शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पाठ्यपुस्तकातील धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:10 IST

सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे.

सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे. विशेषत: शालेय पाठ्यपुस्तकांमधील बदल तर नक्कीच हरकत घेण्यासारखे आहेत. फार पूर्वीपासून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाला जुन्या परमवैभवात नेऊन ठेवण्याची आस लागली आहे. त्याची सुरुवात शालेय वयापासूनच व्हायला हवी असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी सत्ता येताक्षणीच पहिले काय केले असेल तर सांस्कृतिक राष्ट्रवाद या त्यांच्या घोषणेला प्रत्यक्षात कसे आणता येईल यावर विचारमंथन सुरू केले. त्यांचा शोध शालेय पाठ्यपुस्तकांपाशी संपला. या पाठ्यपुस्तकांमध्येच बदल केला तर शालेय वयातच मुले त्यांना हव्या असलेल्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाची भक्त होतील असे त्यांना वाटले. पाठ्यपुस्तकातील बदलाचे प्रयत्न त्या हेतूने सुरू आहेत. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय. त्यामुळे त्याला प्रथम हात घालण्यात आला. वास्तविक ही पाठ्यपुस्तके तयार करण्याची पूर्वीची पद्धत आदर्श पद्धत होती. त्यात त्या त्या विषयातील तज्ज्ञांची एक समिती, त्यात या तज्ज्ञांशिवाय शास्त्रीयदृष्ट्या मुलांची गरज ओळखणाºयांचाही समावेश असायचा. अतिशय अभ्यासपूूूूर्वक ही पुस्तके तयार व्हायची. त्यामुळेच जुन्या पिढीतील अनेकांना थोरांची ओळख, व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते बनले ही आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील शीर्षके अजूनही आठवत असतील. विद्यमान सरकार या सगळ्यावर फुली मारून नवा इतिहास मुलांच्या पुस्तकांत आणत आहे. त्यालाही हरकत नाही. स्वातंत्र्यानंतरची भारताची वाटचालही शालेय वयातच मुलांना समजली पाहिजे. त्यातही आणीबाणीसारखे पर्व, बोफोर्स प्रकरण असेल तर त्याची माहिती झालीच पाहिजे, मात्र ती अपुरी व सोयीच्या स्वरुपातील नको. बोफोर्सची सगळी माहिती द्यायची व त्यातून राजीव गांधी निर्दोष मुक्त झाले हे सांगायचेच नाही हा रडीचा डाव झाला. सरकारने आपले हेका सोडावा व पाठ्यपुस्तके निर्दोष कशी होतील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यासारखेच तुम्हीही वागत असाल तर त्यांच्यात व तुमच्यात फरक तो काय राहिला?