शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

आततायी मेट्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:41 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पावरील आरे कारशेडच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली खंडपीठाने स्थगिती कायम ठेवली.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पावरील आरे कारशेडच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली खंडपीठाने स्थगिती कायम ठेवली. त्यामुळे मेट्रो प्रशासनाला धक्का बसला. मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांवर सतत न्यायालयीन स्थगिती किंवा बंदीचे आदेश येत राहिले तर मुंबईकरांची वाहतूककोंडी फोडण्यासाठी हे लाभदायी ठरणार नाही. अशा आदेशांमुळे मेट्रो प्रकल्प रखडण्याची स्थिती निर्माण होऊ पाहतेय. मेट्रो प्रशासनाचे यात चुकतेय किंवा त्यांचा आततायीपणा आड येतोय, अशी चर्चा यानिमित्ताने होते. मेट्रो-३ प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात आरेतील जवळपास ३३ एकर जागेवर मेट्रोचे कारशेड उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र या जागेचा विचार करताना भविष्यात येथील निसर्गावर होणारा प्रहार मेट्रो प्रशासनाने विचारात घेतला नाही का? प्रकल्प उभारण्यासाठी झाडांची कत्तल करणाऱ्या प्रशासनाला पर्यावरणवाद्यांचा विरोध होणार नाही का? या साºयाचा विचार मेट्रो प्रशासनाने केला नाही ही त्यांची मोेठी चूक होती. आता याच गोष्टींमुळे मुंबईकरांना फायद्याची ठरणारी मेट्रो कागदावरच धावेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या घाटकोपर ते वर्सोवा हा मेट्रोचा एकमेव प्रकल्प मुंबईत कार्यान्वित आहे. बाकी सर्व प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांची मांडणी करताना मुंबईतील उरल्यासुरल्या निसर्गाला तरी धोका होणार नाही याचा विचार त्या वेळच्या तज्ज्ञांकडून का करण्यात आला नाही? हा विचार केला असेल तर पर्यावरणवाद्यांना चर्चेला बोलावून त्यांच्याकडून सल्ला घेतला असता तर आत्तापर्यंत मेट्रो प्रशासनाला या विरोधातून मार्ग काढणे शक्य झाले असते. मात्र मेट्रो प्रशासनाने बारकाईने विचार न करता ‘हम करे सो कायदा’ या तत्त्वावर प्रकल्प पुढे रेटल्यामुळे दरवेळी एक तर पर्यावरणवाद्यांकडून तर कधी रहिवाशांकडून त्यांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. आरेमधल्या जागेवर कारशेडसाठी बांधकाम करण्यावर राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली व पुण्याच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे. असे असूनही आरेच्याच जागेवर कारशेड बांधण्याचा हट्ट मेट्रो प्रशासन करत आहे. यामुळे २०२१ पर्यंत पूर्ण होणारे मेट्रो प्रकल्प अजून पुढे ढकलले जाणार आहेत. मेट्रोने मुंबईत केलेल्या भुयारी खोदकामामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडतोय. आरेचे कारशेड होत नसल्यास मुंबईतील विक्रोेळी आणि कांजूरमार्ग भागातील रिक्त जागेवर पर्यायी कारशेड उभारून प्रकल्प पूर्ण करण्याचा पर्याय मेट्रो प्रशासन अद्याप दाखवत नाहीये. तसेच आपल्या हट्टासाठी राष्ट्रीय हरित लवाद आणि न्यायालयांचे उंबरठे झिजवून वेळकाढूपणा करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गर्दीत अडकलेल्या मुंबईकरांना मात्र पुढची अनेक वर्षे त्याच पद्धतीने रेटून गर्दीत चेंगरत प्रवास करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

टॅग्स :Metroमेट्रो