शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

बाबूजींनी घेतलेले मोठे निर्णय राज्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी उपयोगी ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 11:42 IST

मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या विकासावर दीर्घ परिणाम करणारी ठरली. फलोत्पादन, मत्स्योत्पादन, रेशीम उत्पादन, पामतेल, रबर उद्योग, काजू लागवड, फळप्रक्रिया उद्योग यावर भर दिला पाहिजे, हा त्यांचा विचार द्रष्टेपणाचा होता.

देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र -

विलक्षण द्रष्टेपणाचा संगम म्हणजे बाबूजी, अर्थात जवाहरलालजी दर्डा. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव होता आणि ज्यांचा आदरपूर्ण उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही, असे बाबूजी. शेती, पत्रकारिता आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये अधिकाराने वावरणारे बाबूजी हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. हिंदीशी ममत्व आणि मराठीशी जन्माचे नाते असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने ‘लोकमत’ हे वृत्तपत्र अविश्रांत कष्टाने मोठे केले.  ‘लोकमत’चे यश हे निव्वळ व्यावसायिक नव्हे,  तर ते बाबूजींच्या संस्कारांचे आणि भूमिकेचेही यश आहे.  मंत्रिमंडळात १७ वर्षे राहिल्यानंतरही बाबूजींनी सरकार किंवा मंत्रिपद आणि पत्रकारिता यांची सरमिसळ कधीच होऊ दिली नाही. राष्ट्रीय विचारप्रवाह आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा त्यांनी बापूजी अणेंकडून घेतला आणि तो जपण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ‘लोकमत’ या नावाला लाभलेल्या लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादाचा विसर त्यांनी क्षणभरही  पडू दिला नाही. बाबूजींची दूरदृष्टी, त्यांचे कष्ट आणि पत्रकारितेतील समर्पण अशी विविध रूपे डोळ्यांपुढे उभी राहतात. प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्व, भेदाभेद न करणारे आणि मंत्रिपद मिळाले तरी हुरळून न जाणारे तसेच मंत्रिपद नसले तरी निराश न होणारे एक कर्मयोगी अशी बाबूजींची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. त्यांच्या विचारांची अमिट छाप महाराष्ट्रातील- विशेषत: विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रावर आहे. मी पहिल्यांदा महापौर झालो, तेव्हा त्यांनी आवर्जून मला ‘लोकमत’मध्ये बोलावून स्वागत केले होते. ‘लोकमत’च्या कार्यालयात प्रवेश करताच उजव्या बाजूला असलेले त्यांचे कार्यालय आणि तेथे बसलेले प्रसन्नचित्त आणि हसतमुख बाबूजी मला आजही आठवतात. त्यांचेच गुण विजयबाबू आणि राजेंद्रबाबू यांच्यात पुरेपूर उतरले  आहेत. आज त्याच संस्कारांचा वारसा हे दोघे पुढे नेत आहेत. समाजातील सर्वच घटकांशी, सर्व विचारधारांच्या धुरिणांशी त्यांनी वैयक्तिक स्नेहबंध जपला. बाबूजींमध्ये उपजतच सौंदर्यदृष्टी होती. अनेक शहरांमध्ये स्थापलेली ‘लोकमत’ची कार्यालये सौंदर्य आणि उपयोगिता यांचे उत्कृष्ट नमुने आहेत. अपारंपरिक ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करणारी त्यांची कार्यालये व मुद्रणस्थळे म्हणजे आधुनिक तंत्रसामर्थ्याचा आविष्कार ठरावा.मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या विकासावर दीर्घ परिणाम करणारी ठरली. फलोत्पादन, मत्स्योत्पादन, रेशीम उत्पादन, पामतेल, रबर उद्योग, काजू लागवड, फळप्रक्रिया उद्योग यावर भर दिला पाहिजे, हा त्यांचा विचार द्रष्टेपणाचा होता. त्यासाठी त्यांनी पडीक आणि खार जमिनींचा उपयोग करून घेतला.उद्योगमंत्री ­­असताना त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रासाठी समग्र विकास आराखडा मांडला होता. औद्योगिक विकासाचा वेग वाढावा, यासाठी मोठ्या उद्योगांबरोबरच लहान उद्योगांनाही हात दिला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यादृष्टीने त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील २५ टक्के जागा लहान उद्योगांसाठी आरक्षित केल्या होत्या. हे मोठे निर्णय राज्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी उपयोगी ठरले.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसLokmatलोकमत