शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

पाठ्यपुस्तकातील धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:10 IST

सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे.

सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे. विशेषत: शालेय पाठ्यपुस्तकांमधील बदल तर नक्कीच हरकत घेण्यासारखे आहेत. फार पूर्वीपासून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाला जुन्या परमवैभवात नेऊन ठेवण्याची आस लागली आहे. त्याची सुरुवात शालेय वयापासूनच व्हायला हवी असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी सत्ता येताक्षणीच पहिले काय केले असेल तर सांस्कृतिक राष्ट्रवाद या त्यांच्या घोषणेला प्रत्यक्षात कसे आणता येईल यावर विचारमंथन सुरू केले. त्यांचा शोध शालेय पाठ्यपुस्तकांपाशी संपला. या पाठ्यपुस्तकांमध्येच बदल केला तर शालेय वयातच मुले त्यांना हव्या असलेल्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाची भक्त होतील असे त्यांना वाटले. पाठ्यपुस्तकातील बदलाचे प्रयत्न त्या हेतूने सुरू आहेत. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय. त्यामुळे त्याला प्रथम हात घालण्यात आला. वास्तविक ही पाठ्यपुस्तके तयार करण्याची पूर्वीची पद्धत आदर्श पद्धत होती. त्यात त्या त्या विषयातील तज्ज्ञांची एक समिती, त्यात या तज्ज्ञांशिवाय शास्त्रीयदृष्ट्या मुलांची गरज ओळखणाºयांचाही समावेश असायचा. अतिशय अभ्यासपूूूूर्वक ही पुस्तके तयार व्हायची. त्यामुळेच जुन्या पिढीतील अनेकांना थोरांची ओळख, व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते बनले ही आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील शीर्षके अजूनही आठवत असतील. विद्यमान सरकार या सगळ्यावर फुली मारून नवा इतिहास मुलांच्या पुस्तकांत आणत आहे. त्यालाही हरकत नाही. स्वातंत्र्यानंतरची भारताची वाटचालही शालेय वयातच मुलांना समजली पाहिजे. त्यातही आणीबाणीसारखे पर्व, बोफोर्स प्रकरण असेल तर त्याची माहिती झालीच पाहिजे, मात्र ती अपुरी व सोयीच्या स्वरुपातील नको. बोफोर्सची सगळी माहिती द्यायची व त्यातून राजीव गांधी निर्दोष मुक्त झाले हे सांगायचेच नाही हा रडीचा डाव झाला. सरकारने आपले हेका सोडावा व पाठ्यपुस्तके निर्दोष कशी होतील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यासारखेच तुम्हीही वागत असाल तर त्यांच्यात व तुमच्यात फरक तो काय राहिला?