शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

बाजार समित्यांच्या निकालांनी घालून दिले धडे!

By किरण अग्रवाल | Updated: May 7, 2023 12:32 IST

APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनी एकूणच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले.

 - किरण अग्रवाल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर जरी लढल्या गेल्या नसल्या तरी, त्यात बहुसंख्य ठिकाणी आजी-माजी आमदारांनी घेतलेला थेट सहभाग पाहता यातून त्यांची आगामी निवडणुकांची रंगीत तालीमच होऊन गेल्याचे म्हणता यावे. 

लांब पल्ल्याचे राजकारण करायचे तर वेळोवेळी आपली उपयोगिता व प्रभाव सिद्ध करावा लागत असतो. यात उपयोगिता जशी दुसऱ्यासाठी कामी येणे अपेक्षित असते तसेच प्रभावही इतरांसाठी उपयोगी पडणे गरजेचे असते. तसे घडून आले तर जनमानसावर आपोआपच प्रभाव पडल्याखेरीज राहत नाही व नाही घडले तर सुधारणेची गरज तरी लक्षात येऊन जाते. बाजार समित्यांच्या निवडणुकांनी याचसाठीची संधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मांडवाखालून जाऊ इच्छिणाऱ्यांना दिली म्हणायचे, कारण मी मी म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती व त्यांच्या पक्षांनाही या निवडणूक निकालांनी बरेच धडे घालून दिले आहेत. 

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनी एकूणच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले. एकीकडे राज्यातील राजकीय धुमशान सुरू असताना दुसरीकडे या निवडणुकांच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील वर्चस्ववादाचे राजकारण रंगलेले बघावयास मिळाले. राजकीय पक्ष यात थेट सहभागी नव्हते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी पक्षानुकुल आघाड्या करीत तर काही ठिकाणी पक्ष विरहित हातमिळवणी करीत निवडणुका लढविल्या. त्यांच्या पाठीशी आजी-माजी आमदारांनी आपापले बळ उभे केले होते, त्यामुळे जो काही निकाल आला तो संबंधितांनाही पथदर्शक ठरून गेला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक प्रचारात तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याच होत्या, परंतु आता जय पराजयावरूनही राजकारण पेटले आहे ज्याची चुणूक चिखलीत दिसून येते आहे. तेथील आमदार सौ. श्वेता महाले व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात यानिमित्ताने सुरू झालेल्या कलगीतुऱ्यातून आगामी निवडणुकांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट व्हावे. कार्यकर्त्यांच्या जय पराजयाचे सुख दुःख वाटून घेण्याऐवजी नेते जर आपलाच अहम कुरवाळत आपल्याच राजकीय लढायांवर फोकस करणार असतील तर कार्यकर्त्यांचे बळ त्यांच्या पाठी टिकून कसे राहणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणारा आहे. 

राज्यातील महाआघाडीच्या प्रयोगानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्येही काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) नेते कार्यकर्ते एकत्र आलेले बघावयास मिळाले व जेथे जेथे असे झाले तेथे अधिकतर ठिकाणी त्यांना यश लाभल्याचेही दिसून आले; ही बाब त्या सर्व संबंधितांचा उत्साह दुणावणारी तर भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांना अलर्ट करणारी आहे. अर्थात आतापर्यंत फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहणाऱ्या बाजार समित्यांमध्ये यंदा आणखी काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही आपली जागा बनविली हेही नसे थोडके. अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही काही ठिकाणी नशीब आजमावून बाजार समित्यांमध्ये प्रवेश मिळवला. 

अकोला जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे तर, अकोल्यात राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या नेते कार्यकर्त्यांसमवेत भाजपाचे कार्यकर्ते  आलेत; तर बार्शीटाकळीतही तशीच साथ बघावयास मिळाली. बाळापुरात भाजपा व वंचितचे नेते सोबत होते तर तेल्हाऱ्यात वंचित व महाआघाडी सोबत होती, म्हणजे येथे पक्षविरहित पॅनलच्या माध्यमातून 'सबका साथ, सबका विकास' दिसून आला म्हणायचे. यात आ. रणधीर सावरकर व आ. नितीन देशमुख यांनीही आपापल्या कार्यकर्त्यांसाठी ताकद पणाला लावलेली दिसून आली, मात्र दर्यापुरात सहभाग नोंदवणारे आ. प्रकाश भारसाकळे अकोटात तटस्थ राहिले, तर आ. हरीश पिंपळे यांचाही मूर्तिजापुरात थेट सहभाग दिसून आला नाही. सर्वांशीच सारखी जवळीक व तितकीच दुरताही, अशा भूमिकेतून आपली वाट निर्धोक राखण्याचा प्रयत्न यामागे असावा. 

वाशिम जिल्ह्यात 6 पैकी 4 बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार अमित झनक यांच्यासह त्यांच्या सहकारींचे वजन वाढणे स्वाभाविक आहे. मालेगाव, मंगरूळपीर, मानोऱ्यात आघाडीने एकहाती विजय मिळवला. रिसोडमध्ये ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांना सत्ता राखण्यासाठी बरेच झुंजावे लागले. अलीकडेच त्यांनी भाजपा प्रवेश केलेला असल्याने या पक्षासाठी ही बाजार समिती बोट धरायला हाती आली खरी, परंतु जिल्ह्यातील एकूण निकाल पाहता भाजपा आमदार राजेंद्र पाटणी व लखन मलिक यांना येथे करेक्शन करावे लागेल. 

बुलढाण्यातही 10 पैकी 7 बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. आ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना हे निकाल सुखावणारे आहेत. आमदार राजेश एकडे यांनी मलकापूर गमावले असले तरी, होमपीच नांदुरा राखले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांनी बुलढाण्यात करिष्मा कायम राखला तर खा. प्रतापराव जाधव यांनी त्यांचे मेहकर, लोणार राखले, मात्र यंदा त्यांचाही कस लागला. चैनसुख संचेती यांनी मलकापूर एकहाती राखून आपण पुढील लढाईसाठी सज्ज असल्याचा जणू संदेशच दिला आहे. जळगाव जामोद, शेगाव, खामगाव व चिखलीतील निकाल पाहता भाजपाचे आमदार त्रयी डॉ संजय कुटे, आकाश फुंडकर व श्वेता महाले यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. 

सारांशात, बाजार समितीच्या माध्यमातून संबंधितांची आगामी निवडणुकांची रंगीत तालीमच होऊन गेली आहे. हेच वा असेच यापुढेही घडून येईल असे म्हणता येऊ नये, कारण प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात; परंतु या निकालाचे कल बघता संबंधितांना यातून धडा नक्कीच घेता यावा.