शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

पाठ्यपुस्तकातील धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:10 IST

सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे.

सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे. विशेषत: शालेय पाठ्यपुस्तकांमधील बदल तर नक्कीच हरकत घेण्यासारखे आहेत. फार पूर्वीपासून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाला जुन्या परमवैभवात नेऊन ठेवण्याची आस लागली आहे. त्याची सुरुवात शालेय वयापासूनच व्हायला हवी असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी सत्ता येताक्षणीच पहिले काय केले असेल तर सांस्कृतिक राष्ट्रवाद या त्यांच्या घोषणेला प्रत्यक्षात कसे आणता येईल यावर विचारमंथन सुरू केले. त्यांचा शोध शालेय पाठ्यपुस्तकांपाशी संपला. या पाठ्यपुस्तकांमध्येच बदल केला तर शालेय वयातच मुले त्यांना हव्या असलेल्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाची भक्त होतील असे त्यांना वाटले. पाठ्यपुस्तकातील बदलाचे प्रयत्न त्या हेतूने सुरू आहेत. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय. त्यामुळे त्याला प्रथम हात घालण्यात आला. वास्तविक ही पाठ्यपुस्तके तयार करण्याची पूर्वीची पद्धत आदर्श पद्धत होती. त्यात त्या त्या विषयातील तज्ज्ञांची एक समिती, त्यात या तज्ज्ञांशिवाय शास्त्रीयदृष्ट्या मुलांची गरज ओळखणाºयांचाही समावेश असायचा. अतिशय अभ्यासपूूूूर्वक ही पुस्तके तयार व्हायची. त्यामुळेच जुन्या पिढीतील अनेकांना थोरांची ओळख, व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते बनले ही आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील शीर्षके अजूनही आठवत असतील. विद्यमान सरकार या सगळ्यावर फुली मारून नवा इतिहास मुलांच्या पुस्तकांत आणत आहे. त्यालाही हरकत नाही. स्वातंत्र्यानंतरची भारताची वाटचालही शालेय वयातच मुलांना समजली पाहिजे. त्यातही आणीबाणीसारखे पर्व, बोफोर्स प्रकरण असेल तर त्याची माहिती झालीच पाहिजे, मात्र ती अपुरी व सोयीच्या स्वरुपातील नको. बोफोर्सची सगळी माहिती द्यायची व त्यातून राजीव गांधी निर्दोष मुक्त झाले हे सांगायचेच नाही हा रडीचा डाव झाला. सरकारने आपले हेका सोडावा व पाठ्यपुस्तके निर्दोष कशी होतील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यासारखेच तुम्हीही वागत असाल तर त्यांच्यात व तुमच्यात फरक तो काय राहिला?