शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बाजार समित्यांच्या निकालांनी घालून दिले धडे!

By किरण अग्रवाल | Updated: May 7, 2023 12:32 IST

APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनी एकूणच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले.

 - किरण अग्रवाल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर जरी लढल्या गेल्या नसल्या तरी, त्यात बहुसंख्य ठिकाणी आजी-माजी आमदारांनी घेतलेला थेट सहभाग पाहता यातून त्यांची आगामी निवडणुकांची रंगीत तालीमच होऊन गेल्याचे म्हणता यावे. 

लांब पल्ल्याचे राजकारण करायचे तर वेळोवेळी आपली उपयोगिता व प्रभाव सिद्ध करावा लागत असतो. यात उपयोगिता जशी दुसऱ्यासाठी कामी येणे अपेक्षित असते तसेच प्रभावही इतरांसाठी उपयोगी पडणे गरजेचे असते. तसे घडून आले तर जनमानसावर आपोआपच प्रभाव पडल्याखेरीज राहत नाही व नाही घडले तर सुधारणेची गरज तरी लक्षात येऊन जाते. बाजार समित्यांच्या निवडणुकांनी याचसाठीची संधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मांडवाखालून जाऊ इच्छिणाऱ्यांना दिली म्हणायचे, कारण मी मी म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती व त्यांच्या पक्षांनाही या निवडणूक निकालांनी बरेच धडे घालून दिले आहेत. 

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनी एकूणच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले. एकीकडे राज्यातील राजकीय धुमशान सुरू असताना दुसरीकडे या निवडणुकांच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील वर्चस्ववादाचे राजकारण रंगलेले बघावयास मिळाले. राजकीय पक्ष यात थेट सहभागी नव्हते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी पक्षानुकुल आघाड्या करीत तर काही ठिकाणी पक्ष विरहित हातमिळवणी करीत निवडणुका लढविल्या. त्यांच्या पाठीशी आजी-माजी आमदारांनी आपापले बळ उभे केले होते, त्यामुळे जो काही निकाल आला तो संबंधितांनाही पथदर्शक ठरून गेला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक प्रचारात तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याच होत्या, परंतु आता जय पराजयावरूनही राजकारण पेटले आहे ज्याची चुणूक चिखलीत दिसून येते आहे. तेथील आमदार सौ. श्वेता महाले व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात यानिमित्ताने सुरू झालेल्या कलगीतुऱ्यातून आगामी निवडणुकांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट व्हावे. कार्यकर्त्यांच्या जय पराजयाचे सुख दुःख वाटून घेण्याऐवजी नेते जर आपलाच अहम कुरवाळत आपल्याच राजकीय लढायांवर फोकस करणार असतील तर कार्यकर्त्यांचे बळ त्यांच्या पाठी टिकून कसे राहणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणारा आहे. 

राज्यातील महाआघाडीच्या प्रयोगानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्येही काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) नेते कार्यकर्ते एकत्र आलेले बघावयास मिळाले व जेथे जेथे असे झाले तेथे अधिकतर ठिकाणी त्यांना यश लाभल्याचेही दिसून आले; ही बाब त्या सर्व संबंधितांचा उत्साह दुणावणारी तर भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांना अलर्ट करणारी आहे. अर्थात आतापर्यंत फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहणाऱ्या बाजार समित्यांमध्ये यंदा आणखी काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही आपली जागा बनविली हेही नसे थोडके. अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही काही ठिकाणी नशीब आजमावून बाजार समित्यांमध्ये प्रवेश मिळवला. 

अकोला जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे तर, अकोल्यात राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या नेते कार्यकर्त्यांसमवेत भाजपाचे कार्यकर्ते  आलेत; तर बार्शीटाकळीतही तशीच साथ बघावयास मिळाली. बाळापुरात भाजपा व वंचितचे नेते सोबत होते तर तेल्हाऱ्यात वंचित व महाआघाडी सोबत होती, म्हणजे येथे पक्षविरहित पॅनलच्या माध्यमातून 'सबका साथ, सबका विकास' दिसून आला म्हणायचे. यात आ. रणधीर सावरकर व आ. नितीन देशमुख यांनीही आपापल्या कार्यकर्त्यांसाठी ताकद पणाला लावलेली दिसून आली, मात्र दर्यापुरात सहभाग नोंदवणारे आ. प्रकाश भारसाकळे अकोटात तटस्थ राहिले, तर आ. हरीश पिंपळे यांचाही मूर्तिजापुरात थेट सहभाग दिसून आला नाही. सर्वांशीच सारखी जवळीक व तितकीच दुरताही, अशा भूमिकेतून आपली वाट निर्धोक राखण्याचा प्रयत्न यामागे असावा. 

वाशिम जिल्ह्यात 6 पैकी 4 बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार अमित झनक यांच्यासह त्यांच्या सहकारींचे वजन वाढणे स्वाभाविक आहे. मालेगाव, मंगरूळपीर, मानोऱ्यात आघाडीने एकहाती विजय मिळवला. रिसोडमध्ये ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांना सत्ता राखण्यासाठी बरेच झुंजावे लागले. अलीकडेच त्यांनी भाजपा प्रवेश केलेला असल्याने या पक्षासाठी ही बाजार समिती बोट धरायला हाती आली खरी, परंतु जिल्ह्यातील एकूण निकाल पाहता भाजपा आमदार राजेंद्र पाटणी व लखन मलिक यांना येथे करेक्शन करावे लागेल. 

बुलढाण्यातही 10 पैकी 7 बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. आ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना हे निकाल सुखावणारे आहेत. आमदार राजेश एकडे यांनी मलकापूर गमावले असले तरी, होमपीच नांदुरा राखले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांनी बुलढाण्यात करिष्मा कायम राखला तर खा. प्रतापराव जाधव यांनी त्यांचे मेहकर, लोणार राखले, मात्र यंदा त्यांचाही कस लागला. चैनसुख संचेती यांनी मलकापूर एकहाती राखून आपण पुढील लढाईसाठी सज्ज असल्याचा जणू संदेशच दिला आहे. जळगाव जामोद, शेगाव, खामगाव व चिखलीतील निकाल पाहता भाजपाचे आमदार त्रयी डॉ संजय कुटे, आकाश फुंडकर व श्वेता महाले यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. 

सारांशात, बाजार समितीच्या माध्यमातून संबंधितांची आगामी निवडणुकांची रंगीत तालीमच होऊन गेली आहे. हेच वा असेच यापुढेही घडून येईल असे म्हणता येऊ नये, कारण प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात; परंतु या निकालाचे कल बघता संबंधितांना यातून धडा नक्कीच घेता यावा.