शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्षाची प्रतिमा उत्कटतेने रंगवण्याच्या ‘ध्यास-पर्वा’ची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2023 07:58 IST

चरित्र लेखकांच्या मनात चरित्र नायक/नायिका किती खोल उतरत असतील? त्या व्यक्ती लेखकाला पार व्यापून टाकत असतील का? स्वप्नातही येत असतील का?

- गोपाळ औटी

काही चरित्रे आणि त्या चरित्रांच्या नायक-नायिका यांच्याशी त्या-त्या चरित्र लेखकांची जुळलेली नाळ अक्षरश: स्तिमित करून टाकणारी असते. ‘केसरी’चे बारावे संपादक अरविंद गोखले हे टिळकांचे वस्तुनिष्ठ चित्रकार. ‘मंडालेचा राजबंदी’ आणि ‘टिळक पर्व’ ही त्यांनी लिहिलेली दोन्ही टिळक चरित्रे वाचनीय आणि संग्राह्यही. गोखले एका ठिकाणी लिहितात, ‘आता म्हणजे असे झाले की, माझ्या स्वप्नात जयंतराव टिळक आणि लोकमान्य दोघे येऊ लागले. अजून लिखाणाला सुरुवात व्हायची होती. तोच स्वप्नात, ‘अरे तू न. र. फाटक यांनी लिहिलेले वाचले आहेस का?’ असे विचारले जायचे.  पुढे पुढे तर लेखनाचा क्रमही सांगितला जाऊ लागला.  चरित्र लेखनात आपणाकडून थोडी चूक झाली तर लोकमान्यांच्या हातातली काठी उचलली तर जाणार नाही ना, अशी भीती वाटायची!’

गोखले यांचे उद्गार त्यांच्या तादात्म्यतेचे निदर्शक आहेत. मराठी चरित्रकारांमधले महत्त्वाचे नाव  म्हणजे धनंजय कीर. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर ही सर्व  बृहत् चरित्रे वाचताना  कीर यांच्या काबाडकष्टांची जाणीव होते. कीरांचे कष्ट, भाषाप्रेम, व्यासंग, राष्ट्रप्रेम, कामाची शिस्त या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. संदर्भग्रंथ ठरलेली त्यांची सर्व चरित्रे पूर्ण करीत कीर यांनी अक्षरशः आपल्या डोळ्यांच्या खाचा करून घेतल्या. जाड भिंगाचा चष्मा आणि  संदर्भ साधनांच्या ढिगांमध्ये हरवलेले कीर हे साहित्यातल्या समर्पणाचे दुर्मीळ चित्र आहे. चरित्र लिहिण्याची बैठक आणि पद्धत याविषयी कीर यांनी पुष्कळच चिंतन केले. चरित्र वाङ्मयावरचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले. ते म्हणतात, निर्विकारपणे लिहिले तर ते चैतन्यहीन ठरेल. माझ्या चरित्रनायकाच्या ध्येयधोरणांशी मी समरस झालो; परंतु निकाल देताना चरित्रकाराने स्वतंत्र आणि तटस्थ राहावे हे उत्तम!’ 

आजच्या पिढीतल्या संशोधक, चरित्रकार मनीषा बाठे यांचे समर्थ रामदासांच्या जीवनकार्याशी असणारे तादात्म्य तितकेच आश्वासक आणि अव्वल दर्जाचे वाटते. अकरा भारतीय भाषा लिहिता-बोलता येणाऱ्या या व्यासंगी विदुषीने यंदाच्याच वर्षी लिहिलेले समर्थ रामदासांचं छोटेखानी चरित्र (मोनोग्राफ) त्यांच्या ध्यासाचा परिपाक आहे. ‘दिसेना जनी तेचि शोधून पाहे’ या समर्थ वचनाचा पडताळा घेत मनीषाताईंनी अनेक प्रदेशांत, अनेक राज्यांत पायपीट केली. पोथ्यांचा धांडोळा घेत संकटातून चिवट मार्गक्रमण केले आहे. या तादात्मतेतूनच त्यांच्या अंतःकरणात राघव आणि समर्थ या दोघांनीही वस्ती केली आहे, हे नि:संशय ! डॉक्टर आनंदीबाई जोशी (मे १९९७), गानयोगी पंडित डी .व्ही. पलुस्कर (डिसेंबर २०१०) आणि बहुरुपिणी दुर्गाबाई भागवत (जुलै २०१८) ही तीन चरित्रे म्हणजे डॉ. अंजली कीर्तने यांनी घडविलेल्या बौद्धिक मैफिली आहेत.  विशेष म्हणजे त्या तिघांवरही डॉक्टर कीर्तने यांनी सुंदर अनुबोधपट  काढले.  त्यावर सप्रयोग व्याख्याने दिली.  अंजलीताई २२-२३ वर्षांपेक्षा अधिक काळ या कामात बुडून गेलेल्या होत्या. कष्ट, पायपीट, पाठपुरावा, संशोधन आणि शेवटी  मांडणी यासाठी अंजलीबाईंना दाद द्यावी लागेल. 

आयुष्यभर अफाट संघर्षमय चळवळ उभी करणारा एखादा नेता मात्र पूर्णांशाने समाजाला कळत नाही. अशा वेळी एखादा तळमळीचा संपादक त्या विषयात हात घालतो. २०१६ मध्ये भानू काळे यांनी शरद जोशी यांचा विस्तृत जीवनपट मांडला. ‘अंगार वाटा’ या शीर्षकावरूनच शरद जोशी यांच्या धगधगत्या आयुष्याची कल्पना यावी. शरद जोशी यांच्या कामाचे मोल जगाला कळावे म्हणून त्यांच्या कामाचा झंझावात भानू काळे यांनी इंग्रजीतूनही एक चरित्र लिहून मांडला.  स्वित्झर्लंडमधील मानमरातबाची नोकरी सोडून शरद जोशी शेतकऱ्यांसाठी पुण्याजवळ आंबेठाणमध्ये येऊन राहिले. शेतकऱ्यांचा जागल्या होऊन भारतभर अखंड पायपीट करीत राहिले. - काही काळ तरी लेखक त्या चरित्र नायकाच्या विश्वात विलीन झालेला असतो, म्हणूनच त्यांची परस्पर स्पंदने वाचकांना जाणवल्याशिवाय राहत नाहीत.