शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

बाजार समित्यांच्या निकालांनी घालून दिले धडे!

By किरण अग्रवाल | Updated: May 7, 2023 12:32 IST

APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनी एकूणच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले.

 - किरण अग्रवाल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर जरी लढल्या गेल्या नसल्या तरी, त्यात बहुसंख्य ठिकाणी आजी-माजी आमदारांनी घेतलेला थेट सहभाग पाहता यातून त्यांची आगामी निवडणुकांची रंगीत तालीमच होऊन गेल्याचे म्हणता यावे. 

लांब पल्ल्याचे राजकारण करायचे तर वेळोवेळी आपली उपयोगिता व प्रभाव सिद्ध करावा लागत असतो. यात उपयोगिता जशी दुसऱ्यासाठी कामी येणे अपेक्षित असते तसेच प्रभावही इतरांसाठी उपयोगी पडणे गरजेचे असते. तसे घडून आले तर जनमानसावर आपोआपच प्रभाव पडल्याखेरीज राहत नाही व नाही घडले तर सुधारणेची गरज तरी लक्षात येऊन जाते. बाजार समित्यांच्या निवडणुकांनी याचसाठीची संधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मांडवाखालून जाऊ इच्छिणाऱ्यांना दिली म्हणायचे, कारण मी मी म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती व त्यांच्या पक्षांनाही या निवडणूक निकालांनी बरेच धडे घालून दिले आहेत. 

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनी एकूणच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले. एकीकडे राज्यातील राजकीय धुमशान सुरू असताना दुसरीकडे या निवडणुकांच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील वर्चस्ववादाचे राजकारण रंगलेले बघावयास मिळाले. राजकीय पक्ष यात थेट सहभागी नव्हते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी पक्षानुकुल आघाड्या करीत तर काही ठिकाणी पक्ष विरहित हातमिळवणी करीत निवडणुका लढविल्या. त्यांच्या पाठीशी आजी-माजी आमदारांनी आपापले बळ उभे केले होते, त्यामुळे जो काही निकाल आला तो संबंधितांनाही पथदर्शक ठरून गेला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक प्रचारात तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याच होत्या, परंतु आता जय पराजयावरूनही राजकारण पेटले आहे ज्याची चुणूक चिखलीत दिसून येते आहे. तेथील आमदार सौ. श्वेता महाले व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात यानिमित्ताने सुरू झालेल्या कलगीतुऱ्यातून आगामी निवडणुकांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट व्हावे. कार्यकर्त्यांच्या जय पराजयाचे सुख दुःख वाटून घेण्याऐवजी नेते जर आपलाच अहम कुरवाळत आपल्याच राजकीय लढायांवर फोकस करणार असतील तर कार्यकर्त्यांचे बळ त्यांच्या पाठी टिकून कसे राहणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणारा आहे. 

राज्यातील महाआघाडीच्या प्रयोगानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्येही काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) नेते कार्यकर्ते एकत्र आलेले बघावयास मिळाले व जेथे जेथे असे झाले तेथे अधिकतर ठिकाणी त्यांना यश लाभल्याचेही दिसून आले; ही बाब त्या सर्व संबंधितांचा उत्साह दुणावणारी तर भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांना अलर्ट करणारी आहे. अर्थात आतापर्यंत फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहणाऱ्या बाजार समित्यांमध्ये यंदा आणखी काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही आपली जागा बनविली हेही नसे थोडके. अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही काही ठिकाणी नशीब आजमावून बाजार समित्यांमध्ये प्रवेश मिळवला. 

अकोला जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे तर, अकोल्यात राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या नेते कार्यकर्त्यांसमवेत भाजपाचे कार्यकर्ते  आलेत; तर बार्शीटाकळीतही तशीच साथ बघावयास मिळाली. बाळापुरात भाजपा व वंचितचे नेते सोबत होते तर तेल्हाऱ्यात वंचित व महाआघाडी सोबत होती, म्हणजे येथे पक्षविरहित पॅनलच्या माध्यमातून 'सबका साथ, सबका विकास' दिसून आला म्हणायचे. यात आ. रणधीर सावरकर व आ. नितीन देशमुख यांनीही आपापल्या कार्यकर्त्यांसाठी ताकद पणाला लावलेली दिसून आली, मात्र दर्यापुरात सहभाग नोंदवणारे आ. प्रकाश भारसाकळे अकोटात तटस्थ राहिले, तर आ. हरीश पिंपळे यांचाही मूर्तिजापुरात थेट सहभाग दिसून आला नाही. सर्वांशीच सारखी जवळीक व तितकीच दुरताही, अशा भूमिकेतून आपली वाट निर्धोक राखण्याचा प्रयत्न यामागे असावा. 

वाशिम जिल्ह्यात 6 पैकी 4 बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार अमित झनक यांच्यासह त्यांच्या सहकारींचे वजन वाढणे स्वाभाविक आहे. मालेगाव, मंगरूळपीर, मानोऱ्यात आघाडीने एकहाती विजय मिळवला. रिसोडमध्ये ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांना सत्ता राखण्यासाठी बरेच झुंजावे लागले. अलीकडेच त्यांनी भाजपा प्रवेश केलेला असल्याने या पक्षासाठी ही बाजार समिती बोट धरायला हाती आली खरी, परंतु जिल्ह्यातील एकूण निकाल पाहता भाजपा आमदार राजेंद्र पाटणी व लखन मलिक यांना येथे करेक्शन करावे लागेल. 

बुलढाण्यातही 10 पैकी 7 बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. आ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना हे निकाल सुखावणारे आहेत. आमदार राजेश एकडे यांनी मलकापूर गमावले असले तरी, होमपीच नांदुरा राखले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत यांनी बुलढाण्यात करिष्मा कायम राखला तर खा. प्रतापराव जाधव यांनी त्यांचे मेहकर, लोणार राखले, मात्र यंदा त्यांचाही कस लागला. चैनसुख संचेती यांनी मलकापूर एकहाती राखून आपण पुढील लढाईसाठी सज्ज असल्याचा जणू संदेशच दिला आहे. जळगाव जामोद, शेगाव, खामगाव व चिखलीतील निकाल पाहता भाजपाचे आमदार त्रयी डॉ संजय कुटे, आकाश फुंडकर व श्वेता महाले यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. 

सारांशात, बाजार समितीच्या माध्यमातून संबंधितांची आगामी निवडणुकांची रंगीत तालीमच होऊन गेली आहे. हेच वा असेच यापुढेही घडून येईल असे म्हणता येऊ नये, कारण प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात; परंतु या निकालाचे कल बघता संबंधितांना यातून धडा नक्कीच घेता यावा.