शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

प्रत्यक्षाची प्रतिमा उत्कटतेने रंगवण्याच्या ‘ध्यास-पर्वा’ची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2023 07:58 IST

चरित्र लेखकांच्या मनात चरित्र नायक/नायिका किती खोल उतरत असतील? त्या व्यक्ती लेखकाला पार व्यापून टाकत असतील का? स्वप्नातही येत असतील का?

- गोपाळ औटी

काही चरित्रे आणि त्या चरित्रांच्या नायक-नायिका यांच्याशी त्या-त्या चरित्र लेखकांची जुळलेली नाळ अक्षरश: स्तिमित करून टाकणारी असते. ‘केसरी’चे बारावे संपादक अरविंद गोखले हे टिळकांचे वस्तुनिष्ठ चित्रकार. ‘मंडालेचा राजबंदी’ आणि ‘टिळक पर्व’ ही त्यांनी लिहिलेली दोन्ही टिळक चरित्रे वाचनीय आणि संग्राह्यही. गोखले एका ठिकाणी लिहितात, ‘आता म्हणजे असे झाले की, माझ्या स्वप्नात जयंतराव टिळक आणि लोकमान्य दोघे येऊ लागले. अजून लिखाणाला सुरुवात व्हायची होती. तोच स्वप्नात, ‘अरे तू न. र. फाटक यांनी लिहिलेले वाचले आहेस का?’ असे विचारले जायचे.  पुढे पुढे तर लेखनाचा क्रमही सांगितला जाऊ लागला.  चरित्र लेखनात आपणाकडून थोडी चूक झाली तर लोकमान्यांच्या हातातली काठी उचलली तर जाणार नाही ना, अशी भीती वाटायची!’

गोखले यांचे उद्गार त्यांच्या तादात्म्यतेचे निदर्शक आहेत. मराठी चरित्रकारांमधले महत्त्वाचे नाव  म्हणजे धनंजय कीर. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर ही सर्व  बृहत् चरित्रे वाचताना  कीर यांच्या काबाडकष्टांची जाणीव होते. कीरांचे कष्ट, भाषाप्रेम, व्यासंग, राष्ट्रप्रेम, कामाची शिस्त या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. संदर्भग्रंथ ठरलेली त्यांची सर्व चरित्रे पूर्ण करीत कीर यांनी अक्षरशः आपल्या डोळ्यांच्या खाचा करून घेतल्या. जाड भिंगाचा चष्मा आणि  संदर्भ साधनांच्या ढिगांमध्ये हरवलेले कीर हे साहित्यातल्या समर्पणाचे दुर्मीळ चित्र आहे. चरित्र लिहिण्याची बैठक आणि पद्धत याविषयी कीर यांनी पुष्कळच चिंतन केले. चरित्र वाङ्मयावरचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले. ते म्हणतात, निर्विकारपणे लिहिले तर ते चैतन्यहीन ठरेल. माझ्या चरित्रनायकाच्या ध्येयधोरणांशी मी समरस झालो; परंतु निकाल देताना चरित्रकाराने स्वतंत्र आणि तटस्थ राहावे हे उत्तम!’ 

आजच्या पिढीतल्या संशोधक, चरित्रकार मनीषा बाठे यांचे समर्थ रामदासांच्या जीवनकार्याशी असणारे तादात्म्य तितकेच आश्वासक आणि अव्वल दर्जाचे वाटते. अकरा भारतीय भाषा लिहिता-बोलता येणाऱ्या या व्यासंगी विदुषीने यंदाच्याच वर्षी लिहिलेले समर्थ रामदासांचं छोटेखानी चरित्र (मोनोग्राफ) त्यांच्या ध्यासाचा परिपाक आहे. ‘दिसेना जनी तेचि शोधून पाहे’ या समर्थ वचनाचा पडताळा घेत मनीषाताईंनी अनेक प्रदेशांत, अनेक राज्यांत पायपीट केली. पोथ्यांचा धांडोळा घेत संकटातून चिवट मार्गक्रमण केले आहे. या तादात्मतेतूनच त्यांच्या अंतःकरणात राघव आणि समर्थ या दोघांनीही वस्ती केली आहे, हे नि:संशय ! डॉक्टर आनंदीबाई जोशी (मे १९९७), गानयोगी पंडित डी .व्ही. पलुस्कर (डिसेंबर २०१०) आणि बहुरुपिणी दुर्गाबाई भागवत (जुलै २०१८) ही तीन चरित्रे म्हणजे डॉ. अंजली कीर्तने यांनी घडविलेल्या बौद्धिक मैफिली आहेत.  विशेष म्हणजे त्या तिघांवरही डॉक्टर कीर्तने यांनी सुंदर अनुबोधपट  काढले.  त्यावर सप्रयोग व्याख्याने दिली.  अंजलीताई २२-२३ वर्षांपेक्षा अधिक काळ या कामात बुडून गेलेल्या होत्या. कष्ट, पायपीट, पाठपुरावा, संशोधन आणि शेवटी  मांडणी यासाठी अंजलीबाईंना दाद द्यावी लागेल. 

आयुष्यभर अफाट संघर्षमय चळवळ उभी करणारा एखादा नेता मात्र पूर्णांशाने समाजाला कळत नाही. अशा वेळी एखादा तळमळीचा संपादक त्या विषयात हात घालतो. २०१६ मध्ये भानू काळे यांनी शरद जोशी यांचा विस्तृत जीवनपट मांडला. ‘अंगार वाटा’ या शीर्षकावरूनच शरद जोशी यांच्या धगधगत्या आयुष्याची कल्पना यावी. शरद जोशी यांच्या कामाचे मोल जगाला कळावे म्हणून त्यांच्या कामाचा झंझावात भानू काळे यांनी इंग्रजीतूनही एक चरित्र लिहून मांडला.  स्वित्झर्लंडमधील मानमरातबाची नोकरी सोडून शरद जोशी शेतकऱ्यांसाठी पुण्याजवळ आंबेठाणमध्ये येऊन राहिले. शेतकऱ्यांचा जागल्या होऊन भारतभर अखंड पायपीट करीत राहिले. - काही काळ तरी लेखक त्या चरित्र नायकाच्या विश्वात विलीन झालेला असतो, म्हणूनच त्यांची परस्पर स्पंदने वाचकांना जाणवल्याशिवाय राहत नाहीत.