शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

एवढेच सांगायचे...मोहनजी, आता क्षिप्र चल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:54 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे. काळ बदलतो तसा समाज बदलतो. मात्र पुस्तके आणि त्यांनी निर्माण केलेल्या समजुती तशाच राहतात. संघानेही कालानुरूप बदलले पाहिजे व तो बदलत आहे ही सरसंघचालक मोहन भागवत यांची कोलांटउडी नाही. काळाने त्यांच्या व संघातील नव्या विचारांच्या लोकांच्या मनात घडवून आणलेली ही एक चांगल्या व स्वागतार्ह बदलाची चिन्हे आहेत. सारे बदलले तरी आम्ही तसेच आहोत ही कर्मठ भूमिका फार लवकर कालबाह्य होते. १९२५ मध्ये स्थापन झालेला व गेली १२० वर्षे तसाच, गणवेशापासून विचारांपर्यंत राहिलेला संघ हा त्यातल्याच नव्यांना कालविसंगत वाटू लागला होता. त्यातून सावरकरांच्या इच्छेविरुद्ध जाऊन संघाने जनसंघाची स्थापना केली. त्याला लोकशाहीच्या गरजेनुसार समाजाभिमुख होणे भाग पडले. परिणामी संघाच्या तुलनेत त्याला मिळणारा लोकमताचा पाठिंबा मोठा होता व तो क्रमाने वाढत गेला. हा पाठिंबाच संघाच्या बंद विचारांसमोरचे आव्हान ठरला. जनसंघात वा भाजपात संघाबाहेरून आलेली माणसे संघविचार वा संघगुरूंना कशी मानतील? किंवा त्यांना आपले परात्पर गुरू तरी कसे समजतील? मग त्यांना सांभाळायला (कारण खरी सांभाळायची असते ती सत्ता, संघटना नव्हे) आपली कुंपणे जरा किलकिली करणे गरजेचे होते. इतर संघटनांना ही गरज भासली नाही. गांधीजी कालानुरूप बदलत राहिले. १९२० पूर्वी चातुर्वर्ण्य म्हणणारे गांधी नंतरच्या काळात फक्त आंतरजातीय लग्नांनाच परवानगी देणारे व त्याला हजर राहणारे बनले. ईश्वर आणि अल्ला यांचा एकत्र उच्चार करू लागले. ज्या संघटना त्यांच्या पोथ्यांना घट्ट धरून राहिल्या त्या साऱ्यांच्याच समोर काळाचे संकट उभे राहिले. ते मार्क्सच्या पोथीवाद्यांना जरा उशिरा समजले. समाजवाद्यांना ते समजले तेव्हा ते जवळपास संपलेही होते. आपले राजकीय आद्यग्रंथच नव्हे तर आपल्या धार्मिक पोथ्याही दिवसेंदिवस कालविसंगत होत असतात. त्या स्वत:वर लादून ठेवण्याचे वर्तमानाचे काम नव्हे. अखेर माणूस हाच तेवढा खरा व तोच तेवढा सनातन असतो. तो काळानुरूप बदलतो. मार्क्सचे कॅपिटल मात्र बदलत नाही. हिटलरचे ‘माइन काम्फ’ किंवा माओचे ‘रेड बुक’ही तसेच राहते. आपल्याकडे यात फार वेगाने बदल झाले आहेत. शंकराचार्यांना ज्ञानेश्वरांनी खोडून काढले आणि ज्ञानेश्वरांचा अर्थ टिळकांनी चुकीचा ठरवला. या स्थितीत ‘बंच आॅफ थॉट्स’ हे गोळवलकरांचे सांगणे असले तरी आणि ते मूळ स्वरूपात उपलब्ध असले तरी त्याचे आजवर अनुयायी राहिलेले लोक अर्ध्या चड्ड्यांवर समाधान कसे मानतील? त्यांना फूलपँटच केवळ नाही तर मोबाइल लागेल, संगणक लागेल, प्रचारासाठी ट्रोल्ससारखी अविश्वसनीय साधने लागतील आणि हो, संघही केवळ गुरुदक्षिणेवर चालणार नाही. गोमांसाच्या भक्षणावर नागपुरात किंवा महाराष्ट्र व राजस्थानात बंदी घालता येते, पण ती बंगाल, केरळ, मणिपूर, नागालँड आणि काश्मिरात कशी घालणार? अशा वेळी पुस्तक बदलायचे की माणसांना पुस्तकांनी तयार केलेल्या चौकटीत कोंबायचे? पण काही का असेना भागवतांनी ही कोंडी फोडली त्यासाठी त्यांचे अभिनंदन. आता त्यांच्यापुढचा नवा प्रश्न मात्र मोठा आहे. प्रत्येक संघटनेत काही नाफेरवादी कर्मठ असतात. अशांची संख्या संघात फार मोठी आहे. भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. आव्हाने पुढेही आहेत. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे. हिंदू-मुसलमानांची एकात्मता साधायची आहे. बाबरीवाल्यांना जोडायचे आहे. त्यासाठी हिंदुत्वातील कडव्यांना आवरायचेही आहे. काही का असेना भागवतांनी सुरुवात केली आहे. त्यांना या क्षेत्रात यश लाभावे यासाठी एवढेच सांगायचे, ‘मोहनजी, आता क्षिप्र चल’.>भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत