शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा-सांडपाणी व्यवस्थापनाची दुर्दशा; पैसे ओरबाडण्याच्या हावरट पुरात बुडाली भारतीय शहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:33 IST

बदनाम सार्वजनिक बांधकाम खाते आता ‘सार्वजनिक विनाश खाते’ झाले आहे.

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार

यंदाच्या मे महिन्यात झालेल्या पावसाने दिल्ली, मुंबई, बंगळुरू या शहरांना फटके मारून जागे केले आहे. शहरातील रस्त्यांनी उग्र नद्यांचे स्वरूप धारण केले होते. पाण्याखाली गेलेली घरे वाहून गेली. कमकुवत झाडे रस्त्यावर उभ्या मोटारींवर कोसळली. माणसांचे बळी गेले. बंगळुरूमध्ये तर एक तरुण मुलगा बसमधून खाली उतरला तो थेट मॅनहोलमधून गटारात पडून वाहून गेला. दिल्ली-मुंबईत हलकल्लोळ झाला. बंगळुरूमधील मुसळधार पावसाने आयटी कॉरिडॉरची दैना उडवली. ‘तंत्रज्ञानाचे शहर गटारीत बुडते आहे’, असे आक्रंदन ‘एक्स’वर प्रकटले.

मुंबई शहर एका सेकंदात अब्जावधी डॉलर्स या खंडातून त्या खंडात पाठवत असते. परंतु, तेथे अतिमहागड्या घरात राहणारे अब्जाधीश पावसाळ्यात रस्ता ओलांडू शकत नाहीत. दिल्ली शहर तीन चौरस किलोमीटरच्या जागेत जी-२० शिखर बैठका घेऊ शकते. परंतु, तिथल्या रहिवाशांना भूमिगत गटारीतून वर आलेल्या पाण्याचा सामना करावा लागतो. 

बंगळुरूमधील वृषभावती नदी एक काळा विषारी नाला झाला आहे. शहर दररोज १,८०० कोटी  लिटर इतके सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर टाकत असते. ८३ टक्के पाणी या नदीत सोडले जाते. हे शहर जगाशी आपल्याला जोडून देते. पण, निराशेपासून स्वतःला बाजूला करू शकत नाही.  भारतातील ७० टक्के शहरात कचरा विल्हेवाट   आणि सांडपाणी निस्सारणाची चांगली व्यवस्था  नाही. रस्ते आणि इतर सुविधा देण्याची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम खाते ‘सार्वजनिक विनाश खाते’ झाले आहे. 

भारतातील शहरी सांडपाणी व्यवस्था दुर्लक्षामुळे निकामी ठरत आहे. दिल्ली शहर रोज ३८ कोटी लिटर सांडपाणी निर्माण करते. त्यातील फक्त १२.५ कोटी लिटर पाण्यावर प्रक्रिया होते. स्वाभाविकच यमुनेला त्याचा फटका बसतो. शहरात २,०६४ किलोमीटरच्या गटारी आहेत. पण, त्या निम्मीच गरज भागवतात. ३.८० कोटींची लोकसंख्या असलेले शहर डोळ्यासमोर ठेवून व्यवस्था झालेलीच नाही. मुंबईत २१ कोटी लिटर सांडपाण्यापैकी फक्त निम्म्यावरच प्रक्रिया होते. आयआयटीने केलेल्या एका पाहणीमध्ये मुंबईच्या गटार व्यवस्थेचे वर्णन २.२ कोटी लोकांसाठी पुरेशी नसलेली १,८६० सालची जुनाट व्यवस्था असे केले. २०२४  साली बनावट कंपन्यांना १,२०० कोटींची जल शुद्धीकरणाची कंत्राटे दिली गेली. ५५  टक्के गटारी तुंबलेल्या राहिल्या. पुराचे पाणी आणि सांडपाणी एकत्र येणे, ही सर्वांत भयानक गोष्ट आहे.   कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. भविष्य हरवले आहे. केवळ यंत्रणा निकामी ठरल्याने हे झाले, याचे दुःख मोठे आहे. भारत देश प्रगतीच्या शर्यतीत आहे. नवी विमानतळे, महामार्ग, स्मार्ट सिटीज यामुळे नैसर्गिक बचावाचे मार्ग गिळंकृत केले गेले आहेत.  

याच्या उलट चित्र जगात इतरत्र पाहायला मिळते. टोकियोतील भूमिगत जलाशय आणि सच्छिद्र पादचारी मार्ग वर्षाला पडणाऱ्या १,५००  मिलिमीटर पावसाचे ५० टक्के पाणी रिचवितात. त्यामुळे पूर येत नाही. न्यूयॉर्कमध्ये १०,६००  किलोमीटरची भुयारी गटारे ठीक काम देतात. ५० कोटी लिटर सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. सिंगापूर तसेच जर्मनीतील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थाही वाखाणण्याजोगी आहे. जपानमध्ये ७०  टक्के कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया होते, तर भारतात ८० टक्के कचरा जमिनीवर साठवला जातो. इंदूरमधील कचरा व्यवस्थापन व्यवस्था तसेच मेघालयातील उमंगोट योजना भारतही बदलू शकतो, हे दाखवून देते. पण त्यासाठी निर्धार हवा. 

भारताने या विषयात आता अक्कल हुशारीने तत्काळ हस्तक्षेप केला पाहिजे. सांडपाणी आणि पुराचे पाणी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली पाहिजे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काटेकोर सार्वजनिक परीक्षण झाले पाहिजे. सिंगापूर किंवा जपानची कचरा विल्हेवाट व्यवस्था आपल्याकडे राबवता येईल. मिठी आणि तिच्या भगिनींना वाचवण्यासाठी नदी संरक्षकपट्टे तयार केले गेले पाहिजेत. विमानतळ आणि महामार्गांसाठी सखल जागेत भराव घालणे थांबवले पाहिजे. चेन्नईतला पल्लीकरनाई जलाशय पूर्ववत आणला पाहिजे. नमामि गंगे प्रकल्पाचेही पुनर्निरीक्षण झाले पाहिजे. भ्रष्ट कंत्राटदारांना आणि त्याच्या राजकीय तसेच नोकरशाहीतील पाठीराख्यांना तुरुंगात धाडले पाहिजे.  थातूरमातूर उपाय करणे थांबवून मूलगामी कृतीनेच या शोकांतिकेची लाट थोपवता येईल.

टॅग्स :RainपाऊसCorruptionभ्रष्टाचार