शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पाठ्यपुस्तकातील धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:10 IST

सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे.

सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे. विशेषत: शालेय पाठ्यपुस्तकांमधील बदल तर नक्कीच हरकत घेण्यासारखे आहेत. फार पूर्वीपासून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाला जुन्या परमवैभवात नेऊन ठेवण्याची आस लागली आहे. त्याची सुरुवात शालेय वयापासूनच व्हायला हवी असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी सत्ता येताक्षणीच पहिले काय केले असेल तर सांस्कृतिक राष्ट्रवाद या त्यांच्या घोषणेला प्रत्यक्षात कसे आणता येईल यावर विचारमंथन सुरू केले. त्यांचा शोध शालेय पाठ्यपुस्तकांपाशी संपला. या पाठ्यपुस्तकांमध्येच बदल केला तर शालेय वयातच मुले त्यांना हव्या असलेल्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाची भक्त होतील असे त्यांना वाटले. पाठ्यपुस्तकातील बदलाचे प्रयत्न त्या हेतूने सुरू आहेत. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय. त्यामुळे त्याला प्रथम हात घालण्यात आला. वास्तविक ही पाठ्यपुस्तके तयार करण्याची पूर्वीची पद्धत आदर्श पद्धत होती. त्यात त्या त्या विषयातील तज्ज्ञांची एक समिती, त्यात या तज्ज्ञांशिवाय शास्त्रीयदृष्ट्या मुलांची गरज ओळखणाºयांचाही समावेश असायचा. अतिशय अभ्यासपूूूूर्वक ही पुस्तके तयार व्हायची. त्यामुळेच जुन्या पिढीतील अनेकांना थोरांची ओळख, व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते बनले ही आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील शीर्षके अजूनही आठवत असतील. विद्यमान सरकार या सगळ्यावर फुली मारून नवा इतिहास मुलांच्या पुस्तकांत आणत आहे. त्यालाही हरकत नाही. स्वातंत्र्यानंतरची भारताची वाटचालही शालेय वयातच मुलांना समजली पाहिजे. त्यातही आणीबाणीसारखे पर्व, बोफोर्स प्रकरण असेल तर त्याची माहिती झालीच पाहिजे, मात्र ती अपुरी व सोयीच्या स्वरुपातील नको. बोफोर्सची सगळी माहिती द्यायची व त्यातून राजीव गांधी निर्दोष मुक्त झाले हे सांगायचेच नाही हा रडीचा डाव झाला. सरकारने आपले हेका सोडावा व पाठ्यपुस्तके निर्दोष कशी होतील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यासारखेच तुम्हीही वागत असाल तर त्यांच्यात व तुमच्यात फरक तो काय राहिला?