शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

अनंत अंबानी आणि एका पोपटाची 'ती' कहाणी; ब्राझीलच्या जंगलात...

By विजय दर्डा | Updated: February 24, 2025 08:43 IST

मुकेशभाई आणि नीताभाभी यांनी अनंतला संस्कार आणि संस्कृतीच्या रसात न्हाऊ घातले आहे. या अस्वस्थ जगात अनंत अंबानी हे मानवतेची दूरदर्शी खूण आहे !

- डॉ. विजय दर्डा

चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

माझे जीवन आणि माझा व्यवसायच असा की, मला खूप लोक भेटत असतात. या गर्दीत काही मोजक्या व्यक्तींना भेटून वाटायला लागते, हे जग इतके सुंदर कसे? जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी त्यातले एक! सहज, साधे; परंतु स्पष्टवक्ते, दृढनिश्चयी आणि मानवतेने ओतप्रोत भरलेले! गेल्या आठवड्यात मी दोन तास त्यांच्याबरोबर होतो. पुष्कळ गप्पा झाल्या.

अनंत यांना आजोबा धीरूभाई अंबानी, वडील मुकेश आणि आई नीता यांचा वारसा लाभला, हे उघडच आहे. परंतु, केवळ वारशाने एखादी व्यक्ती उद्योगक्षेत्रातील नेता होत नाही. स्वतःचे व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे असते. अनंत हे सगळ्यात वेगळे व्यक्तिमत्त्व आहे, ते त्या अर्थाने ! केवळ धन कमावणे हा त्यांचा उद्देश नाही. ते जगणे सुंदर करण्याच्या मागे लागले आहेत. एकच उदाहरण पुरेसे आहे:ब्राझीलच्या कटिंगा जंगलात विहार करणारा स्पीक मॅके प्रजातीचा पोपट जंगलात दिसेनासा झाला आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, हे त्यांना समजले. परदेशात एका राजपुत्राच्या व्यक्तिगत संग्रहालयात या नष्ट होत चाललेल्या पक्षी प्रजातीला नवे जीवन देण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. आज ब्राझीलच्या जंगलात स्पीक मॅके जातीचे ९० पेक्षा जास्त पोपट उडत आहेत. नैसर्गिक घरट्यात त्यांचे प्रजनन होते. अनंत हे गणपतीचे भक्त आहेत, त्यांच्या 'वनतारा' या प्रकल्पात हत्तींसाठी सर्वात मोठे पुनर्वसन केंद्र तयार झाले आहे. वनतारामध्ये ८० बिबटेही जन्माला आले असून, लवकरच त्यांना जंगलात सोडण्यात येईल.

मुंबईच्या सनफ्लॉवर नर्सरी स्कूलपासून अमेरिकेतील महाविद्यालयापर्यंत एकमेकांबरोबर राहण्यासाठी ज्यांनी सतत धडपड केली, असे १२ मित्र त्यांच्याबरोबर आहेत. विश्वविख्यात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत अनंत यांना प्रवेश मिळाला होता. काही मित्रांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला. या विद्यापीठात प्रवेश हे मोठमोठ्या कुटुंबांचे स्वप्न असते, परंतु 'एकत्रच शिकायचे' या हट्टावर हे सर्व मित्र हटून बसले. शेवटी सगळ्यांनी ब्राऊन विद्यापीठात एकत्र प्रवेश घेतला. इतकेच नव्हे, आजारपणामुळे अनंत एक वर्षभर कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत, तेव्हा बाकीच्या मित्रांनीही १ वर्ष थांबून घेतले. आजसुद्धा हे सगळे मित्र आठवड्यातून एकदा न चुकता भेटतात.

