शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

दहशतवादास चाप

By admin | Updated: September 3, 2015 21:49 IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका निभावलेल्या डेव्हिड कोलमन हेडली या दहशतवाद्याने, या हल्ल्यापूर्वी अमेरिका, भारत व पाकिस्तान दरम्यान बिनधास्त अनेक वाऱ्या केल्या होत्या

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका निभावलेल्या डेव्हिड कोलमन हेडली या दहशतवाद्याने, या हल्ल्यापूर्वी अमेरिका, भारत व पाकिस्तान दरम्यान बिनधास्त अनेक वाऱ्या केल्या होत्या. पण भारत व अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना त्याची अजिबात खबरबातही लागू शकली नव्हती. कारण त्यावेळी कोणतीच गुप्तचर संस्था दुसऱ्या देशाच्या गुप्तचर संस्थेसोबत माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी उत्सुक नव्हती. परंतु दहशतवादाने आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केल्यानंतर, दहशतवादाची झळ बसलेल्या राष्ट्रांना एकत्र यावेच लागणार होते. अमेरिकेवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील मध्यवर्ती तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयच्या अंतर्गत दहशतवादी छाननी केंद्र स्थापन करण्यात आले. जगभरातील संशयित दहशतवाद्यांची समग्र माहिती एकत्रित करून, तिचे सखोल विश्लेषण करण्याचे काम या केंद्रात केले जाते. पुढे अमेरिकेने जगभरातील ३० देशांच्या गुप्तचर संस्थांसोबत यासंबंधी करार घडवून आणले. त्यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालींच्या संदर्भात विविध गुप्तचर संस्थांनी गोळा केलेल्या माहितीचे आदानप्रदान होऊ लागले. येत्या डिसेंबरमध्ये असाच करार भारत व अमेरिकेदरम्यानही होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे, भारतात दहशतवाद माजविण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यास चाप बसण्याची अपेक्षा आहे. भारतात दहशतवादी कृत्ये घडवून, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या कृपाछत्राखाली पाकिस्तानात सुखनैव संचार करणाऱ्या, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, झकी-उर-रहमान लख्वी, हाफिज सईद यासारख्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासोबतच, आयएसआयद्वारा भारतात मोठ्या प्रमाणात पेरल्या जाणाऱ्या बनावट चलनी नोटांना आळा घालण्यासाठी या कराराची मदत होईल, अशी अपेक्षा आहे. अर्थात या करारास काही भारतीय गुप्तचर संस्थांचा विरोध आहे. जोवर अमेरिकेला दहशतवादाची झळ पोहोचली नव्हती तोवर ती दहशतवाद ही समस्या असल्याचे मानायलाच तयार नव्हती. मात्र प्रथम अल कायदा व त्यानंतर इसिसच्या उदयानंतर अमेरिकेला दहशतवादाच्या धोक्याची खरी जाणीव झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत अमेरिकेने पुढे केलेला हात हाती घेण्यास हरकत नसावी. कारण तसेही दहशतवादाविरुद्धची लढाई आपण स्वबळावरच लढू या भारताच्या आजवरच्या भूमिकेने फार काही नेत्रदीपक कामगिरी बजावून दाखवली आहे, असे घडलेले नाही.