शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

शंख वाजला, भान ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 11:18 IST

"राजकारणाचा चिखल झाला आहे. याचमुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान पवित्र कर्तव्य वाटावे, ही भावना रुजविण्याची जबाबदारी राजकीय पक्ष, नेत्यांवर आहे. तिचे भान ठेवले गेलेच पाहिजे."

महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेची रणदुदुंभी वाजली आहे. दिवाळीपर्यंत जागावाटप, उमेदवारी वगैरे माहाैल राहील. दिवाळीनंतरचे पंधरा दिवस प्रत्यक्ष निवडणूक प्रचार होईल. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील महायुती ताकदीने रिंगणात उतरली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अतिआत्मविश्वासात राहिलेले कार्यकर्ते कामाला लागले आहेत. वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेला एखादा विद्यार्थी परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाचा रट्टा मारून पेपर सोडवतो, तशा अवस्थेत महायुती सरकार गेले चार महिने आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला धक्का दिला. त्याची कारणे समोर येताच ज्या ज्या घटकांची स्पष्ट नाराजी दिसली त्यांना खुश करण्यासाठी पावले उचलली गेली. लोकसभेवेळी जातीपातीचे मुद्दे ऐरणीवर असल्यामुळे एकेक समाज विचारात घेऊन महामंडळांचे घाऊक वाटप करण्यात आले. तरुण मतदार बेरोजगारीच्या मुद्द्यावर नाराज असल्याने त्यांच्यासाठी काही तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना जाहीर केल्या गेल्या. महागाईमुळे त्रस्त महिलांना खुश करण्यासाठी तसेच महिलांची मतेच पुन्हा सत्तेचे सिंहासन मिळवून देऊ शकत असल्याने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणली.

राज्याच्या तिजोरीचा अजिबात विचार न करता समोर दिसेल त्या प्रत्येक घटकाला भरपूर काही देण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या सगळ्या योजनांचा जोरदार प्रचारही करण्यात आला. लोकसभेतील खड्डा भरून काढण्यासाठी सत्ताधारी महायुती झटत असताना महाविकास आघाडीकडून लोकसभेतील यश कायम ठेवण्याचा निर्धार कायम आहे. तसे पाहता लोकसभेत ३१ जागा जिंकल्यामुळे महाविकास आघाडीत बऱ्यापैकी शैथिल्य आले होते. आता सत्ता आपलीच आहे, केवळ निकाल बाकी आहे, असे समजून आघाडीचे नेते मुख्यमंत्रिपदावरून शह-काटशहात गुंतले होते. जमिनीपासून चार बोटे अंतरावर चालणारा आघाडीचा रथ जमिनीवर टेकविला तो हरयाणाच्या निकालाने. हमखास विजयाची खात्री असलेल्या हरयाणात भाजपच्या सूक्ष्म नियोजनाने काँग्रेसचा म्हणजे देशपातळीवर ‘इंडिया आघाडी’चा व महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा स्वप्नभंग केला. नेत्यांची भाषा लगेच बदलली. नव्याने डावपेच तयार करण्यासाठी बैठकांवर बैठका होऊ लागल्या.

आता बहिणींचे प्रेम व सरकारच्या लाभाच्या योजनांवर मदार असलेली महायुती आणि लोकसभेप्रमाणेच जनमताचा काैल आपल्याकडे ठेवण्यासाठी झटणारी महाविकास आघाडी यांच्यात महाराष्ट्रातील सत्तेसाठी मुख्य सामना होत आहे. या दोन आघाड्यांमध्ये मिळून सहा पक्ष ही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे जागावाटप ही दोन्ही फळ्यांसाठी कसोटी असेल. अर्थातच, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असणाऱ्यांची संख्या मोठी असेल. त्याशिवाय बच्चू कडू, युवराज संभाजीराजे, राजू शेट्टी आदींची परिवर्तन महाशक्ती आघाडी, ॲड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी व राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे आणखी काही पक्ष लढतीत असतील. परिणामी, सगळीकडे बहुरंगी लढती होतील. थोडक्यात, महाराष्ट्रात राजकीय महाभारत घडू पाहत आहे. पण त्या लढाईत कुरुक्षेत्रावर एकमेकांविरुद्ध दिवसा लढणारेदेखील सूर्यास्तानंतर युद्ध थांबल्यावर एकमेकांना भेटत होते, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची गाैरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा केवळ महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन पुढे चालवता येणार नाही. केवळ भूतकाळावर या परंपरेचे पालनपोषण होत नाही. ती वर्तमानातही जपली जावी, अशी मतदारांची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षांत ती अपेक्षा पार धुळीला मिळाली आहे.

आपण ज्यांच्या विरोधात अनर्गळ वक्तव्ये करीत आहोत त्यांची उंची, त्यांचा सार्वजनिक जीवनातील कालखंड याबद्दल विचार न करता बोलणाऱ्या, तोंड उघडले की घाणच बाहेर पडते अशा वाचाळवीरांची टोळीच तयार झाली आहे. हे केवळ बोलघेवडे किंवा वाचाळवीर नाहीत. त्या पातळीच्या खाली ते कधीच घसरले आहेत. भूतकाळातील अनेक प्रसंग असे आहेत की, नेत्यांनी विरोधकांना सन्मानाने वागविले, विरोधात प्रचारासाठी आले असतानाही त्यांची काळजी घेतली. अगदी ज्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढतो आहोत त्यांच्याच घरी मुक्कामाचीही उदाहरणे आहेत. आता मात्र राजकीय स्पर्धेची जागा शत्रुत्वाने घेतली आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे. याचमुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान पवित्र कर्तव्य वाटावे, ही भावना रुजविण्याची जबाबदारी राजकीय पक्ष, नेत्यांवर आहे. तिचे भान ठेवले गेलेच पाहिजे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024