नाही. मागच्या आठवड्यात भारतवंशी अमेरिकन खासदार रोहित खन्ना यांनी भारताला विशेष सूट देण्याचा प्रस्ताव त्यांच्या संसदेपुढे मांडला आणि तो स्वीकारला गेला. ही आपल्या देशाची ताकद!... सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा! 

टॅग्स :Parliamentसंसद