अनंत लहान असताना तृतीयपंथी समुदाय करत असलेली देवीची आरती त्यांना आवडली. अनंत आजही आरतीसाठी तिथे जातात. मालाडमध्ये १८ हजार तृतीयपंथियांची देखभाल करतात. त्यांच्यावर किमान खर्चात उपचार व्हावेत म्हणून ते देशभरात २०० हॉस्पिटल उघडणार आहेत. त्यातील दोन विदर्भात असणार आहेत. यासाठी तीन लाख कोटी देण्यात आले आहेत. दीड लाख कोटी रुपयात इस्पितळे उभी राहतील आणि उर्वरित निधीच्या व्याजात या इस्पितळांचे संचालन होईल. आजोबा धीरूभाई अंबानी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते देशभर शेकडो मंदिरे उभी करू इच्छितात. या मंदिरांमध्ये गुरुकुल, वाजवी दरात निवास आणि भोजनाच्या व्यवस्थेबरोबरच लग्नासाठी सभागृहही असेल.

अनंत हे उत्तम दूरदृष्टी असलेले उद्योग क्षेत्रातील अग्रणी नेते आहेत. त्यांना नवनवे तंत्रज्ञान अवगत आहे. व्यवहार-व्यवसाय आणि जीवनाचे बारकावे शिकण्यासाठी ते मुकेश अंबानी यांच्याबरोबर दररोज दोन तास घालवतात. आपल्या भावंडांशी त्यांचे अत्यंत दृढ अनुबंध आहेत. 'मी त्यांचा हनुमान आहे', असे ते स्वतःचे वर्णन करतात. देशातील कोट्यवधी लोकांना रोजगार पुरवणे हे मुकेशभाईचे स्वप्न आहे. रिलायन्स उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांची विद्यमान संख्या २५ लाख असून, ती १ कोटीपर्यंत नेण्यासाठी अनंत संपूर्ण क्षमता वापरून काम करत आहेत. 'कर्मचारी संख्येच्या बाबतीत रिलायन्सला जगातील अव्वल कंपनी बनविणे हे त्यांचे स्वप्न आहे. आपल्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसाला ते ही भेट त्यांना देऊ इच्छितात. 

महाराष्ट्रात यवतमाळ, विदर्भ भागात उद्योग सुरु करण्याचा आग्रह मी त्यांच्याकडे धरला. ते क्षणात म्हणाले, '१०-१२ एकरांचा एक भूखंड मला द्या. तिथे उभ्या राहणाऱ्या उद्योगातून हजारो लोकांना काम मिळेल.'

लोकमत समूह सिंगापूरनंतर लंडनमध्ये जागतिक आर्थिक परिषद आयोजित करणार असल्याचे समजल्यावर त्यांना विशेष आनंद झाला. या परिषदेला येण्याचे त्यांनी सहर्ष मान्य केले. 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार समारंभ'लोकमत'ने जामनगरमध्ये आयोजित केल्यास महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. जवळपास दोन तास चाललेल्या या चैतन्यदायी बैठकीत लोकमत माध्यमसमूहाचे संयुक्त प्रबंध संचालक, तसेच संपादकीय संचालक ऋषी दर्डा हेही उपस्थित होते. अनंत यांची स्मरणशक्ती अफाट आहे. गप्पांच्या ओघात त्यांनी मला एक आठवण करून दिली. ते जेव्हा सातव्या इयत्तेत होते, तेव्हा एका प्रदर्शनाच्या निमित्ताने मी त्यांच्या शाळेतील त्यांच्या स्टॉलवर गेलो होतो; तिथे त्यांनी मला एक अक्वेरियम दाखवले आणि मी त्याची प्रशंसाही केली होती; हे त्यांनी मला उत्साहाने सांगितले. त्याच शाळेत माझा नातू यशोवर्धनही शिकत होता. अनंत यांच्याशी झालेली ही भेट विशेष संस्मरणीय होती. मुकेशभाई, नीताभाभी यांनी अनंत यांना संस्कार आणि संस्कृती रसात न्हाऊ घातले आहे, हे नक्की. अनंत यांच्या रूपाने मानवतेने ओतप्रोत भरलेला, उत्तम दूरदृष्टी असलेला आणि सक्षम असा उद्योग क्षेत्रातील नेता त्यांनी देशाला दिला आहे. अनंत यांच्यासाठी मला मोहम्मद अली असार यांचा एक शेर आठवतो....

नई मंजिल, नया जादू, उजालाही उजालादूर तक इंसानियत का बोलबाला...

vijaydarda@lokmat.com  

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीRelianceरिलायन्स