शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादास चाप

By admin | Updated: September 3, 2015 21:49 IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका निभावलेल्या डेव्हिड कोलमन हेडली या दहशतवाद्याने, या हल्ल्यापूर्वी अमेरिका, भारत व पाकिस्तान दरम्यान बिनधास्त अनेक वाऱ्या केल्या होत्या

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका निभावलेल्या डेव्हिड कोलमन हेडली या दहशतवाद्याने, या हल्ल्यापूर्वी अमेरिका, भारत व पाकिस्तान दरम्यान बिनधास्त अनेक वाऱ्या केल्या होत्या. पण भारत व अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना त्याची अजिबात खबरबातही लागू शकली नव्हती. कारण त्यावेळी कोणतीच गुप्तचर संस्था दुसऱ्या देशाच्या गुप्तचर संस्थेसोबत माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी उत्सुक नव्हती. परंतु दहशतवादाने आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केल्यानंतर, दहशतवादाची झळ बसलेल्या राष्ट्रांना एकत्र यावेच लागणार होते. अमेरिकेवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील मध्यवर्ती तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयच्या अंतर्गत दहशतवादी छाननी केंद्र स्थापन करण्यात आले. जगभरातील संशयित दहशतवाद्यांची समग्र माहिती एकत्रित करून, तिचे सखोल विश्लेषण करण्याचे काम या केंद्रात केले जाते. पुढे अमेरिकेने जगभरातील ३० देशांच्या गुप्तचर संस्थांसोबत यासंबंधी करार घडवून आणले. त्यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालींच्या संदर्भात विविध गुप्तचर संस्थांनी गोळा केलेल्या माहितीचे आदानप्रदान होऊ लागले. येत्या डिसेंबरमध्ये असाच करार भारत व अमेरिकेदरम्यानही होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे, भारतात दहशतवाद माजविण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यास चाप बसण्याची अपेक्षा आहे. भारतात दहशतवादी कृत्ये घडवून, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या कृपाछत्राखाली पाकिस्तानात सुखनैव संचार करणाऱ्या, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, झकी-उर-रहमान लख्वी, हाफिज सईद यासारख्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासोबतच, आयएसआयद्वारा भारतात मोठ्या प्रमाणात पेरल्या जाणाऱ्या बनावट चलनी नोटांना आळा घालण्यासाठी या कराराची मदत होईल, अशी अपेक्षा आहे. अर्थात या करारास काही भारतीय गुप्तचर संस्थांचा विरोध आहे. जोवर अमेरिकेला दहशतवादाची झळ पोहोचली नव्हती तोवर ती दहशतवाद ही समस्या असल्याचे मानायलाच तयार नव्हती. मात्र प्रथम अल कायदा व त्यानंतर इसिसच्या उदयानंतर अमेरिकेला दहशतवादाच्या धोक्याची खरी जाणीव झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत अमेरिकेने पुढे केलेला हात हाती घेण्यास हरकत नसावी. कारण तसेही दहशतवादाविरुद्धची लढाई आपण स्वबळावरच लढू या भारताच्या आजवरच्या भूमिकेने फार काही नेत्रदीपक कामगिरी बजावून दाखवली आहे, असे घडलेले नाही.