शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संघाला झाला ओव्हरडोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:25 IST

८ जून रोजी नागपुरात मोठा भूकंप होऊन प्रचंड राजकीय उलथापालथ होईल अशी हवा तयार झाली होती. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांची अब्रूच जणुकाय डावावर लागलेली.

-दिलीप तिखिले८ जून रोजी नागपुरात मोठा भूकंप होऊन प्रचंड राजकीय उलथापालथ होईल अशी हवा तयार झाली होती. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांची अब्रूच जणुकाय डावावर लागलेली.निमित्त होते देशाचे महामहीम राष्टÑपती राहिलेले प्रणवदा यांची नागपुरातील संघ कार्यक्रमाला उपस्थिती.आपला एक दिग्गज नेता संघाच्या गुहेत शिरतो आहे, हे पाहून काँग्रेसच्या पोटात भीतीने गोळा उठणे स्वाभाविक होते. हा वर्तमान माहोलचाही परिणाम म्हणाना! ‘रात्र वैऱ्याची आहे.’ तिकडे अमितभाई ‘मिशन किडनॅपिंग’ घेऊन देशभर फिरत आहेत. मासे गळाला लावण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ ही आयुधे आहेतच. यातल्याच भेद नीतीचा वापर संघाच्या माध्यमातून प्रणवदांवर होऊ शकतो ही काँग्रेसची रास्त भीती. म्हणूनच ‘दा..नका हो जाऊ’ म्हणून त्यांची हर तºहने समजूत घालण्यात आली पण ते बधले नाहीत. पोरीने...शर्मिष्ठानेही समजावले... पापा उधर जाना मत... खतरा है...!आता माझेच उदाहरण घ्या...तुम्ही तिकडे जाणार म्हटल्यावर मला चक्क भाजपात घेऊन टाकले. प. बंगालमधून तिकीट देण्याची पुडीही सोडली. आता बोला...पण दा काही बोलले नाही... मला जाऊ दे...बोलू दे... मग बघ...एवढेच म्हणाले.आता ‘दा’ काही ऐकतच नाही म्हटल्यावर काँग्रेसची तब्येत बिघडली. ‘दा’ नागपुरात पोहचले. सर्व प्रोटोकॉल बाजूला सारुन मोहनराव राजभवनावर स्वागतासाठी गेले, हे पाहिल्यावर तर धडधड आणखीनच वाढली. पुढचा धोका ओळखून पक्षाला आयसीयूत भरती करावे लागले. प्रणवदांच्या प्रत्येक हालचालींवर पक्षाचा पल्स रेट कमी जास्त होत होता.इकडे ‘दां’नी व्हिजीटर्स बुकात डॉ. हेडगेवारांना ‘देशाचे महान सपूत’ म्हणून श्रद्धांजली अर्पण केली आणि तिकडे आयसीयूत काँग्रेसला चक्क व्हेन्टिलेटरवर घ्यावे लागले.पुढचे काही मिनिट काही सांगता येत नाही असे डॉक्टरांनीही सांगून टाकले. ‘अब सब कुछ उपरवालेके अर्थात ‘दा’ के हात मे है. असेही ते काहीसे कुजबुजले.डॉक्टरांच्या प्रार्थनेला अखेर ‘दा’ धावून आले. ध्वजप्रणाम कार्यक्रमात सर्वांनी नमन केले पण प्रणवदांचा हात आडवा छातीपर्यंत गेला नाही. बस्स् हीच मात्रा आयसीयूत कामी आली. हे पाहून तिकडे ५६ इंची छातीचे ठोके वाढले की नाही हे माहीत नाही पण इकडे काँग्रेसच्या छातीतील धडधड कमी झाली. व्हेंटी निघाली. मात्र ‘दा’ आता काय बोलतील ही धाकधुक होतीच. पेशन्ट ‘अंडर आॅब्झर्वेशन’ होता. पण यातूनही काँग्रेस बाहेर पडली. दादांनी संघाच्या गडात संघालाच खरीखोटी सुनावली. देशभक्ती, राजधर्माचे धडेही दिले.एव्हाना, इकडे संघाच्या गडात चुळबुळ सुरु झाली होती. ‘ये क्या हो रहा’ म्हणत संघसेवक क्षणोक्षणी तोंडाचा आऽऽ वासत होते. खुद्द सरसंघचालक प्रणवजींचा माईक वर खाली करतायंत...‘पाथेय’चा मान अतिथींना देतात... आणि हे काय...संघभूमीवर गांधी, नेहरुंचे नाव...? शीव...शीव... संघनिष्ठांना हे सर्व अनाकलनीय होते. आता तब्येत बिघडण्याची पाळी संघाची होती. काँग्रेस आयसीयूतून बाहेर पडली. त्याच बेडवर संघाला अ‍ॅडमिट करावे लागले. डॉक्टरांनी निदान केले ‘ओव्हरडोज’ ...रिअ‍ॅक्शन आली...!(तिरकस)

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