शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींनी घेतलेले मोठे निर्णय राज्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी उपयोगी ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 11:42 IST

मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या विकासावर दीर्घ परिणाम करणारी ठरली. फलोत्पादन, मत्स्योत्पादन, रेशीम उत्पादन, पामतेल, रबर उद्योग, काजू लागवड, फळप्रक्रिया उद्योग यावर भर दिला पाहिजे, हा त्यांचा विचार द्रष्टेपणाचा होता.

देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र -

विलक्षण द्रष्टेपणाचा संगम म्हणजे बाबूजी, अर्थात जवाहरलालजी दर्डा. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव होता आणि ज्यांचा आदरपूर्ण उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही, असे बाबूजी. शेती, पत्रकारिता आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये अधिकाराने वावरणारे बाबूजी हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. हिंदीशी ममत्व आणि मराठीशी जन्माचे नाते असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने ‘लोकमत’ हे वृत्तपत्र अविश्रांत कष्टाने मोठे केले.  ‘लोकमत’चे यश हे निव्वळ व्यावसायिक नव्हे,  तर ते बाबूजींच्या संस्कारांचे आणि भूमिकेचेही यश आहे.  मंत्रिमंडळात १७ वर्षे राहिल्यानंतरही बाबूजींनी सरकार किंवा मंत्रिपद आणि पत्रकारिता यांची सरमिसळ कधीच होऊ दिली नाही. राष्ट्रीय विचारप्रवाह आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा त्यांनी बापूजी अणेंकडून घेतला आणि तो जपण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ‘लोकमत’ या नावाला लाभलेल्या लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादाचा विसर त्यांनी क्षणभरही  पडू दिला नाही. बाबूजींची दूरदृष्टी, त्यांचे कष्ट आणि पत्रकारितेतील समर्पण अशी विविध रूपे डोळ्यांपुढे उभी राहतात. प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्व, भेदाभेद न करणारे आणि मंत्रिपद मिळाले तरी हुरळून न जाणारे तसेच मंत्रिपद नसले तरी निराश न होणारे एक कर्मयोगी अशी बाबूजींची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. त्यांच्या विचारांची अमिट छाप महाराष्ट्रातील- विशेषत: विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रावर आहे. मी पहिल्यांदा महापौर झालो, तेव्हा त्यांनी आवर्जून मला ‘लोकमत’मध्ये बोलावून स्वागत केले होते. ‘लोकमत’च्या कार्यालयात प्रवेश करताच उजव्या बाजूला असलेले त्यांचे कार्यालय आणि तेथे बसलेले प्रसन्नचित्त आणि हसतमुख बाबूजी मला आजही आठवतात. त्यांचेच गुण विजयबाबू आणि राजेंद्रबाबू यांच्यात पुरेपूर उतरले  आहेत. आज त्याच संस्कारांचा वारसा हे दोघे पुढे नेत आहेत. समाजातील सर्वच घटकांशी, सर्व विचारधारांच्या धुरिणांशी त्यांनी वैयक्तिक स्नेहबंध जपला. बाबूजींमध्ये उपजतच सौंदर्यदृष्टी होती. अनेक शहरांमध्ये स्थापलेली ‘लोकमत’ची कार्यालये सौंदर्य आणि उपयोगिता यांचे उत्कृष्ट नमुने आहेत. अपारंपरिक ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करणारी त्यांची कार्यालये व मुद्रणस्थळे म्हणजे आधुनिक तंत्रसामर्थ्याचा आविष्कार ठरावा.मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या विकासावर दीर्घ परिणाम करणारी ठरली. फलोत्पादन, मत्स्योत्पादन, रेशीम उत्पादन, पामतेल, रबर उद्योग, काजू लागवड, फळप्रक्रिया उद्योग यावर भर दिला पाहिजे, हा त्यांचा विचार द्रष्टेपणाचा होता. त्यासाठी त्यांनी पडीक आणि खार जमिनींचा उपयोग करून घेतला.उद्योगमंत्री ­­असताना त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रासाठी समग्र विकास आराखडा मांडला होता. औद्योगिक विकासाचा वेग वाढावा, यासाठी मोठ्या उद्योगांबरोबरच लहान उद्योगांनाही हात दिला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यादृष्टीने त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील २५ टक्के जागा लहान उद्योगांसाठी आरक्षित केल्या होत्या. हे मोठे निर्णय राज्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी उपयोगी ठरले.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसLokmatलोकमत