शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:01 IST

देशातले वारे बदलत आहेत! म्हणजे भाजपचे वैचारिक वर्चस्व कमी झाले आहे का?- ती अतिशयोक्ती होईल! परंतु, तटबंदीला भेग पडली आहे, हे मात्र नक्की!

- योगेंद्र यादव (अध्यक्ष, स्वराज इंडिया, सदस्य, जय किसान आंदोलन)

जनमानसात होत असलेल्या बदलावर जनादेशाची मोहोर उमटेल काय? - नव्या वर्षात राजकारणातला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल. २०२३ हे संक्रमणाचे वर्ष आहे. २०२२ मध्ये उमटलेले ध्वनी आणि २०२४ची चाहूल यामध्ये अडकलेले हे वर्ष. या वर्षात सगळ्यांच्या नजरा एकाच प्रश्नावर खिळलेल्या असतील. २०२२ मध्ये जे राजकीय परिवर्तन सुरू झाले आहे ते २०२४ पर्यंत सत्तापरिवर्तनाचे स्वरूप घेईल काय?

उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपला मिळालेला मोठा विजय आणि पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशात भाजपच्या वाट्याला आलेला पराजय यापैकी कोणतीच घटना सरलेल्या वर्षातली सर्वात मोठी राजकीय घटना नव्हती. २०१४पासून ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये जय पराजय होत आला, त्याच प्रकारे याही निवडणुकांचे निकाल लागले. 

या वर्षातली सर्वात मोठी राजकीय घटना जर कुठली असेल तर ती ‘भारत जोडो’ यात्रा होय! या देशात गेली आठ वर्षे जे चालले आहे त्याला भारत जोडो यात्रेने आव्हान दिले. जनमानस घुसळून काढले. अर्थात, जनता मोदी राजवटीच्या विरोधात उभी ठाकली आहे किंवा भाजपचे वैचारिक वर्चस्व कमी झाले आहे असे इतक्यात म्हणणे अतिशयोक्तीचे होईल; परंतु किल्ल्याच्या तटबंदीला भेग पडली आहे, हे नक्की! ‘पप्पू’ नामक खोटे पोस्टर उखडले गेले असून त्याखाली दडलेले सत्य समोर येते आहे. 

‘भारत जोडो’ यात्रा आता अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे. आतापर्यंत जवळपास २८०० किलोमीटर अंतर पूर्ण केलेली ही पदयात्रा या महिन्याच्या अखेरपर्यंत  श्रीनगरपर्यंत जाईल.  आता उत्तर भारतातील राष्ट्रीय माध्यमांनाही नाइलाजाने या यात्रेच्या बातम्या दाखवाव्या लागत आहेत. राहुल गांधी यांच्याकडे दुर्लक्ष करणे आता पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही.  श्रीनगरमध्ये ही यात्रा पूर्ण तर होईल; पण जनतेशी थेट जोडून घेण्याचा हा सिलसिला त्यानंतरही चालू राहील. या यात्रेला एका सलग मोहिमेचे रूप देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांना गती मिळाली तर येणारे वर्षे भाजपला जड जाईल हे नक्की!

सध्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडे कोणताही उपाय नाही. बेकारी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरतोच आहे. एकीकडे गरिबांना चूल पेटवणे मुश्कील झाले आहे, तर दुसरीकडे ‘हम दो’ सरकारच्या ‘हमारे दो’ उद्योगपतींचे साम्राज्य विस्तारत चालले आहे. चीन आक्रमक पवित्रा घेत आहे. सामरिक आणि विदेश नीतीतील सरकारचे अपयश सैन्यदलाच्या बहादुरीआड लपवणे कठीण होत चालले आहे. या सरकारच्या राजवटीत चीन आपली ९०० किलोमीटर जमीन गिळंकृत करून बसला, हे सत्य लपवणे हर प्रकारे प्रयत्न करूनसुद्धा कठीण होत आहे. 

अगदी बारकाईने पाहाल, तर तुमच्या लक्षात येईल, की बदलाची हवा अतिशय संथपणे वाहू लागली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणाम केवळ काही प्रदेश आणि वर्गापर्यंत मर्यादित आहे, देशाच्या शेवटच्या घरापर्यंत या यात्रेचा संदेश पोहोचलेला नाही; हे तर खरेच! जनमताच्या सर्वेक्षणात भाजपला बहुमत मिळते आहे, असाच निष्कर्ष निघेल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे असेच दिसेल. परंतु आता  इथून पुढचा रस्ता कठीण आहे.  पत्त्यांचा बंगला कधीही कोसळू शकतोच!

या वर्षी होणाऱ्या नऊ विधानसभा निवडणुकांत वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा काहीसा अंदाज लागेल. भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि काँग्रेस व राहुल गांधी यांची बदलती प्रतिमा या समीकरणाचा अंदाज बांधता येईल. पहिली मोठी परीक्षा या वर्षी एप्रिल-मे मध्ये कर्नाटकात होईल. या राज्यात भाजप आजवर संपूर्ण बहुमत मिळवू शकलेला नाही. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने येथे नेहमीच ‘ऑपरेशन कमळ’सारख्या चोर दरवाजाचा आधार घेतला आहे. कर्नाटकातील भाजप सरकारचा निकम्मेपणा  पाहता काँग्रेसला तिथे मोठी संधी आहे. कधी हिजाब तर कधी अजानच्या बहाण्याने भाजपने राज्यात ध्रुवीकरण सुरू केलेच आहे. ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’ उघडण्याची राहुल गांधी यांची घोषणा एका प्रभावी राजकीय समीकरणात बदलता येते का, याची परीक्षा कर्नाटकातील निवडणुकीत होईल. 

वर्षअखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणात विधानसभा निवडणुका होतील. काँग्रेसला राजस्थानात किंवा कमीत कमी छत्तीसगढमध्ये आपली सत्ता वाचवावी लागेल आणि मध्य प्रदेशमध्ये जोडतोडीच्या आधारावर आलेले भाजपचे सरकार लोकांना मान्य नाही हे सिद्ध करावे लागेल. तेलंगणात भाजपची परीक्षा असेल; कारण देशातले हे एकमेव राज्य असेल जेथे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ साली मिळालेल्या जागांमध्ये भर पडण्याची उमेद भाजप बाळगू शकतो. 

शेवटी एक इशारा देऊन ठेवतो : जनमतातून जनादेशाची यात्रा सहज, स्वाभाविक आणि लोकशाही पद्धतीने पार पडेल, तेव्हाच उपरोक्त विश्लेषण लागू असेल! राजकीय अभ्यासकांना याची खात्री नाही.  जनमानसाची दिशाभूल करण्याचे किंवा जनादेशाचे थेट अपहरणच करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी बऱ्याच जणांना शंका आहे. आपला देश अशा दुर्घटनेपासून वाचावा!!.. २०२३साठी याहून वेगळी हार्दिक शुभेच्छा कोणती असू शकते?

yyopinion@gmail.com

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी